शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात बायो इथेनॉलचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:20 IST

धान उत्पादक असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे.

फुके यांचा पुढाकार : मुखमंत्र्यांचा पेट्रोलियम मंत्र्यांकडे पाठपुरावालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान उत्पादक असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. धानाला भाव नाही, मजुरीचे दर गगनाला भिडलेले असताना धानपिकानंतर निघणारे तणस चाऱ्यासाठी तर कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. अशा स्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, त्यातून उद्योग निर्माण करता यावा, यासाठी भंडारा जिल्ह्यात बायो ईथेनाल प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.तणसापासून बायो ईथेनाल प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्राने यापूर्वीच पाठपुरावा केला आहे. सद्यस्थितीत देशात ११ ठिकाणी बायो-ईथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. सुमारे ५०० ते ६०० कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचे काम सद्यस्थितीत आयओसीएलचा पानीपत (हरीयाणा), दहेज (गुजरात), बीपीसीएलचा बारगढ (पंजाब), कोची (केरळ) आणि एचपीसीएलचा भटिंडा (पंजाब) अशा पाच ठिकाणी सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात असा प्रकल्प झाला तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मितीसोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी मदत होऊ शकते. या प्रकल्पासाठी सुमारे ५० एकर जागा अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा लाभ जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांना होऊ शकतो. या प्रकल्पातून वर्षाकाठी ३.२ कोटी लिटर ईथेनॉल, १ कोटी किलो सीएनजी आणि ३२ हजार मेट्रीक टन जैविक खत तयार होऊ शकते असा हा प्रकल्प राहणार आहे.मागील काही वर्षांपासून कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत अत्यल्प पाऊस बरसला आहे. मागीलवर्षी २२ जुलैला ४५८.७ मि.मी. पाऊस बरसला होता यावर्षी ३८१.६ मि.मी. ईतकाच पाऊस बरसला आहे. आतापर्यंत ५० ते ६० टक्के रोवणी अपेक्षित असताना यावर्षी केवळ कृषीपंप धारक शेतकऱ्यांचीच रोवणी आटोपली आहे. याची टक्केवारी २५ ते ३० ईतकी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशा स्थितीत शेतीवर आधारीत उद्योग भंडारा जिल्ह्यात झाला तर असा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.शेतकऱ्यांना मिळणार रोजगारभंडारा जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू झाला तर प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. या प्रकल्पातून वर्षाकाठी ३.२ कोटी लिटर ईथेनॉल, १ कोटी किलो सीएनजी आणि ३२ हजार मेट्रिक टन जैविक खत तयार होऊ शकते.तणसापासून फारसे उत्त्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते. बायो इथेनॉल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढला तर त्यांचे जीवनमान नक्कीच उंचावेल. हा प्रकल्प आपल्या मतदार क्षेत्रात आणण्यासाठी कटीबद्ध आहे.- डॉ.परिणय फुके, विधान परिषद सदस्य.