शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

रेल्वे रॅक पॉर्इंटअभावी माल वाहतुकीत अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:27 IST

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव धूळ खात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकºयांसह व्यापाºयांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.भंडारा शहर राष्ट्रीय महामहामार्ग आणि मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्टेशन आहे. भंडारा शहरापासून १० कि़मी. अंतरावर वरठी रोड येथे प्रवासी रेल्वे स्थानक आहेत. तसेच काही वर्षांपुर्वी शहरात सुद्धा रेल्वे येत होती. आयुध निर्माणीसाठी ही रेल्वे भंडारा शहरातून जात होती. परंतु आता ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. भंडारा शहर ते भंडारा रोड अशी शटल रेल्वे सुरू करण्याचीही मागणी अनेक वर्षांपासून आहे. या मागणीकडेही दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे भंडारा येथे रॅक पॉर्इंट सुरू करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून आहे. भंडारा शहरात रेल्वेची ६५ एकर जागा आहे. या रॅक पॉर्इंटसाठी रेल्वेच्या वतीने दोन-तीनदा पाहणी करण्यात आली. परंतु अद्यापर्यंत रॅक पॉर्इंटला मंजुरी दिली नाही.याठिकाणी रॅक पॉर्इंट मंजुर झाल्यास शहरी व ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच शेतकरी आणि व्यापाºयांना माल वाहतुक सोईची होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांना प्रेमचंद डोरले, संतोष राजगीरे, सुनिल लेंडे व शेकडो नागरिकांनी निवेदन दिले आहे. आता याप्रकरणी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वरठी येथे सुपरफास्टला थांबा द्याभंडारा या जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या वरठीरोड रेल्वे स्टेशनवर सुपरफास्ट गाड्यांना थांबा नाही तब्बत २२ सुफरफास्ट गाड्या थांबत नाही. याठिकाणी ज्ञानेश्वरी, हावडा-हापा, हावडा-पोरबंदर, बिलासपूर-पुणे, एलटीटी-भुवनेश्वर, पुरी-शिर्डी, पुरी-अजमेर आदी सुपरफास्ट रेल्वेंना थांबा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच वरठी रेल्वेस्टेशनचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी निवेदनात केली आहे.