शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मागण्या तातडीने पूर्ण करा; गोसे प्रकल्पबाधितांचे खासदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:00 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा गावात येऊ नये,

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मागील ३६ वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पबाधित जनता न्याय मागत आहेत. मात्र अद्यापही समस्या सुटलेल्या नाहीत. प्रत्येक वेळी आश्वासन दिले जाते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा गावात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन प्रकल्पग्रस्तांनी खासदार डॉ प्रशांत पडोले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. 

प्रकल्पग्रस्तांच्यावतीने भाऊ कातोरे, वाल्मीक नागपुरे, प्रदीप निंबार्ते, जितेंद्र गजभिये, मंगेश वंजारी, अमरदास वंजारी, अंकोश पडोळे, चेतन राघोर्ते, संजय शेंडे, महेश सतदेवे, ब्रम्हानंद सतदेवे, सुरेंद्र रामटेके, ज्ञानेश्वर बावनकुळे, वसंता पडोळे आणि एजाजअली सय्यद यांनी पडोळे यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर निर्णायक सभा घेण्यासाठी खासदारांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 

यात भंडारा- नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत १८ वर्षे पूर्ण नोंद असलेल्या वाढीव कुटुंबांना थेट आर्थिक लाभ देण्यासह वाढीव कुटुंबाला घरकुल आणि पॅकेजनुसार प्रति वाढीव कुटुंब घरबांधणीसाठी ८३,५०० रुपये अनुदान मिळावे, प्रकल्पग्रस्तांच्या कायम रोजगार निर्मितीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, धरणात पूर्ण संचय होण्यापूर्वी नव्याने बाधित होणाऱ्या भंडारा-नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचे पुनर्वसन आणि बाधित शेतजमिनीच्या भूसंपादनासाठी प्रस्तावाला मंजुरी देऊन आर्थिक मोबदला मिळावा, अंशतः बाधित प्रकल्पग्रस्तांना पॅकेजप्रमाणे नोकरी ऐवजी एकमुखी रक्कम यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. मागण्या मार्गी न लावल्यास बाधित पुनर्वसित गावात आगामी विधानसभा निवडणुकीत लोकशाही मार्गाने प्रखर विरोध दर्शविण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा