शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कामे प्रलंबित ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:42 IST

जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करा. जे कंत्राटदार काम प्रलंबित ठेवतील, अशा कंत्राटदारांना काळया यादीत घालण्यात येईल. तसेच त्यांना जिल्हयात कोणतीही कामे देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार : खिंडसी प्रकल्पातून सुर नदीत ३०० क्युबिक पाणी सोडणार, जिल्हाधिकाºयांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करा. जे कंत्राटदार काम प्रलंबित ठेवतील, अशा कंत्राटदारांना काळया यादीत घालण्यात येईल. तसेच त्यांना जिल्हयात कोणतीही कामे देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या. गाळयुक्त शिवार व गाळमुक्त तलाव योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. जेसीपी उपलब्ध करुन घ्यावे. त्यासाठी लागणारे इंधनाची सोय करण्यात येईल, असे ते म्हणाले.जलयुक्त शिवार, गाळमुक्त तलाव व पाणी टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उपवन संरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, उप कार्यकारी अधिकरी मंजूषा ठवकर, कार्यकारी अभियंता मैदमवार, उपविभागीय अधिकारी सुजाता गंधे, शिल्पा सोनाले, तहसिलदार अर्चना मोरे यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी उपस्थित होते.यावेळी जलयुक्त शिवार कामांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. गाळयुक्त शिवार व गाळमुक्त तलाव योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. त्यासाठी लागणारे जेसीपी उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यंत्रणांना दिल्या. तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी व खंड विकास अधिकारी यांनी संयुक्तीक काम करुन कामास गती दयावी. तहसिलदारांनी वेळोवेळी या कामांचा आढावा घ्यावा. लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामावर भर दयावा. यासाठी सरपंच व जिल्हा परिषद सदस्याचे सहकार्य घ्यावे.प्रत्येक उपविभागात एका तालुक्यात तीन कामे घ्यावीत, त्याचा आढावा उपविभागीय अधिकाºयांनी घ्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कंत्राटदार काम करण्यास तयार नसतील तर सोसायटयामार्फत तसेच बेरोजगारांमार्फत काम करवून घ्या व कामाची गती वाढवा.अकार्यक्ष्म कंत्राटदाराकडून कामे प्रलंबित राहीली तर त्यांना काळया यादीत टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के कामे पूर्ण करा. यंत्रणांमध्ये समन्वय कमी आहे, तो वाढवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. पाणी टंचाईबाबत नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच खिंडसी प्रकल्पातून सूर नदीत ३०० क्युबिक पाणी सोडण्यात येत असून १.२ क्युबिक पाणी सोडले जात आहे. तसेच इटियाडोह धरणातून लाखांदूर तालुक्यात पाणी सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीस संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.