शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर घटनेच्या नावाखाली विरोधकांचे निव्वळ राजकारण - प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:15 IST

देशाला आज सक्षम सरकारची गरज आहे. त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

भंडारा : मणिपुरात घडलेली घटना निंदनीय आणि दु:खदायकही आहेच. या घटनेची सरकारलाही चिंता आहे. या घटनेप्रति सरकार संवेदनशील असतानाही विरोधक मात्र या घटनेच्या नावाखाली निव्वळ राजकारण करत आहेत. राजकारण करण्याचा हा विषय नाही, हे सर्वांनी समजून घ्यावे, असे प्रतिपादन खासदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले.

भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येथील विश्रामगृहावर थांबले असता पत्रकारांशी केलेल्या वार्तालापादरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले, मणिपुरातील घटनेच्या पाहणीसाठी गृहमंत्र्यांनी तिथे दौरा केला. तेथील समस्या समजून घेतली. वेळेची चिंता न करता सभागृहात या विषयावर पूर्ण वेळ चर्चा करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. तरीही विरोधक या घटनेवर राजकारण करीत आहेत. तेथील समस्या आणि प्रश्न वेगळे आहेत, हे विरोधकांनी आधी समजून घ्यावे.

निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांना मिळालेली नोटीस हा प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी या घडामोडीवर अधिक बोलणे टाळले. राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित १२ आमदारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून कॅबिनेटच्या शिफारशीनंतर मंजुरी मिळेल, असे सांगून त्यांनी स्थानिक नेत्यांच्या नावांबद्दल सुरू असलेल्या चर्चेला तूर्तास अर्धविराम दिला.

राज्याच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एनडीएसोबत

देशाला आज सक्षम सरकारची गरज आहे. त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. एनडीएचे घटक म्हणून आम्ही काम करू, जबाबदारी पार पाडू, असे ते म्हणाले. अजित पवार मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर शिंदे मुख्यमंत्री पदावर आहेत, असे सांगून त्यांनी प्रश्न टोलावला.

टॅग्स :PoliticsराजकारणPraful Patelप्रफुल्ल पटेलbhandara-acभंडारा