शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

विदर्भ राज्यासाठी रेल रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 00:33 IST

अखंड महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा. वेगळा विदर्भ देता कि जाता असा सज्जड दम स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्याकरीता ....

वामनराव चटप : ६ रोजी सेवाग्राम येथून एल्गारपवनी : अखंड महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा. वेगळा विदर्भ देता कि जाता असा सज्जड दम स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्याकरीता व शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ६ एप्रिलला दुपारी १२ वाजता वर्धा-सेवाग्राम रेल्वे स्थानक येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात विदर्भवादी जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप यांनी पवनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केले.१ एप्रिल रोजी मच्छीमार सोसायटीच्या प्रांगणात विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात आंदोलनाविषयी माहिती देताना ते बोलत होते. पत्रपरिषदेत माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, प्राचार्य जगनाके, नेवारे, प्रकाश पचारे, सुनंदा मुंडले, डॉ. विक्रम राखडे, सुरेश अवसरे, नगरसेविका शोभना गौरशेट्टीवार, राजेश येलशेट्टीवार, प्रवीण भोंडे उपस्थित होते.विदर्भाचे दोन अर्थसंकल्प श्रीनिवास खांदेवाले यांनी मांडले आहे. विदर्भाचे सगळ्या मार्गाचे २००५-०६ मध्ये उत्पन्न ४१,५६० कोटी रुपये होते खर्च ४१,४०० कोटी होता. नवीन कर न लावताही विदर्भाचा अर्थसंकल्प ११० कोटींनी शिलकीचा होता. विजेचे दर २० टक्के कमी केले व एकाही पैशाचा कर लावला नाही तरी विदर्भाचा अर्थसंकल्प १३,००० कोटींनी वाढला आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ५४,४०० कोटीचा असून खर्च ५२,३८० कोटी आहे १,६६० कोटीचे शिलकीचे अंदाजपत्रक आहे. दोन्ही अर्थसंकल्पाला आजपर्यंत कोणीही आव्हान दिले नाही. आज महाराष्ट्रावर ४ लाख १३ हजार कोटीचे कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत त्या थांबवणे व शेतमालाला हमी भाव देणे, बेरोजगारांचे प्रश्न सोडवणे, विजेचे लोडशेडिंग, निम्मे दरात वीज देणे, बचत गटावरील मायक्रोफायनान्सच्या कर्जमुक्तीसारख्या सर्वसमस्यांचे उत्तर वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती हेच असून विदर्भातील जनतेने या आंदोलनात सहभागी होऊन दिल्ली, मुंबई, कालकाताकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या थांबवून रेल रोको आंदोलन यशस्वी करावे. सेवाग्राम स्वातंत्र्यलढ्याचे महत्वाचे ठिकाण आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे याकरीता या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन अ‍ॅड. चटप यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)