शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दिघोरी परिसरात रबी पिकांच्या लागवडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:00 IST

दिवसागणिक पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत चालली. शेतीला सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवत होती.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजना ठरली वरदान : विभागीय आयुक्तांनी केली विविध कामांची पाहणी

मुकेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : दिवसागणिक पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत चालली. शेतीला सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवत होती. नेमकी हीच गोष्ट हेरून महाराष्ट्र शासनाने गावांगावात जलयुक्त शिवार योजना अंमलात आणून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. दिघोरीत केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा फायदा मिळाला असून रब्बी हंगामातील पिकपेरा दिडपटीने वाढण्यास मदत झाली.जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये १० विहीरींना पुर्नभरणाची सोय करण्यात आली. यामुळे बंद असलेल्या विहिरीत पुन्हा पाण्याचा स्त्रोत दिसू लागला. ३५ टक्के पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून येते.वनविभागामार्फत जंगलव्याप्त व गावाशेजारी १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आली. जवळपास २५ हेक्टर परिसरात खोलवर तयार करण्यात आले. यामुळे पावसाचे पाणी थेट नदी-नाले यामध्ये वाहून न जाता जमिनीत मुरते व उर्वरित पाणी साठवण तलावात जमा होते. यामुळे परिसरातील झाडे व पिकांना याचा फायदा झाला असून चोहीकडे हिरवी शाल पांघरल्याचा भास जलशिवार योजनेमुळे होत आहे.यापुर्वी तयार करण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांची नव्याने दुरूस्ती करून संपूर्ण लिकेज बंद करण्यात आला. यामुळे पावसाचे पाणी थेट वाहून न जाता बंधाºयात साचून राहिले. बंधाºयालगतच्या शेतकºयांना पावसाने दडी मारल्यावर पीक वाचविणे शक्य झाले. ज्या पिकाला एकही पाणी देणे शक्य नव्हते, त्या शेतकºयांनी बंधाºयामुळे दुबार पिक घेतले आहे.शेतात गहू, उडीद, मुंग, हरभरा, मोहरी, लाखोरी आदी पिकांची लागवड केल्याचे आढळून आले. यासोबतच जलयुक्त शिवार योजनेतून सात वन तलाव, तीन साठवण तलाव, लोकसहभागातून सात तलावातील गाळ काढण्यात आली. तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आले. विभागीय कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी भेट देवून कामांचा आढाा घेतला. दिघोरीची निवड विभागीय जलयुक्त शिवार स्पर्धेसाठी झाले असल्याचे सांगितले. यावेळी अरुण गभने, रोहिदास देशमुख, शिंदे, निलेश गेडाम, काकडे, दसेरीया, वनक्षेत्राधिकारी दिघोरी, रंगारी, पी. येरणे, हेडाऊ, अशोक चुटे, रवी हटवार उपस्थित होते.दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेचे सर्व कामे उत्कृष्ठपणे केल्या गेले आहेत. झालेल्या कामामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता आले. तसेच भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने दुबार पिक घेण्याची संधी दिघोरी वासीयांना प्राप्त झाली आहे. कृषी विभाग दिघोरीवासीयांसाठी जलसंधारणाचे फायदे पटवून देण्यासाठी जनजागृती करणार आहे.-निलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, लाखांदूर.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार