शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
3
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
4
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
5
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
6
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
7
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
8
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
9
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
10
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
11
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
12
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
13
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
14
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
15
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
16
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
17
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
18
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
19
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
20
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
Daily Top 2Weekly Top 5

बी-बियाण्यांच्या किमतीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:23 IST

‘कष्ट करील त्याची शेती’ असे चित्र आहे. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मिळाले तर भरमसाट मजुरी मागतात. ...

‘कष्ट करील त्याची शेती’ असे चित्र आहे. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मिळाले तर भरमसाट मजुरी मागतात. शेतकऱ्यांनाच स्वतः कष्ट करून आपल्या शेतीत काम करावे लागत आहे. सध्या तर परिसरातील प्रत्येक शेतात शेतकरी पूर्ण कुटुंबासहित काम करताना दिसतात. या वर्षी कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामाचे आधारभूत धान खरेदी केंद्रांना देऊन सहा महिने झाले तरीदेखील बोनस मिळाला नाही. सोसायटी, बँका यांच्याकडून पीककर्ज घेऊन शेतकरी बी-बियाण्यांची खरेदी करीत आहेत; पण बियाण्यांच्या किमतीत या वर्षी दहा किलोंच्या बॅगवर १०० ते २०० रुपये वाढ झाल्याने तसेच खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या कोंढा परिसरात बाहुबली, प्रणाली, एक हजार आठ, दप्तरी, श्रीलक्ष्मी यांसारख्या धान बियाण्यांची मागणी होत आहे. सर्वच कंपन्यांनी बियाण्यांच्या किमतीत वाढ केल्याने या वर्षी शेतीचा खर्च वाढणार आहे. डिझेलचे भाव शंभर रुपये प्रतिलिटरच्या वर गेल्याने ट्रॅक्टर भाडे वाढले आहे. शेतीच्या सर्व कामांचे दर वाढल्याने पुन्हा धान शेती परवडणारी नाही, असे शेतकरी म्हणत आहेत. केंद्र शासनाने धानाच्या भावात अत्यल्प वाढ केली, ती निराशजनक आहे. शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो. त्यातच वर्षभराचा खर्च, मुलामुलींचे लग्न, त्यांचे शिक्षण व असे इतर खर्च शेतीतून कसे भागवावेत असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरवर्षी अनेक संकटांना, नैसर्गिक संकटांनादेखील शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. शासनाच्या वतीने अनुदानावर बी-बियाणे दिले जातात; परंतु ते बियाणे गरीब शेतकऱ्यांना न मिळता श्रीमंत शेतकऱ्यांच्या घशात जात आहे. कोंढा परिसरात मागील खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी अल्पदरात धान घेतले आणि तेच धान शेतकऱ्यांच्या सातबारावर आधारभूत केंद्रावर दिले. हे देताना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी अट घातली होती की, धान तुझ्या सातबारावर केंद्रावर देईन. त्यामुळे यापाऱ्यांना नफा झाला. शेतकऱ्यांना व्यापारी योग्य भाव देत नाहीत. त्यांची लुबाडणूक करतात. पैशांची गरज असल्याने धान पीक निघाल्याबरोबर शेतकरी ते व्यापारी व राईस मिलधारक यांना धान विकत असतात. हे प्रकार सर्रास सुरू आहेत. कोंढा परिसरात अनेक व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राबाहेरचे धान खरेदी करून आणले आणि ते आधारभूत केंद्रावर विकले असेही प्रकार झाले आहेत. खरीप हंगाम सुरू झाला; पण अनेक शेतकऱ्यांचे पैसे शासनाने दिले नाहीत. बोनसचा पत्ता नाही; तेव्हा शेती कशी करावी, असा प्रश्न बळिराजासमोर निर्माण झाला आहे. बँक सोसायटी यांचे पीककर्ज शेतीसाठी कमी पडते. अनेक शेतकरी खासगी सावकाराकडून भरमसाट व्याजाने पैसे काढतात. ते शेतीमध्ये खर्च करतात; पण त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही, ही शोकांतिका आहे. शासनाने बी-बियाणे किमतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच कोरोना काळानंतर सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि खतांच्या किमतींवर शासनाने नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.