शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

आईच्या डोक्यावर सैनिकी कॅप ठेवून 'ती' झाली नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2022 07:45 IST

Bhandara News सशस्त्र सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आलेल्या अर्चना गायधने या कर्तृत्ववान मुलीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अर्चनाने आपली सैनिकी कॅप आईच्या डोक्यात घातली आणि पायावर नतमस्तक झाली.

ठळक मुद्दे कुशारीची अर्चना सशस्त्र सीमा बलातगावात जल्लोष

राजू बांते

भंडारा : सशस्त्र सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आलेल्या अर्चना गायधने या कर्तृत्ववान मुलीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. तिचे औक्षण करताना आईचे डोळे पाणावले. यावेळी अर्चनाने आपली सैनिकी कॅप आईच्या डोक्यात घातली आणि पायावर नतमस्तक झाली. क्षणाचे साक्षीदार असणारे गावकरी भारावून गेले होते. ही कर्तृत्ववान तरुणी माेहाडी तालुक्यातील कुशारी येथील शालिकराम गायधने यांची लेक आहे.

बिहार राज्यातून प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आली. स्वागतासाठी संपूर्ण गाव वेशीवर जमा झाले होते. अर्चनाने गावच्या वेशीवर पाय ठेवताच ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. आई शीलाने आपल्या लेकीचे औक्षण केले. त्या क्षणी मुलीने आपली सैनिकी कॅप (टोपी) आईच्या शिरपेचात घातली. त्या क्षणी निशब्द झालेल्या जनसमुदायाची अभिमानाने मान उंचावली. तब्बल दोन तास गावात भ्रमंती करून गौरव क्षणाच्या आनंदाला उधाण आला होता. अर्चना गायधने हिने पहिल्या प्रयत्नात सशस्त्र सीमा बलात भरतीमध्ये यशाला गवसणी घातली.

आई आजही दुसऱ्याच्या शेतीवर मजूर म्हणून कामाला जाते. सन २०१३ मध्ये अर्चनाच्या वडिलांचा मृत्यू झाला. आईला धीर देत मी एक दिवस आपल्या देशाची सैनिकी वर्दी घालूनच गावात येणार, असे सांगून दिलेले वचन तिने पूर्ण केले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. जगदीश दिपटे, प्रकाश महालगावे, वासनिक, गिरेपुंजे या शिक्षकांनी संस्कार दिले. शिक्षणात खंड पडू न देता ती आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अतिरिक्त वेळ खर्ची घालायची.

जिद्दी प्रयत्नांना यश

देशसेवेची इच्छा मनात असल्याने ती शालेय जीवनापासून नियमित सराव करायची. दररोज सकाळी उठणे व धावायला जाणे त्यानंतर कॉलेज व पुन्हा व्यायाम असा तिचा नित्यक्रम असायचा. तिच्या जिद्दी प्रयत्नांनी यश मिळाले. अर्चनाच्या जिद्दीला आईने नेहमी बळ दिले. यामुळे तिला सहज यश गाठता आले. तिच्या प्रेरणेने गावातील युवक युवतींना स्फूर्ती मिळाली. यावेळी कुशारी ग्रामपंचायतचे सदस्य लोकेश गायधने, आदर्श बडवाईक, तेजस मोहतुरे, पत्रकार यशवंत थोटे आदींनी तिचे कौतुक केले.

पालकांनी मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा. तिला पुढे जाण्याची प्रेरणा दिली पाहिजे. मुलींनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. स्वावलंबी होण्यासाठी कठोर प्रयत्न केले पाहिजेत. मुली अबला नको रणांगणी बनावे.

- अर्चना गायधने

टॅग्स :Socialसामाजिक