शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पीक पद्धत बदलातून कमविला नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:54 IST

तालुक्यातिल बोरी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकात बदल करत रक्त चंदनाच्या झाडांची लागवड केली तसेच त्याच ठिकाणि शेवग्याच्या झाडांची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहे. त्या किमयागर शेतकऱ्याचे नाव ऋषि खोब्रागडे आहे.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : बोरी येथील यशस्वी उपक्रम, लक्षावधींची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातिल बोरी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकात बदल करत रक्त चंदनाच्या झाडांची लागवड केली तसेच त्याच ठिकाणि शेवग्याच्या झाडांची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहे. त्या किमयागर शेतकऱ्याचे नाव ऋषि खोब्रागडे आहे.खोब्रागडे यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर शेती आहे शेतीत पारंपरिक पद्धतीने धान पिकांची लागवट करीत असत मात्र धन पिकात लागवतीचा खर्चही कधीकधी निघत नव्हता त्यामुळे खोब्रागडे यांनी धान पिकात बदल करत उसाची शेती केली.या उसाच्या शेतीत त्यांना धान शेतीपेक्षा चांगला नफाही मिळाला मात्र खोब्रागडे हे समाधानीं नव्हते त्यामुळे त्यांनी याच शेतीत काही वेगळा करू शकतो काय याचा विचार केलं,व इंटरनेटच्या र्नेटच्या माध्यमातून नवनवीन पिके लावण्याची माहिती घेतली. खोब्रागडे यांनी रक्त चंदनाची झाडे लावण्याचे ठरविले. त्यांनी एक एकर शेतीमध्ये २८० रक्त चंदनाची झाडे लागवड केली असून हे झाडे मोठे होण्याकरिता १५ वषार्चा कालावधी लागतो. तोपर्यंत यांच्या रिकाम्या जागी काही तरी पीक लागवड करायचे ठरविले. शेवग्याच्या शेंगाची लागवङ केली. शेवग्याच्या शेंगाची बियाणे हि बीड येथून खरेदी करून आणली व १०-१० च्या अंतरावर शेवग्याची बियाणांची लागवड केली. सहा महिन्यांच्या कालावधीत या झाडांना शेवग्याच्या शेंगा लागल्या असून शेवग्याचे झाडे लावण्याकरिता फक्त १० हजार रुपये खर्च आला आहे. या एक एकर शेतीमध्ये एक लाखाचा शुद्ध नफा खोब्रागडे यांना मिळत आहे. रक्त चंदनाच्या झाडांची आजघडीला एक झाडाची किंमत ही एक लाख रुपये आहे. येत्या काही वर्षात खोब्रागडे यांना दोन कोटीच्या वर उत्पन्न मिळू शकते. तर त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी दोन एकर शेतीमध्ये उसाची लागवड केली आह. दोन एकर शेतीला ५० हजार रुपये खर्च आला असून दोन लाखाचा उत्पन्न होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. , एकंदरीतच खोब्रागडे यांना तीन एकर शेतीत शेवगा व उसाला ६० हजार रुपये खर्च आला असून तीन लाख रुपये उत्पन्न होणार आहे. ६० हजार खर्च वजा केला असता दोन लाख चाळीस हजार रुपये शुद्ध नफा खोब्रागडे यांना मिळणार आहे. खोब्रागडे यांच्या शेतावर काही शेतकरी भेटी देत असून इतरही शेतकरी आपल्या शेतावर या पद्धतीची शेती लागवड करणार असल्याचे सांगत आहे, शासनाची कोणतीच मदत नसतांनी शेतकºयांनी संशोधन करुन आर्थिक प्रगती करीत आहेत किमान कृषि विभागाने बांधावर जावून मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी