शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 22:10 IST

दीर्घ विश्रांतीनंतर गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून या पावसाने शेतकरी सुखावला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात २८.५ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पवनी तालुक्यात १०६.४ मिमी पाऊस झाला आहे.

ठळक मुद्दे२४ तासात २८.५ मिमी पाऊस : पवनी तालुक्यात सर्वाधिक १०६.४ मिमी पावसाची नोंद, भातपिकाला जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दीर्घ विश्रांतीनंतर गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून या पावसाने शेतकरी सुखावला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात २८.५ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पवनी तालुक्यात १०६.४ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० जुलै या कालावधीत ३९२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तीन दिवसांपासून अविश्रांत पाऊस कोसळत असल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला असून जनजीवन ठप्प झाले आहे. या पावसाने जिल्ह्यात कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.जिल्ह्यात शनिवार सायंकाळपासून पावसाला प्रारंभ झाला. अविश्रांत पाऊस कोसळत आहे. सुरुवातीला रिमझीम बरसणारा पाऊस मंगळवारी दिवसभर जोरदार कोसळत होता. मंगळवारी तर पावसाने क्षणभरही विश्रांती घेतली नाही. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात २८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी असून या कालावधीत ६२४.१ मिमी पाऊस अपेक्षित असतो. आतापर्यंत ३९२.७ मिमी पाऊस कोसळला. हा सरासरीच्या ६३ टक्के आहे. सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्यात १०६.४ मिमी कोसळला असून अनेक शेतात पाणी साचले आहे. तसेच सखल भागातही पाणी साचले आहे. पवनी तालुक्यातील पालोरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणाला तलावाचे स्वरुप आले होते. तीन आठवड्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर आलेल्या या पावसाने शेतकरी सुखावला आहे. रोवणी झालेल्या भातपिकाला जीवदान मिळत आहे. रखडलेली रोवणीची कामे वेगाने सुरु झाली आहेत. जिल्ह्यातील नदी-नाले खळखळून वाहायला लागले असून अनेक गावातील पाणी टंचाईची समस्या सुटली आहे. या पावसाने वातावरणात गारठा निर्माण झाला असून दिवसरात्र पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.दोन तालुक्यात अतिवृष्टीगत २४ तासात भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. एकट्या पवनी तालुक्यात १०६.४ मिमी तर लाखांदूरमध्ये ६७.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. भंडारा तालुक्यात ६.३ मिमी, मोहाडी ३.३ मिमी, साकोली ६.८ मिमी आणि लाखनीत ९.६ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र तुमसर तालुक्यात गत २४ तासात कुठेही पाऊस पडला नाहीवैनगंगेचा जलस्तर अर्धा मीटरने वाढलाराज्याच्या सीमावर्ती भागात आणि वैनगंगेच्या उगमस्थानाकडे जोरदार पाऊस झाल्याने अवघ्या दहा तासात वैनगंगा नदीच्या जलस्तरात अर्धा मीटरने वाढ नोंदविण्यात आली. भंडारा शहराजवळील कारधा येथे ६.६० मीटरने वैनगंगा वाहत आहे. विशेष म्हणजे धोक्याच्या पातळीच्या ९.५० मीटर खालीच पाणी पातळी आहे. वैनगंगेचा जलस्तर मंगळवारी सकाळी ८ वाजता ६.१५ मीटर नोंदविण्यात आला. सायंकाळी ६ वाजता त्यात ०.४५ मीटरने वाढ होऊन जलस्तर ६.६० मीटरवर पोहचला. संततधार पावसामुळे कोरडी पडलेली बावनथडी नदीही प्रवाहित झाली आहे. तुमसर तालुक्यातील चिखली (सीतेकसा) येथे बावनथडीचा जलस्तर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ०.३० मीटर नोंदविण्यात आला आहे. बावनथडी प्रकल्पाच्या साठ्यातही वाढ होत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कुठेही रस्ते पावसामुळे बंद पडले नाही. वाहतूक सुरळीत सुरु होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर