शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले; आयुष्याचा रंगमंच परीक्षा घेतोय

By युवराज गोमास | Updated: March 8, 2024 17:03 IST

भंडारा जिल्हा कलाकारांची खाण आहे. झाडीपट्टीला कलाकारांचा वारसा लाभला आहे. ग्रामीण भागात मनोरंजनासोबत समाजप्रबाधनाचे काम कलाकारांचेवतीने निरंतर सुरू आहे.

भंडारा : राज्य शासनाचेवतीने वयोवृद्ध कलाकारांना मासिक २२५० रूपये मानधन दिले जाते. त्यासाठी ५० वर्ष पूर्ण झालेले कलाकार पंचायत समितीमार्फत जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवितात. पालकमंत्र्यांकडून नियुक्त समितीने मंजूर केलेल्या वृद्ध कलाकारांना मासिक अनुदान प्राप्त होते. दरवर्षी १०० कलाकारांची निवड समितीच्यावतीने केली जाते. परंतु, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात समितीचे गठण झालेले नाही. त्यामुळे शेकडो प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे धूळखात पडून आहेत.

भंडारा जिल्हा कलाकारांची खाण आहे. झाडीपट्टीला कलाकारांचा वारसा लाभला आहे. ग्रामीण भागात मनोरंजनासोबत समाजप्रबाधनाचे काम कलाकारांचेवतीने निरंतर सुरू आहे. राष्ट्रीय संगीत खडा तमाशा(खडीगंमत), भजन, कीर्तन, दंडार, डहाका, नाटक, गोंधळ, लावणी आदी कार्यक्रम ग्रामीण भागासह शहरातही होत असतात. 

कलेच्या क्षेत्रात जिल्ह्यात अनेक गुणी कलावंत आहेत. त्यांच्या कलेला राजाश्रय प्राप्त व्हावा. ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना सन्मानाचे जीव जगता यावे, या उदात्त हेतूने शासनाने त्यांच्यासाठी वृद्ध कलाकार मानधन योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील अनेक कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. परंतु, मागील तीन वर्षांपासून अनेक कलावंतांचे प्रस्ताव धूळखात पडून असल्याने कलाकारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

२०२० पासून जिल्ह्यात समिती नाहीपालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार कलाकार मानधन समितीचे गठण केले जाते. समितीमध्ये विविध क्षेत्रातील नामवंत असतात. समितीच्या मूल्यांकनानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले जातात. परंतु, २०२० पासून जिल्ह्यात समितीचे गठण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातून प्रस्ताव सादर केलेले अनेक कलावंत मानधनापासून वंचीत आहेत.योजनेसाठी आवश्यक कागदपत्रकलाकाराचे वय ५० पूर्ण झालेले असावे. १५ ते २० वर्ष कला क्षेत्राचा अनुभव असावा. वार्षीक ४० हजारांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, शासनाच्या अन्य मानधन योजनेचा लाभ घेत नसल्याचे शपथपत्र. शासन मान्यताप्राप्त संस्थेचा २० ते २५ वर्ष अनुभवाचे प्रमाणपत्र. आधार कार्ड, रेशनकार्ड, वयाचा दाखला जोडणे गरजेचे आहे.

पालकमंत्र्यांनी घ्यावा पुढाकारगत तीन वर्षांपासून मानधन समितीचे गठण झालेले नाही. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देत समिती गठण करण्याच्या सूचना द्याव्यात व तीन वर्षांपासून धूळखात असलेले प्रस्ताव मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.जिल्ह्यात २०२० पासून वृद्ध कलाकार मानधन समितीचे गठण झालेले नाही. पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार समितीचे गठण होत असते. यापूर्वी दरवर्षी १०० कलाकारांची मानधनासाठी निवड व्हायची. परंतु, समितीची नसल्यामुळे समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पडून आहेत.- रवींद्र ठवकर, जिल्हाध्यक्ष, सर्वस्तरीय कलाकार परिषद, भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडारा