शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

दिघोरी परिसरात रबी पिकांच्या लागवडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:00 IST

दिवसागणिक पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत चालली. शेतीला सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवत होती.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजना ठरली वरदान : विभागीय आयुक्तांनी केली विविध कामांची पाहणी

मुकेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : दिवसागणिक पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत चालली. शेतीला सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवत होती. नेमकी हीच गोष्ट हेरून महाराष्ट्र शासनाने गावांगावात जलयुक्त शिवार योजना अंमलात आणून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. दिघोरीत केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा फायदा मिळाला असून रब्बी हंगामातील पिकपेरा दिडपटीने वाढण्यास मदत झाली.जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये १० विहीरींना पुर्नभरणाची सोय करण्यात आली. यामुळे बंद असलेल्या विहिरीत पुन्हा पाण्याचा स्त्रोत दिसू लागला. ३५ टक्के पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून येते.वनविभागामार्फत जंगलव्याप्त व गावाशेजारी १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आली. जवळपास २५ हेक्टर परिसरात खोलवर तयार करण्यात आले. यामुळे पावसाचे पाणी थेट नदी-नाले यामध्ये वाहून न जाता जमिनीत मुरते व उर्वरित पाणी साठवण तलावात जमा होते. यामुळे परिसरातील झाडे व पिकांना याचा फायदा झाला असून चोहीकडे हिरवी शाल पांघरल्याचा भास जलशिवार योजनेमुळे होत आहे.यापुर्वी तयार करण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांची नव्याने दुरूस्ती करून संपूर्ण लिकेज बंद करण्यात आला. यामुळे पावसाचे पाणी थेट वाहून न जाता बंधाºयात साचून राहिले. बंधाºयालगतच्या शेतकºयांना पावसाने दडी मारल्यावर पीक वाचविणे शक्य झाले. ज्या पिकाला एकही पाणी देणे शक्य नव्हते, त्या शेतकºयांनी बंधाºयामुळे दुबार पिक घेतले आहे.शेतात गहू, उडीद, मुंग, हरभरा, मोहरी, लाखोरी आदी पिकांची लागवड केल्याचे आढळून आले. यासोबतच जलयुक्त शिवार योजनेतून सात वन तलाव, तीन साठवण तलाव, लोकसहभागातून सात तलावातील गाळ काढण्यात आली. तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आले. विभागीय कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी भेट देवून कामांचा आढाा घेतला. दिघोरीची निवड विभागीय जलयुक्त शिवार स्पर्धेसाठी झाले असल्याचे सांगितले. यावेळी अरुण गभने, रोहिदास देशमुख, शिंदे, निलेश गेडाम, काकडे, दसेरीया, वनक्षेत्राधिकारी दिघोरी, रंगारी, पी. येरणे, हेडाऊ, अशोक चुटे, रवी हटवार उपस्थित होते.दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेचे सर्व कामे उत्कृष्ठपणे केल्या गेले आहेत. झालेल्या कामामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता आले. तसेच भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने दुबार पिक घेण्याची संधी दिघोरी वासीयांना प्राप्त झाली आहे. कृषी विभाग दिघोरीवासीयांसाठी जलसंधारणाचे फायदे पटवून देण्यासाठी जनजागृती करणार आहे.-निलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, लाखांदूर.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार