शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

फुटपाथ व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात

By admin | Updated: July 17, 2017 00:20 IST

अतिक्रमण मोहिम राबविण्यापुर्वी नगर पालिकेने व्यापाऱ्यांच्या सभेत कुणालाही रोजगारापासून वंचित केले जाणार नाही

प्रकरण अतिक्रमण हटाओ माहिमेचे : आश्वासनाची पूर्तता न केल्याने घेतला पवित्रालोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अतिक्रमण मोहिम राबविण्यापुर्वी नगर पालिकेने व्यापाऱ्यांच्या सभेत कुणालाही रोजगारापासून वंचित केले जाणार नाही असे आश्वासन दिले असतांना सरसकट पुर्णत: दुकानदारावरच बुलडोजर चालवून फुटपाथ व्यापाऱ्यांना बेरोजगार केले. परिणामी उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नगर पालिकेने फुटपाथ व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी किंवा डीपीआर प्रमाणे नविन जागेची व्यवस्था करुन दयावी या मागणी करिता फुटपाथ व्यापाऱ्यांनी न.प. समोर आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे.२९ व ३० जून रोजी नगर पालिका प्रशासनाद्वारे अतिक्रमण मोहिम भर पावसाळ्यात राबविण्यात आली. तत्पूर्वी न.प.ने व्यापाऱ्यांची सभा बोलावली असता त्यात अतिक्रमण मोहिमेंतर्गत बाजारपरिसरातील रस्ते मोकळे करायचे एवढेच नगर पालिकेचे उद्देश आहे, असे सांगितल्याने व्यापाऱ्यांनीही नगर पालिकेच्या नव्हे तर महसुल विभागाच्या जागेवरील अतिक्रमण रस्ते मोकळे करण्यास कोणतीही हरकत घेतली नव्हती. मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण मोहिमेला सुरुवात होताच फुटपाथ व्यापाऱ्यांच्या दुकानावरच बुलडोजर चालवून अतिक्रमण मोहिमच बंद करुन ‘एकाला मायेची व दुसऱ्याला मावशी’ची अशी सावत्र वागणूक दिली. दरम्यान व्यापाऱ्यांनी विचारणा केली असता जागेचे सपाटीकरण केल्यानंतर फुटपाथ व्यापारी दुकाने लावू शकतात असे नगर पालिकाद्वारे सांगितल्या गेले होते. परंतु १५ दिवसांचा कालावधी लोटला असतांनाही सदर जागेवर दुकान लावण्याची परवानगी दिली. त्यामुळे फुटपाथ व्यापारी बेरोजगार झाले असून त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. बाजार परिसरातील जागा ही महसूल विभागाची आहे. त्या जागेवर गत ४० ते ५० वर्षापासून फुटपाथ व्यापाऱ्यांचे दुकाने ते दुकान तोडण्याचा अधिकारच मुळात नसतांना तो ताडल्या गेली. तत्कालीन नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी अतिक्रमण काढले होते. मात्र त्यांनी फुटपाथ व्यापाऱ्यांची निटव्यवस्था केली होती. त्याच धर्तीवर आम्हालाही जागा अलॉट करुन दयावी किंवा नविन जागेची व्यवस्था करुन दयावी या मागणीकरिता फुटपाथ व्यापारी त्यांच्या परिवारासह नगर पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फुटपाथ व्यापारी संघटनेचे निवेदनातून दिला आहे.यात सुधाकर वैरागडे, दशरथ देशमुख शिवनंदन खोखले, रामकृष्ण खोब्रागडे, विमला समरित, विष्णू समरित, पुष्पा समरित, नर्मदा बांगळकर, सुनंदा तलमले, मधुकर कुंजेकर, गंगा भोयर, देवराव वंजारी, दिलीप समरित, माधुरी साठवणे, गंगाधर गुर्वे, संजय बनकर, तिसार शेख, विक्रम लांजेवार, सुशिला किरपाने आदींची नावे वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनात समाविष्ट आहेत.