शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता अधांतरी

By admin | Updated: October 16, 2014 23:20 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या हेतूने समाजकल्याण (राज्य) कार्यायलाची निर्मिती करण्यात आली. मात्र निकषाप्रमाणे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत

भंडारा : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या हेतूने समाजकल्याण (राज्य) कार्यायलाची निर्मिती करण्यात आली. मात्र निकषाप्रमाणे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्तीसह देण्यात येणारा निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांच्या खातेपुस्तिकांवर जमा झाला नसल्याने विद्यार्थी या भत्त्यापासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांचा पैसा कुठे गायब झाला हा प्रश्न अधांतरी आहे. या आशयाची विचारणा विद्यार्थी करू लागला आहे.महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. यात अनुसूचित जाती, जमाती व इतर जातीतील विद्यार्थी तसेच अन्य प्रवर्ग वगळता शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क मिळून शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात येते. त्यापैकी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात निर्वाह भत्ता जमा करून उर्वरीत सर्व रक्कम संबंधित महाविद्यालयकडे सोपविण्यात येते.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृती वेळेवर मिळावी आणि शिष्यवृत्ती त्याच वर्षी मिळावी यासाठी शासनाने सन २०१२ पासून आॅनलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला बँकेत खाते उघडून त्याचे खाते क्रमांक समाजकल्याण विभागाकडे पाठविणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी ही योजना काटेकोरपणे राबविली. मात्र पाच वर्र्षांपासून जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता जमा झालाच नाही. निर्वाह भत्त्याची रक्कम मिळत नसेल तर शिष्यवृत्तीची गरज काय असा प्रश्न विद्यार्थी उपस्थितीत करीत आहेत. अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांला पाच हजार ५०० रुपये तर अन्य गटाला जवळपास २००० रुपये भत्ता मिळतो. समाजकल्याण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता त्यांच्या खात्यात जमा करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)