शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

संशयावरून आणखी ११ व्यक्ती क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

११ जणांच्या स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील काही व्यक्ती दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापुर्वी मिळाली होती. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान बुधवारी दोन व्यक्तींना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देदिल्ली-भंडारा रेल्वे प्रवास : सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मरकज काळात रेल्वे प्रवास करणाऱ्या शहरातील ११ व्यक्तींना संशयावरून शुक्रवारी हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले. आता जिल्ह्यातील दोन जण मरकजमध्ये सहभागी झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना गुरूवारी हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले होते. ११ जणांच्या स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.भंडारा जिल्ह्यातील काही व्यक्ती दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापुर्वी मिळाली होती. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान बुधवारी दोन व्यक्तींना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान प्रशासनाकडून शोध सुरू असताना शुक्रवारी संशयावरून ११ व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले. मात्र चौकशीत ते मरकजमध्ये सहभागी झाल्याचे आढळून आले नाही. ९ मार्च रोजी सात जण संपर्कक्रांती एक्सप्रेसने दिल्लीहून नागपूरला पोहचले. तेथून १२ मार्चला भंडारा येथे दाखल झाले. त्यांच्याकडील रेल्वे प्रवासाच्या तिकीटही उपलब्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर उर्वरित चार जण १५ मार्च रोजी गोंडवाना एक्प्रेसने जनरल डब्यातून प्रवास करत १६ मार्चला भंडारा येथे पोहचले होते. या सर्वांना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ११ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना केल्या जात असून हॉस्पिटल क्वारंटाईन आणि होम क्वारंटाईन केले जात आहे. विलगीकरण कक्षात आता ३४ जणांना दाखल करण्यात आले असून तेथून २२ जणांना सुटी देण्यात आली आहे.१२ हजारावर व्यक्ती होम क्वारंटाईनजिल्ह्यातील १० व्यक्ती आयसोलेशन वॉर्डातकोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून जिल्ह्यातील दहा व्यक्तींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे.मुंबई-पुण्यासह महानगरातून जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १२ हजार व्यक्ती दाखल झाल्या होत्या. त्यांची रॅपिड रिस्पॉन्स टीमने भेट घेवून सूचना दिल्या. या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. तर परदेशातून आलेल्या २२ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वाेतोपरी उपाययोजना केल्या जात असून जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नऊ चेकपोस्टवर प्रत्येकाची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या