शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

शिवाजीनगरात समस्याच समस्या, नगर परिषदेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:55 IST

ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे अनेक कॉलनी तयार होत आहेत. या शहराला लागून असलेल्या व नव्याने पवनी नगर परिषद हद्दीत समावेश झालेल्या शिवाजी नगरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमूलभूत सोईसुविधांचा अभाव : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘नाव मोठे दर्शन खोटे’ची प्रचिती

लक्ष्मीकांत तागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे अनेक कॉलनी तयार होत आहेत. या शहराला लागून असलेल्या व नव्याने पवनी नगर परिषद हद्दीत समावेश झालेल्या शिवाजी नगरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.नगर परिषदेने येथील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला आहे. पण पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, नाल्या, पथदिवे या मुख्य सुविधा दिल्या नाहीत. नाल्या नसल्यामुळे सांडपाणी जागोजागी जमा होत आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा होत आहे. त्यामुळे जीवन कसे जगावे, असा प्रश्न येथील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.पवनी शहरात बसस्थानकाजवळ निलज, कारधा राज्यमार्ग क्रमांक २४१ ला लागून शिवाजी नगर वसले आहे. या नगरातील सुंदर, अद्यावत इमारतींनी या नगरासोबतच पवनी शहरालाही सुंदर केले आहे. या नगराजवळून गोसीखुर्द धरणाचा उजवा कालवा वाहतो. शिवाजी नगराजवळूनच पवनी शहरातील जनता सकाळी-संध्याकाळी फिरायला जाते. येथे कोणीही सर्वप्रथम आल्यास प्रथम पसंती त्यांची शिवाजीनगर असते. पण शिवाजीनगर जरी सुंदर दिसत असले तरी येथील नागरिक अनेक समस्यांशी झुंजत आहेत. पावसाळ्यात येथे प्रवेश करताच चिखलमय रस्त्यांतून मार्ग काढावा लागतो. दुचाकी वाहनांना सांभाळूनच गाडी चालवावी लागते. येथे पक्के रस्ते नाहीत. या नगराचा समावेश अगोदर बेटाळा ग्रामपंचायतमध्ये होता. येथे अनेक समस्या आहेत. त्यामुळेच येथील नागरिकांनी पवनी न.प. मध्ये समावेश करण्याची मागणी केली. त्यानंतर नगरपरिषद हद्दवाढीमध्ये शिवाजी नगराचा समावेश पवनीत झाला. न.प. ने मोठ्या प्रमाणात येथून कर वसुली केली पण समस्या सोडविल्या नाही. येथे अनेक ठिकाणी पथदिव्यांची, नाल्यांची सोय नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस घराबाहेर निघणे धोक्याचे आहे. विषारी सरपटणाऱ्या जीवांचा धोका आहे.नाल्या नसल्यामुळे जागोजागी सांडपाणी जमा झाले आहे व रस्त्यावरूनही वाहत जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे विषाणूजन्य ताप हे येथील जनतेसाठी नेहमीचे झाले आहे. येथील जनतेने अनेक वेळा नगरपरिषदकडे लोकप्रतिनिधींकडे समस्या मांडल्या. पण दुर्लक्ष होत आहे. याच समस्या शेषनगर, न्यू शेषनगर, वैभवलक्ष्मी नगर, प्रेमनगर यांच्याही आहेत.