शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

५७ हजार हेक्टरवरील रबी पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून १७ हजार ५५० लागवड झाली आहे. गहू पिकांची ११ हजार ३२ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : खरीपानंतर शेतकरी पुन्हा संकटात

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ५७ हजार ४७६ हेक्टरवरील रबी हंगाम धोक्यात आला आहे. गत तीन दिवसांपासून तर सारखा अवकाळी पाऊस बरसत आहे. गुरूवारच्या रात्री रात्रभर बरसलेल्या पावसाने शेतशिवारात सर्वत्र पाणी साचले होते.जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून १७ हजार ५५० लागवड झाली आहे. गहू पिकांची ११ हजार ३२ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी रबी हंगामात गहू, हरभरा, वाटाणा, लाखोळी, मुग उडीद, सोयाबीन, जवस पोपट, भाजीपाला, भूईमुग, ऊस, मसूर, मोहरी, मिरची आदी पिकांची लागवड करीत असतात.यावर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामातील भर रबी हंगामात भरून निघावी यासाठी मोठ्या आशेने शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केली. कृषी विभागाने मात्र उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे प्रमाण आणि सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा अंदाज घेऊन नियोजन केले होते. कृषी विभागाच्या नियोजनाला अवकाळी पावसाचा मोठा आधार झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने रबीच्या पेरणीला जवळपास महिनाभराचा विलंब झाला.तथापि जमीनी पेरणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यातच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या पेरणीवर शेतकºयांनी भर दिला. भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात ९ हजार ९६२.९६ सर्वसाधारण हेक्टरपैकी ७७४६.२८ हेक्टरमध्ये रबी पिकांची लागवड करण्यात आली आहे. याप्रमाणेच मोहाडी ६ हजार ८४६ हेक्टरपैकी ७०२३, तुमसर तालुक्यात ६ हजार २९० हेक्टरपैकी ५५२७.९० पवनी १४ हजार ९२८ पैकी १४,६१४.५०, साकोली ३३६२ हेक्टरपैकी ४३४४, लाखनी ६४१५.१० पैकी ६१८६.१५ तर लाखांदूर ८३८४ हेक्टरपैकी १२०३५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली.रबी पिके सुरुवातीला जोमात असताना शेतकऱ्यांची उत्पादनाची आशा वाढली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोन-तीनदा अवकाळी पाऊस बरसत असल्याने रबी पिके संकटात सापडली आहेत.कृषी विभागाचे उपाययोजनांकडे दुर्लक्षखरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात मार्गदर्शन मिळाले नाही. रबी हंगामात शेतकºयांना लागवडीसंदर्भात जनजागृती करणे गरजेचे असताना केवळ कागदोपत्री घोडे नाचवून जनजागृतीचा ढिंढोरा पिटल्याचे शेतकरी सांगतात. रबी पिकांवर वातावरणाचा फटका बसत असून उत्पादनात कमालीची वाढ होण्याची शक्यताही कृषी विभाग सांगत आहे. मात्र उपाययोजना शून्य असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.रात्रभर बरसला पाऊसभंडारा शहरासह जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत पाऊस बरसत होता. दिवसभर ढगाळी वातावरण आणि पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात पुन्हा जोरदार अवकाळी पावसाला सुरूवात झाली

टॅग्स :agricultureशेती