शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

ज्येष्ठ नेत्यांच्या समोर मांडल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:15 IST

भंडारा जिल्ह्यासह सिहोरा परिसरात असणाऱ्या समस्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना दिले. याशिवाय त्यांनी या विषयावर विस्तृत चर्चा केली.

ठळक मुद्देपाणी, रोजगार, धानाचे प्रश्न : धनेंद्र तुरकर यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यासह सिहोरा परिसरात असणाऱ्या समस्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना दिले. याशिवाय त्यांनी या विषयावर विस्तृत चर्चा केली. या चर्चेत पाणी, पर्यटन, रोजगार आणि धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले.गोंदिया जिल्ह्यात कँसर रुग्णालयाचे उद्घाटन कार्यासाठी ज्येष्ठ नेते खा.शरद पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल होते. या ज्येष्ठ नेत्यांचे सोबत सभापती धनेंद्र तुरकर यांनी विविध समस्यांवर चर्चा केली. या सोबत सिहोरा परिसरात असणारी बारमाही सिंचनाची सोय करण्यासाठी चर्चा केली. बावनथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प चांदपूर जलाशयात पाणी उपसा करण्यास असमर्थ ठरत आहे. प्रकल्प सुरु असताना नदीचे पात्र आटले जात आहेत. यामुळे उन्हाळी धानपिकांना पाणी मिळत नाही. राजीव सागर धरणाचे पाणी चांदपूर जलाशयाला मिळत नाही. वैनगंगा नदीचे पात्रात पाणीच पाणी असताना जलाशयात उपसा करण्याचे योजना नाहीत.यामुळे खरीप हंगामात धानाचे उत्पादन घेतल्यानंतर शेतकºयांकडे सिंचनाची सोय नसल्याने ८ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणता येत नाही. यामुळे उन्हाळी धानाचे पीक घेता येत नसल्याने रोजगार अभावी शेतकºयांची मुले रोजगाराकरिता शहरात पलायन करीत आहेत. वर्षभर सिंचनाची सोय झाली तर कुणी परिसर रोजगाराकरिता सोडणार नाही. आघाडी शासनाचे काळात जिल्ह्यात ग्रीन व्हॅली चांदपूर या एकमेव पर्यटनस्थळाला मंजुरी देण्यात आली होती. परिसरात या पर्यटनस्थळाचे अर्थव्यवस्था सावरली होती.अनेकांनी गाव आणि गावाबाहेर व्यवसाय थाटले होते. पर्यटनस्थळात १०० हून अधिक बेरोजगार तरुण अस्थायी कामगार म्हणून कार्यरत होते. परंतु पर्यटनस्थळ बंद होताच रोजगारांचे गणित गडगडले. व्यवसाय बंद झाल आहेत. बेरोजगारांना रोजगाराची समस्या निर्माण झाल्याने त्यांचे शहरात पलायन सुरु झाले आहे. राज्यस्तरीय दालनात सुटणारी समस्या निकाली काढण्यात आली नसल्याने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. याशिवाय रस्त्याचे रुंदीकरण अडली आहे. परिसरात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी बारमाही सिंचन सुविधा आणि पर्यटन विकासाला जलद गतीने मंजुरी दिली पाहिजे. असे निवेदनात सभापती धनेंद्र तुरकर यांनी नमूद केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस