शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

धान खरेदीची लांबणी शेतकऱ्यांच्या मुळावर

By admin | Updated: November 15, 2015 00:22 IST

धान खरेदी हंगाम जोमात असूनही हमी धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी शासनापुढे हतबल ठरला आहे.

व्यथा शेतकऱ्यांची : अधिकाऱ्यांची भूमिका नकारात्मकमुखरू बागडे पालांदूरधान खरेदी हंगाम जोमात असूनही हमी धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी शासनापुढे हतबल ठरला आहे. शासनाने खरेदीचा मुहूर्त काढून सुद्धा अधिकारी सकारात्मक नसल्याने पालांदुरात धान खरेदी सुरू होऊ शकली नाही. दिवाळी अधारीवर कशीतरी साजरी करीत धान खरेदीची चातकाप्रमाणे वाट पहात आहे. लाखनी तालुक्यात खरेदी विक्रीने धान खरेदी सुरू करून शासनाचा आदेश पाळला. परिसरातील शेतकऱ्यांची एकच गर्दी त्याठिकाणी वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वत:चे गोदाम असूनसुद्धा धान खरेदीला विलंब होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य वसंत शेळके चिंता व्यक्त केली आहे.पालांदूर परिसरात खराशी, पाथरी, मऱ्हेगाव येथे धान खरेदी करावी. करिता शेतकऱ्यांचा पुढाकार असून तसी मागणी जिल्हा मार्केेटिंग फेडरेशन करणे अनिवार्य आहे. शेतकरी हेच खरे मालक असून आपण त्यांना नौकराप्रमाणे वागवतो हे उचित नसल्याचे वसंत शेळके यांनी बाजार समितीच्या मासिक सभेत ठणकावून सांगितले. जिल्ह्याला धानाचा कोठार समजल्या जाते. मात्र हा कोठार वृद्धींगत करण्याकरिता शासन प्रशासन नकारात्मक पाऊल उचलत असल्याने कोठार संकटात आले आहे. कोठार मालकांचे २००९ ते २०१४ पर्यंतचे भाडे आजही शासनाकडून मिळालेले नाही. संस्थांनी जोखीमेवर इतरांकडून कोठार भाड्याने घेवून त्यात खरेदी केलेला धान ठेवला होता. यावर शासनाची भूमिका अत्यंत कठोर आहे.उपरोक्त कालावधीपैकी केवळ २ महिन्यांचे प्रतिक्विंटल प्रतिमाह २ रूपये ८ पैसे दराने देण्याचे मान्य केले. हे भाडे भारतीय खाद्य महामंडळ असल्यामुळे शासन केवळ दोन महिन्यांच्या वर भाडे देणार नसल्याचे उडल्याने धान खरेदी लांबण्याची स्पष्ट चिन्हे पालांदूर परिसरात दिसत आहेत. अधिकारी व सत्ताधारी यांच्यात समनवय नसल्याने शेतकरी भरडत जात आहे. आपले वाटणारे लोकप्रतिनिधी अशा कठीणप्रसंगी जर शेतकऱ्यांच्या उपयोगी पडत नसतील तर यांचा काय उपयोग असा प्रश्न शेतकरी आपात चर्चीत आहे. हमीभाव खरेदी नसल्याने व्यापार मंदावला आहे. दिवाळीसारख्या सणाला उत्साह नाही. केवळ पगारदार वर्ग मजेत असून शेतकरी रसातळाला जात आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले राजकारणी सगडे एकाच माळेचे मणी दिसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. लोकशाही मुठभर धनिकांच्या हातातली खेळणी बनत आहे.खासगी धानाचा व्यापार तेजीत असून बिनापरवाना व्यापारी शेतकऱ्यांची अक्षरक्ष: लूट करीत आहेत. परिसरात ११०० ते १२०० रूपये प्रतिक्विंटलने धान खरेदी सुरू असून एका पोत्यामागे ३ किलो धानाची दांडी सुरू आहे. अधिकारी वर्ग चिरीमिरीत खुष असल्याने व्यापाऱ्यांचे फावले आहे. शेतकऱ्यांना मुळते पण पोट अडल्याने नाईलाज ठरत आहे. महागाईच्या तुलनेत लागलेले पिकखर्च उत्पन्न खर्च व हातात आलेले पिक व पिकाचे अत्यल्प भाव पाहता शेती तोट्याची होत चालली आहे, हे त्रिवारसत्य नाकारता येत नाही.