शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आईच्या डोक्यावर सैनिकी कॅप ठेवून 'ती' झाली नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2022 07:45 IST

Bhandara News सशस्त्र सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आलेल्या अर्चना गायधने या कर्तृत्ववान मुलीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अर्चनाने आपली सैनिकी कॅप आईच्या डोक्यात घातली आणि पायावर नतमस्तक झाली.

ठळक मुद्दे कुशारीची अर्चना सशस्त्र सीमा बलातगावात जल्लोष

राजू बांते

भंडारा : सशस्त्र सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आलेल्या अर्चना गायधने या कर्तृत्ववान मुलीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. तिचे औक्षण करताना आईचे डोळे पाणावले. यावेळी अर्चनाने आपली सैनिकी कॅप आईच्या डोक्यात घातली आणि पायावर नतमस्तक झाली. क्षणाचे साक्षीदार असणारे गावकरी भारावून गेले होते. ही कर्तृत्ववान तरुणी माेहाडी तालुक्यातील कुशारी येथील शालिकराम गायधने यांची लेक आहे.

बिहार राज्यातून प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आली. स्वागतासाठी संपूर्ण गाव वेशीवर जमा झाले होते. अर्चनाने गावच्या वेशीवर पाय ठेवताच ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. आई शीलाने आपल्या लेकीचे औक्षण केले. त्या क्षणी मुलीने आपली सैनिकी कॅप (टोपी) आईच्या शिरपेचात घातली. त्या क्षणी निशब्द झालेल्या जनसमुदायाची अभिमानाने मान उंचावली. तब्बल दोन तास गावात भ्रमंती करून गौरव क्षणाच्या आनंदाला उधाण आला होता. अर्चना गायधने हिने पहिल्या प्रयत्नात सशस्त्र सीमा बलात भरतीमध्ये यशाला गवसणी घातली.

आई आजही दुसऱ्याच्या शेतीवर मजूर म्हणून कामाला जाते. सन २०१३ मध्ये अर्चनाच्या वडिलांचा मृत्यू झाला. आईला धीर देत मी एक दिवस आपल्या देशाची सैनिकी वर्दी घालूनच गावात येणार, असे सांगून दिलेले वचन तिने पूर्ण केले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. जगदीश दिपटे, प्रकाश महालगावे, वासनिक, गिरेपुंजे या शिक्षकांनी संस्कार दिले. शिक्षणात खंड पडू न देता ती आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अतिरिक्त वेळ खर्ची घालायची.

जिद्दी प्रयत्नांना यश

देशसेवेची इच्छा मनात असल्याने ती शालेय जीवनापासून नियमित सराव करायची. दररोज सकाळी उठणे व धावायला जाणे त्यानंतर कॉलेज व पुन्हा व्यायाम असा तिचा नित्यक्रम असायचा. तिच्या जिद्दी प्रयत्नांनी यश मिळाले. अर्चनाच्या जिद्दीला आईने नेहमी बळ दिले. यामुळे तिला सहज यश गाठता आले. तिच्या प्रेरणेने गावातील युवक युवतींना स्फूर्ती मिळाली. यावेळी कुशारी ग्रामपंचायतचे सदस्य लोकेश गायधने, आदर्श बडवाईक, तेजस मोहतुरे, पत्रकार यशवंत थोटे आदींनी तिचे कौतुक केले.

पालकांनी मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा. तिला पुढे जाण्याची प्रेरणा दिली पाहिजे. मुलींनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. स्वावलंबी होण्यासाठी कठोर प्रयत्न केले पाहिजेत. मुली अबला नको रणांगणी बनावे.

- अर्चना गायधने

टॅग्स :Socialसामाजिक