शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

५७ हजार हेक्टरवरील रबी पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून १७ हजार ५५० लागवड झाली आहे. गहू पिकांची ११ हजार ३२ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : खरीपानंतर शेतकरी पुन्हा संकटात

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ५७ हजार ४७६ हेक्टरवरील रबी हंगाम धोक्यात आला आहे. गत तीन दिवसांपासून तर सारखा अवकाळी पाऊस बरसत आहे. गुरूवारच्या रात्री रात्रभर बरसलेल्या पावसाने शेतशिवारात सर्वत्र पाणी साचले होते.जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून १७ हजार ५५० लागवड झाली आहे. गहू पिकांची ११ हजार ३२ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी रबी हंगामात गहू, हरभरा, वाटाणा, लाखोळी, मुग उडीद, सोयाबीन, जवस पोपट, भाजीपाला, भूईमुग, ऊस, मसूर, मोहरी, मिरची आदी पिकांची लागवड करीत असतात.यावर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामातील भर रबी हंगामात भरून निघावी यासाठी मोठ्या आशेने शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केली. कृषी विभागाने मात्र उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे प्रमाण आणि सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा अंदाज घेऊन नियोजन केले होते. कृषी विभागाच्या नियोजनाला अवकाळी पावसाचा मोठा आधार झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने रबीच्या पेरणीला जवळपास महिनाभराचा विलंब झाला.तथापि जमीनी पेरणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यातच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या पेरणीवर शेतकºयांनी भर दिला. भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात ९ हजार ९६२.९६ सर्वसाधारण हेक्टरपैकी ७७४६.२८ हेक्टरमध्ये रबी पिकांची लागवड करण्यात आली आहे. याप्रमाणेच मोहाडी ६ हजार ८४६ हेक्टरपैकी ७०२३, तुमसर तालुक्यात ६ हजार २९० हेक्टरपैकी ५५२७.९० पवनी १४ हजार ९२८ पैकी १४,६१४.५०, साकोली ३३६२ हेक्टरपैकी ४३४४, लाखनी ६४१५.१० पैकी ६१८६.१५ तर लाखांदूर ८३८४ हेक्टरपैकी १२०३५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली.रबी पिके सुरुवातीला जोमात असताना शेतकऱ्यांची उत्पादनाची आशा वाढली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोन-तीनदा अवकाळी पाऊस बरसत असल्याने रबी पिके संकटात सापडली आहेत.कृषी विभागाचे उपाययोजनांकडे दुर्लक्षखरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात मार्गदर्शन मिळाले नाही. रबी हंगामात शेतकºयांना लागवडीसंदर्भात जनजागृती करणे गरजेचे असताना केवळ कागदोपत्री घोडे नाचवून जनजागृतीचा ढिंढोरा पिटल्याचे शेतकरी सांगतात. रबी पिकांवर वातावरणाचा फटका बसत असून उत्पादनात कमालीची वाढ होण्याची शक्यताही कृषी विभाग सांगत आहे. मात्र उपाययोजना शून्य असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.रात्रभर बरसला पाऊसभंडारा शहरासह जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत पाऊस बरसत होता. दिवसभर ढगाळी वातावरण आणि पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात पुन्हा जोरदार अवकाळी पावसाला सुरूवात झाली

टॅग्स :agricultureशेती