शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

उष्म्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:44 IST

लाखांदुर : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. एप्रिल महिन्यातच जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली ...

लाखांदुर : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. एप्रिल महिन्यातच जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली असून पशुपालकांना भटकंती करावी लागत आहे.

गतवर्षी समाधानकारक पावसाळा झाला होता. त्यामुळे यंदा उन्हाची तीव्रता कमी जाणवेल, असा अंदाज होता. मात्र, महिनाभरापासून उन्हाचा पारा ४० अंशाच्यावर पोहोचल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. अवकाळी पावसामुळे जनावरांसाठी साठवण करून ठेवलेला चारा खराब झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न ऐरणीवर आला होता. एप्रिलमध्येच चारा आणि पाणीटंचाई भासत असल्याने येत्या मेपर्यंत भयावह परिस्थिती निर्माण हाण्याची भीती आहे. पाण्यासाठी पशुपालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नदी-नाले आटल्याने विहिरीचे पाणी जनावरांना पाजावे लागत आहे. दुथडी भरून वाहणारी चुलबंद नदी यंदा कोरडी पडली आहे. याचा फटका चुलबंद नदीकाठावरील नागरिकांसह पशुंनादेखील बसत आहे. नदीकाठावरील बऱ्याचशा गावांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नदी पात्रातून केली आहे. येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनादेखील भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे.