शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

जिल्ह्यात दर शनिवार- रविवारी जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. मात्र त्या तुलनेत नागरिक काळजी घेताना दिसत नाही. त्याचप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनसुध्दा केले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देसर्वपक्षीय बैठकीत निर्णय : कोरोना साखळी तोडण्यासाठी केली जाणार कडक उपाययोजना, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात यायचे नाव घेत नसल्याने आता दर शनिवार - रविवारला जनता कर्फ्यूचे आयोजन करण्याचा निर्णय सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय सभेत घेण्यात आला. या जनता कर्फ्यूची सर्वत्र कडक अंमलबजावणी करण्याचेही ठरविण्यात आले असून पहिला जनता कर्फ्यू ३ व ४ आॅक्टोंबर रोजी जिल्ह्यात घोषित करण्यात आला आहे.जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. मात्र त्या तुलनेत नागरिक काळजी घेताना दिसत नाही. त्याचप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनसुध्दा केले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत वाढत्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. लोकांच्या मनात कोरोना आजाराविषयी भीती असल्यामुळे उशिरा तपासणीसाठी येतात. ही बाब गंभीर असून लक्षण आढळताच तपासणी करण्याबाबत नागरिकात जनजागृती करावी, असे सर्वांचे मत होते.जनता कर्फ्यू हा कडक आणि जिल्हाभर लागू करण्यात यावा, असे मत सर्वांनी मांडले. या काळात वैद्यकीय सेवा सुविधा वगळता सर्व दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात यावे, अशी सूचना सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी केली. यात प्रामुख्याने पेट्रोलपंप, दारु दुकान, ढाबा आदींचा बंदमध्ये समावेश असावा असा सुरही बैठकीत उमटला. परंतु आरोग्य सेवासुविधा कुठेही थांबणार नाही व बाधित होणार नाही याची काटेकार काळजी घेण्यावर सर्वांचे एकमत झाले.भाजीपाला दुकानाची व्यवस्था विकेंद्रीत असावी असेही या बैठकीत ठरले. खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचाराबाबत शासकीय दराचे फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावावे असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांनी रुग्णालयाला द्यावे. तुमसर येथे कोविड रुग्णालय उभारले असून लवकरच साकोली व पवनी येथे उभारण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडत जनता कर्फ्यूला पाठिंबा दिला. त्यामुळे आता दर शनिवार, रविवार कडक जनता कर्फ्यू आयोजित करण्यात येणार आहे.यावेळी बोलताना खासदार सुनील मेंढे म्हणाले, ही लढाई सर्वांची असून आपण सर्व एकत्रीतपणे लढा उभारण्याची गरज आहे. जनता कर्फ्यूला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, हा सर्वपक्षीय निर्णय असून आता अशा परिस्थितीत दुसरा कोणताच पर्याय नाही. नागरिकांनी शासकीय नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले सध्या तरी मास्क सुरक्षीत अंतर व वारंवार साबणाने स्वच्छ करणे हेच एकमेव कोरोनावरील औषध आहे. कुठलाही आजार अंगावर न काढता तात्काळ तपासणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद देवून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याची गरज आहे. मात्र अनेकदा नागरिक सर्व नियम पायदळी तुडवत रस्त्यावर गर्दी करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसते.पहिला जनता कर्फ्यू ३ व ४ ऑक्टोंबरकोरोना संक्रमानाची साखळी तोडण्यासाठी आता दर शनिवार, रविवारला जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला असून पहिला जनता कर्फ्यू ३ व ४ ऑक्टोंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात घोषित करण्यात आला आहे. याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्धजिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध असून आणखी तीन हजार इजेक्शनची मागणी नोंदविली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन शासनाकडून प्राप्त होत आहे. गंभीर रुग्णालाच हे इंजेक्शन दिले जाते. कृपया इतर रुग्णांनी या इंजेक्शनची मागणी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.