शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगशील तरूणांना तातडीने कर्ज द्या

By admin | Updated: October 23, 2016 01:05 IST

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तरूणांच्या हाताला उद्योग देण्यासाठी सुरु केलेल्या मुद्रा योजनेत

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : प्रत्येक शाखेने किमान २५ जणांना कर्ज देणे अनिवार्य भंडारा : प्रधानमंत्री मुद्रा योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तरूणांच्या हाताला उद्योग देण्यासाठी सुरु केलेल्या मुद्रा योजनेत बँकांनी त्यांच्याकडे मागणी करणाऱ्या प्रत्येक उद्योगशील तरूणाला मुद्रा योजनेत कर्ज देणे अनिवार्य असून प्रत्येक शाखेने किमान २५ जणांना कर्ज द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित बँकर्सची आढावा बैठकीत ते बोलत होते. अग्रणी बँक व्यवस्थापक विजय बागडे, नाबार्डचे अरविंद खापर्डे व बँक अधिकारी यावेळी उपस्थित होते.मुद्रा योजना, खरीप पिक कर्ज व रब्बी पिक कजार्चा या बैठकीत आढावा घेण्यात आला. जुनेच उद्योग करणाऱ्यांना कर्ज देण्यापेक्षा नवीन उद्योग सुरू करणाऱ्या युवकांना कर्ज देणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. मुद्रा योजनेत बँकांच्या शाखांनी कमीत कमी २५ प्रकरणे करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त कितीही केसेस करू शकता, असे ते म्हणाले. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी शिशु योजनेत जास्त केसेस केल्याचे निदर्शनास आले असता तरुण व किशोर योजनेत कर्ज देण्याचे निर्देश दिले.मुद्रा योजनेत कर्ज घेऊन उद्योग सुरु करण्याची इच्छा असणा?्या युवकांना बँक मोघम उत्तर देऊन त्यांचा अर्ज रद्द करत असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. यावर नाराजी व्यक्त करून यापुढे अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शाखा व्यवस्थापकावर कारवाईची शिफारस करण्यात येईल, असे सांगितले. केवळ उद्योगच नाही तर शेती पूरक व्यवसायाला सुध्दा या योजनेत कर्ज देण्यात यावे. आरसेटी व शासनाच्या विविध प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणा?्या युवकांना मुद्रा योजनेत प्राधान्याने कर्ज देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. नॉन परफॉर्मंस शाखांचा आढावा जिल्हा समन्वयकांनी शाखा निहाय घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुद्रा योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी यासाठी बँकांनी जनजागृती मोहीम, मेळावे घेणे व प्रत्येक शाखेत मुद्रा योजनेचा फलक लावणे आदी बाबी प्राधान्याने कराव्यात. मुद्रा योजनेतील प्रलंबित प्रकारणांचा निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत खरीप पिक कजार्चा आढावा घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी खरीप कर्ज देण्याची टक्केवारी सर्वच बँकांची कमी असल्याचे नमूद करून रबी पिकासाठी जास्तीत जास्त पिक कर्ज देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिल्या. पिक कर्ज घेण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असेही ते म्हणाले. बँक शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करणार नसतील तर बँकमधील शासनाच्या ठेवी वापस घेण्यावर विचार करावा लागेल असा ईशारा त्यांनी बँकाना दिला. रबी हंगामात आपला परफॉर्मंस सुधारावा, असे निर्देश त्यांनी बँकाना दिले. (शहर प्रतिनिधी)