शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला

By admin | Updated: February 28, 2016 00:47 IST

जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास पावसाने अवकाळी हजेरी लावली. सर्वाधिक जास्त पाऊस पवनी तालुक्यातील कोंढा येथे (३२.१ मि.मी) बरसला.

शेतकरी हवालदिल : मूग, वाटाणा, तूर, पोपट, जवस पिकाचे अतोनात नुकसान, वीटभट्टीला बसला फटकाभंडारा : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास पावसाने अवकाळी हजेरी लावली. सर्वाधिक जास्त पाऊस पवनी तालुक्यातील कोंढा येथे (३२.१ मि.मी) बरसला. भंडारा येथे १४ मि.मी, मिटेवानी १७ मि.मी., गर्रा १५ मि.मी, मासळ १३.२ मि.मी तर लाखांदूर येथे ८ मि.मी असा सरासरी ३.९ मि.मी पाऊस बरसला. या पावसाचा रबी पिकांना फटका बसणार आहे. या पावसाने उन्हाळी धानाला संजिवनी मिळणार आहे.साकोलीत पाऊससाकोली : आधीच नापिकीमुळे हवालदिल शेतकऱ्यावर पुन्हा अवकाळी पावसाने चिंता वाढविली आहे. त्यामुळे कालच्या पावसामुळे कठाण मालही होणार की नाही यात शंका आहे. यावर्षी पावसाळयातच पाऊस नाहीच्या बरोबर आला. मात्र तरीही शेतकऱ्यांनी कसेबसे करून रोवणी आटोपली. रोवणी होत नाही तेच पुन्हा किडीने कहर केला. यातूनही शेतकऱ्यांनी मार्ग काढला व पिके वाचविली. मात्र उत्पन्न अर्ध्यापेक्षाही कमी आहे. यानंतर शेतकऱ्यांना आशा होती दुष्काळग्रस्त घोषीत होण्याची. मात्र तीही निराशेतच बदलली. याहीस्थितीत शेतकऱ्यांनी कठाण मालाची लागवड केली. ज्यामुळे काही प्रमाणात नुकसानीवर आळा घालता येईल. मात्र कठाण माल आता हातात येईल अशातच अवकाळी पावसाने सुरुवात केली. अवकाळी पाऊस असाच दोन तीन दिवस आला तर या पावसाचा परिणाम रबी पिकावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मासळ येथे जोरदार पाऊसमासळ : मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. सायंकाळी ६ पासूनच गार वारे वाहू लागले होते. रात्री वादळासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडीत झाला होता. या पावसाने रबी पिकाला फटका बसला आहे. शेतात गहू, उडीद, मुग, तुर काही प्रमाणात कापणीला आले होते. काही पीक शेतकऱ्यांनी शेतातच जमा करून ठेवले होते. अचानक आलेल्या पावसाने वाळलेले पीक ओले झाले. गव्हावर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. गव्हाची चकाकी जावून गव्हाला भाव येत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पुन्हा पाऊस आल्यास शेतकऱ्यांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. उडीद, मुग आदींना ओंबीवर आल्यामुळे नुकसान होऊ शकते. दमट वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे.करडीत मुसळधारकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील पालोरा व करडी परिसरात सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे शेतीचे नुकसान झाले. पोपट, जवस, मुंग आदी पिके काळी पडली. गहू हवेमुळे जमिनीवर लोटले. विटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालोरा येथील शेतकरी देवदास बडवाईक, लक्ष्मण बांते यांच्या शेतातील मुग काळे पडले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.रबी पिकांची नासाडीविरली (बु.) : या परिसरात अकाली पावसाने हजेरी लावली. पावसाच्या तडाख्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हताश झाला आहे. परिसरात उडीद, मुग, लाख, लाखोळी, वाटाना, हरभरा, गहू आदी रबी पिकांच्या कापणीचा हंगाम जोमात सुरु आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात या रब्बी पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत तर काहींचे या पिकांचे ढिग जमा झालेले आहेत. रात्री अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतात पसरलेल्या कडपा आणि जमा झालेल्या ढिगांमध्ये पाणी शिरले असून ही पिके सडण्याच्या मार्गावर आहेत. जमा झालेल्या पिकांच्या ढिगांवर पॉलीथीन, ताडपत्री झाकून पिक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. अकाली पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेतल्यामुये शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे.मुसळधार पाऊसजवाहरनगर : जवाहरनगर परिसरात जोरदार पाऊस बरसला. या भागात लावण्यात आलेल्या रबी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. भंडारा जिल्ह्याच्या सीमेला नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका लागून आहे. या सीमेवर गारांचा पाऊस झाला. जवाहरनगर ते भंडारा या मार्गावर धो-धो पाऊस बरसला. मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना समोरचे वाहन दिसत नव्हते, अशी परिस्थिती होती. त्यामुळे वाहनचालकांना वाहनांचा वेग कमी करावा लागला होता. (लोकमत चमू)