शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

आईच्या डोक्यावर सैनिकी कॅप ठेवून 'ती' झाली नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2022 07:45 IST

Bhandara News सशस्त्र सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आलेल्या अर्चना गायधने या कर्तृत्ववान मुलीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अर्चनाने आपली सैनिकी कॅप आईच्या डोक्यात घातली आणि पायावर नतमस्तक झाली.

ठळक मुद्दे कुशारीची अर्चना सशस्त्र सीमा बलातगावात जल्लोष

राजू बांते

भंडारा : सशस्त्र सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आलेल्या अर्चना गायधने या कर्तृत्ववान मुलीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. तिचे औक्षण करताना आईचे डोळे पाणावले. यावेळी अर्चनाने आपली सैनिकी कॅप आईच्या डोक्यात घातली आणि पायावर नतमस्तक झाली. क्षणाचे साक्षीदार असणारे गावकरी भारावून गेले होते. ही कर्तृत्ववान तरुणी माेहाडी तालुक्यातील कुशारी येथील शालिकराम गायधने यांची लेक आहे.

बिहार राज्यातून प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आली. स्वागतासाठी संपूर्ण गाव वेशीवर जमा झाले होते. अर्चनाने गावच्या वेशीवर पाय ठेवताच ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. आई शीलाने आपल्या लेकीचे औक्षण केले. त्या क्षणी मुलीने आपली सैनिकी कॅप (टोपी) आईच्या शिरपेचात घातली. त्या क्षणी निशब्द झालेल्या जनसमुदायाची अभिमानाने मान उंचावली. तब्बल दोन तास गावात भ्रमंती करून गौरव क्षणाच्या आनंदाला उधाण आला होता. अर्चना गायधने हिने पहिल्या प्रयत्नात सशस्त्र सीमा बलात भरतीमध्ये यशाला गवसणी घातली.

आई आजही दुसऱ्याच्या शेतीवर मजूर म्हणून कामाला जाते. सन २०१३ मध्ये अर्चनाच्या वडिलांचा मृत्यू झाला. आईला धीर देत मी एक दिवस आपल्या देशाची सैनिकी वर्दी घालूनच गावात येणार, असे सांगून दिलेले वचन तिने पूर्ण केले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. जगदीश दिपटे, प्रकाश महालगावे, वासनिक, गिरेपुंजे या शिक्षकांनी संस्कार दिले. शिक्षणात खंड पडू न देता ती आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अतिरिक्त वेळ खर्ची घालायची.

जिद्दी प्रयत्नांना यश

देशसेवेची इच्छा मनात असल्याने ती शालेय जीवनापासून नियमित सराव करायची. दररोज सकाळी उठणे व धावायला जाणे त्यानंतर कॉलेज व पुन्हा व्यायाम असा तिचा नित्यक्रम असायचा. तिच्या जिद्दी प्रयत्नांनी यश मिळाले. अर्चनाच्या जिद्दीला आईने नेहमी बळ दिले. यामुळे तिला सहज यश गाठता आले. तिच्या प्रेरणेने गावातील युवक युवतींना स्फूर्ती मिळाली. यावेळी कुशारी ग्रामपंचायतचे सदस्य लोकेश गायधने, आदर्श बडवाईक, तेजस मोहतुरे, पत्रकार यशवंत थोटे आदींनी तिचे कौतुक केले.

पालकांनी मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा. तिला पुढे जाण्याची प्रेरणा दिली पाहिजे. मुलींनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. स्वावलंबी होण्यासाठी कठोर प्रयत्न केले पाहिजेत. मुली अबला नको रणांगणी बनावे.

- अर्चना गायधने

टॅग्स :Socialसामाजिक