शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कामे प्रलंबित ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:42 IST

जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करा. जे कंत्राटदार काम प्रलंबित ठेवतील, अशा कंत्राटदारांना काळया यादीत घालण्यात येईल. तसेच त्यांना जिल्हयात कोणतीही कामे देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार : खिंडसी प्रकल्पातून सुर नदीत ३०० क्युबिक पाणी सोडणार, जिल्हाधिकाºयांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करा. जे कंत्राटदार काम प्रलंबित ठेवतील, अशा कंत्राटदारांना काळया यादीत घालण्यात येईल. तसेच त्यांना जिल्हयात कोणतीही कामे देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या. गाळयुक्त शिवार व गाळमुक्त तलाव योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. जेसीपी उपलब्ध करुन घ्यावे. त्यासाठी लागणारे इंधनाची सोय करण्यात येईल, असे ते म्हणाले.जलयुक्त शिवार, गाळमुक्त तलाव व पाणी टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उपवन संरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, उप कार्यकारी अधिकरी मंजूषा ठवकर, कार्यकारी अभियंता मैदमवार, उपविभागीय अधिकारी सुजाता गंधे, शिल्पा सोनाले, तहसिलदार अर्चना मोरे यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी उपस्थित होते.यावेळी जलयुक्त शिवार कामांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. गाळयुक्त शिवार व गाळमुक्त तलाव योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. त्यासाठी लागणारे जेसीपी उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यंत्रणांना दिल्या. तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी व खंड विकास अधिकारी यांनी संयुक्तीक काम करुन कामास गती दयावी. तहसिलदारांनी वेळोवेळी या कामांचा आढावा घ्यावा. लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामावर भर दयावा. यासाठी सरपंच व जिल्हा परिषद सदस्याचे सहकार्य घ्यावे.प्रत्येक उपविभागात एका तालुक्यात तीन कामे घ्यावीत, त्याचा आढावा उपविभागीय अधिकाºयांनी घ्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कंत्राटदार काम करण्यास तयार नसतील तर सोसायटयामार्फत तसेच बेरोजगारांमार्फत काम करवून घ्या व कामाची गती वाढवा.अकार्यक्ष्म कंत्राटदाराकडून कामे प्रलंबित राहीली तर त्यांना काळया यादीत टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के कामे पूर्ण करा. यंत्रणांमध्ये समन्वय कमी आहे, तो वाढवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. पाणी टंचाईबाबत नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच खिंडसी प्रकल्पातून सूर नदीत ३०० क्युबिक पाणी सोडण्यात येत असून १.२ क्युबिक पाणी सोडले जात आहे. तसेच इटियाडोह धरणातून लाखांदूर तालुक्यात पाणी सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीस संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.