शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

समृद्धी महामार्ग वादात ! मुख्यमंत्र्यांशी भेट न झाल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:20 IST

राजनी येथे विरोध : शेतकरी बसले उपोषणावर

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर :भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी, अशी लेखी मागणी केली होती. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला येथे २ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी मार्गातील शेतकऱ्यांशी कोणतीच वाटाघाटी न करता जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहे. यासंदर्भात अनेकवेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून प्रथम शेतीचे दर तसेच अन्य मागण्यांसंदर्भात चर्चा करावी ही मागणी केली. 

निवेदनाची दखल नाहीजिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, यासाठी लाखांदूर तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले होते. मात्र त्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने समृद्धी महामार्गातील पीडित शेतकरी विनोद ढोरे यांच्या नेतृत्वात प्रभू मेंढे, जयपाल भांडारकर, व्यंकट बेडेकर, जनार्दन भांडारकर, शिशुपाल भांडारकर, शीतल भांडारकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली

अशा आहेत प्रमुख मागण्यासमृद्धी महामार्गात गेलेल्या शेतजमिनीला प्रतिएकर १ कोटी ३० लाख रुपये भाव मिळावा, अशी या शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १३२१ शेतकरीही याच मागणीवर ठाम असल्याचे सांगण्यात येतेय. महामार्गात शेतजमिन गेलेल्या मालकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट करावे. समृद्धी महामार्गात गेलेल्या शेतजमिनीच्या मालकांना प्रति महिना ३० हजार रुपये पेन्शन मिळावी.

जमीन हस्तांतरित करण्यासाठी कार्यवाही सुरूलाखांदूर तालुक्यातून भंडारा ते गडचिरोली शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग जात असून संबंधित विभागाच्या वतीने जमीन हस्तांतरित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली. मात्र, सदर रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यापूर्वी शेतजमिनीचे किंमत किती मिळणार हे अद्यापही शेतकऱ्यांना कळविण्यात आले नसल्याचे १६ जानेवारीच्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले होते. याशिवाय शासनाने बळजबरीने शेतीची मोजणी करणे सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.

अशी आहेत तीन तालुक्यातील गावे

  • भंडारा तालुक्यातील गावे : गराडा बू., बासोरा, बोरगाव बु., चोवा, उसरीपार, श्रीनगर, वाकेश्वर, पहेला, चिखलपहेला, गोलेवाडी.
  • पवनी तालुक्यातील गावे: २ पन्नाशी, मिन्सी, तिरीं, खैरीतिरी, तांबेखनी, भीवखिडकी, तेलपेंढरी, कातुर्ली, पिलांद्री, खांबाडी.
  • लाखांदूर तालुक्यातील गावे : ३ पालेपंढरी, घोडेझरी, पाचगाव, बेलाटी, मासळ, खैरीघर, घरतोडा, सरांडी बू., राजनी, कन्हांडला, डोकेसरांडी, किरमटी, रोहनी, खैरणा, व मोहरणा.

तीन तालुक्यातील ३५ गावांचा समावेशभंडाराहून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या शीघ्रसंचार दृतगती महामार्गात भंडारा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ३५गावांचा समावेश आहे. यात भंडारा व पवनी तालुक्यातील प्रत्येकी दहा तर लाखांदूर तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.

१३२१ शेतकऱ्यांची जमीन दृतगती महामार्गात गेली आहे.राजनी येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या उपोषणाला दोन दिवस लोटले आहेत. याची कुणीही दखल घेतलेली नाही. परिणामी आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप