शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

रेल्वे रॅक पॉर्इंटअभावी माल वाहतुकीत अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:27 IST

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव धूळ खात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकºयांसह व्यापाºयांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.भंडारा शहर राष्ट्रीय महामहामार्ग आणि मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्टेशन आहे. भंडारा शहरापासून १० कि़मी. अंतरावर वरठी रोड येथे प्रवासी रेल्वे स्थानक आहेत. तसेच काही वर्षांपुर्वी शहरात सुद्धा रेल्वे येत होती. आयुध निर्माणीसाठी ही रेल्वे भंडारा शहरातून जात होती. परंतु आता ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. भंडारा शहर ते भंडारा रोड अशी शटल रेल्वे सुरू करण्याचीही मागणी अनेक वर्षांपासून आहे. या मागणीकडेही दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे भंडारा येथे रॅक पॉर्इंट सुरू करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून आहे. भंडारा शहरात रेल्वेची ६५ एकर जागा आहे. या रॅक पॉर्इंटसाठी रेल्वेच्या वतीने दोन-तीनदा पाहणी करण्यात आली. परंतु अद्यापर्यंत रॅक पॉर्इंटला मंजुरी दिली नाही.याठिकाणी रॅक पॉर्इंट मंजुर झाल्यास शहरी व ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच शेतकरी आणि व्यापाºयांना माल वाहतुक सोईची होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांना प्रेमचंद डोरले, संतोष राजगीरे, सुनिल लेंडे व शेकडो नागरिकांनी निवेदन दिले आहे. आता याप्रकरणी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वरठी येथे सुपरफास्टला थांबा द्याभंडारा या जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या वरठीरोड रेल्वे स्टेशनवर सुपरफास्ट गाड्यांना थांबा नाही तब्बत २२ सुफरफास्ट गाड्या थांबत नाही. याठिकाणी ज्ञानेश्वरी, हावडा-हापा, हावडा-पोरबंदर, बिलासपूर-पुणे, एलटीटी-भुवनेश्वर, पुरी-शिर्डी, पुरी-अजमेर आदी सुपरफास्ट रेल्वेंना थांबा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच वरठी रेल्वेस्टेशनचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी निवेदनात केली आहे.