शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईची समस्या कायम

By admin | Updated: May 18, 2014 23:23 IST

तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात आजही १९ गावांत पाणीटंचाई भेडसावत आहे़ तालुक्यात १०४ गावे त्यापैकी ९४ गावे आबादीत १० गावे रिठी आहेत़

 लाखनी : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात आजही १९ गावांत पाणीटंचाई भेडसावत आहे़ तालुक्यात १०४ गावे त्यापैकी ९४ गावे आबादीत १० गावे रिठी आहेत़ तलावाची संख्या १६६ मालगुजारी आहेत. मध्यम व मोठे तलाव रावणवाडी, खुर्शीपार असे असून आज तलावाना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे़ तलावात २० टक्के पाणी साठा शिल्लक आहे़ मे महिन्यातच तलाव कोरडे पडण्यास सुरूवात झाली आहे़ तालुक्यात शासकीय विहिरी, कूपनलिका, नळयोजना असून अनेक गावातील नळयोजना बंद पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून जलस्वराजसारख्या योजनेच्या माध्यमातून पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न झाला़ मात्र काही गावात ही योजना कागदोपत्रीच राहीली़ आजही पाण्याची पातळी खालावली़ पावसाळ्याच्या दिवसात सळसळून वाहणारे नद्या, ओठे, पुर्णता कोरडे पडले आहेत़ शेतकरी व जनावरे पाण्याने त्रस्त झाले आहेत़ तालुक्यात बंधार्‍यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे़ मात्र जागेचे योग्य नियोजन नसल्याने बंधारे शोभेची वस्तू ठरून कंत्राटदार व अधिकार्‍यांचे कमाईचे साधन ठरत आहे़ आज तालुक्यात कुठल्याही बंधार्‍यात ग्लासभर पाणी दिसून येत नाही़ बंधारे निर्मितीवर लाखो रुपये खर्चले जातात़ मात्र उपयोग शून्य; अनेक योजनांतून बंधारे तयार होताना दिसतात़ मात्र उपयोग काय अशा प्रश्न समोर येत आहे़ पूर्वी भंडारा जिल्ह्यात शिवकालीन पाणी साठवन योजना होती़ मात्र तालुक्यात कुठेही ती योजना बघायला मिळत नाही़ जागेचे योग्य विचाराधीन नियोजन करून बंधारे, शिवकालीन पाणी साठवण योजना आखल्या तर त्या टंचाईच्या काळात वरदान ठरू शकतात़ मात्र त्याकडे सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेतकरी नदीकाठावर निरनिराळे पीक घेऊन उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात असतो़ मात्र यावर्षी पाऊस चांगला झाला असला तरी भूगर्भातील जलसाठा कमी झाला आहे़ यामुळे नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शेतीला सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे उत्पादनात घसरण झाल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे़ नद्यानी आजवर आमचे तसेच आमच्या जनावराचे रक्षण केले़ मात्र दोन-तीन वर्षापासून वाढत्या तापमानामुळे व पर्यावरणाच्या बिघडत्या संतुलनामुळे नद्यातील जलस्तर घटले आहे़ त्यामुळे नुसती वाळूच दिसून येते़ त्यामुळे उन्हाळ्यात उत्पादनात घर तर खरिपात नद्या ओसडून वाहताना पिकाची नुकसानच अधिक झाले आहे. साकोली-लाखांदूर तालुक्याचे विभाजन होऊन लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. मात्र पाहिजे त्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व शासनस्तरावर जलसाठा वाढविण्यासाठी व सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले नाही़ एखादा मोठा सिंचन प्रकल्प निर्माण न केल्याने जुन्या मालगुजारी तलावावर शेतविच्या उद्योगांची मदार आहे़ पाऊस पडल्यास जलसाठा ६० टक्के एवढाच व शेतीसाठी वापर झाल्यास सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये शिल्लक साठा ३० टक्के राहतो़ त्यामुळे सिंचनाचे मोठे प्रकल्प उभारणे आवश्यक आहे़ तालुक्याच्या भौगोलिक विस्तारापैकी २३ हजार ५९२ हेक्टर क्षेत्रफळात भातपिकाची लागवड होते़ भातपिकाला पाण्याची आवश्यकता जास्त असल्यामुळे पाण्याचा अल्पसाठा उरतो़ त्यामुळे जनावरे, वन्यप्राणी, नागरिकांना पाण्याचा प्रश्न नेहमी भेडसावत असतो. लोकप्रतिनिधी पुढाकार घेवून तालुका मध्यम, मोठे पाणी प्रकल्प उभारून येथील शेतकर्‍यांना व नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात पाणीटंचाईच्या समस्येला शासनाला समोर जावे लागणार आहे़ (तालुका प्रतिनिधी)