शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

फुटपाथ व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात

By admin | Updated: July 17, 2017 00:20 IST

अतिक्रमण मोहिम राबविण्यापुर्वी नगर पालिकेने व्यापाऱ्यांच्या सभेत कुणालाही रोजगारापासून वंचित केले जाणार नाही

प्रकरण अतिक्रमण हटाओ माहिमेचे : आश्वासनाची पूर्तता न केल्याने घेतला पवित्रालोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अतिक्रमण मोहिम राबविण्यापुर्वी नगर पालिकेने व्यापाऱ्यांच्या सभेत कुणालाही रोजगारापासून वंचित केले जाणार नाही असे आश्वासन दिले असतांना सरसकट पुर्णत: दुकानदारावरच बुलडोजर चालवून फुटपाथ व्यापाऱ्यांना बेरोजगार केले. परिणामी उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नगर पालिकेने फुटपाथ व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी किंवा डीपीआर प्रमाणे नविन जागेची व्यवस्था करुन दयावी या मागणी करिता फुटपाथ व्यापाऱ्यांनी न.प. समोर आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे.२९ व ३० जून रोजी नगर पालिका प्रशासनाद्वारे अतिक्रमण मोहिम भर पावसाळ्यात राबविण्यात आली. तत्पूर्वी न.प.ने व्यापाऱ्यांची सभा बोलावली असता त्यात अतिक्रमण मोहिमेंतर्गत बाजारपरिसरातील रस्ते मोकळे करायचे एवढेच नगर पालिकेचे उद्देश आहे, असे सांगितल्याने व्यापाऱ्यांनीही नगर पालिकेच्या नव्हे तर महसुल विभागाच्या जागेवरील अतिक्रमण रस्ते मोकळे करण्यास कोणतीही हरकत घेतली नव्हती. मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण मोहिमेला सुरुवात होताच फुटपाथ व्यापाऱ्यांच्या दुकानावरच बुलडोजर चालवून अतिक्रमण मोहिमच बंद करुन ‘एकाला मायेची व दुसऱ्याला मावशी’ची अशी सावत्र वागणूक दिली. दरम्यान व्यापाऱ्यांनी विचारणा केली असता जागेचे सपाटीकरण केल्यानंतर फुटपाथ व्यापारी दुकाने लावू शकतात असे नगर पालिकाद्वारे सांगितल्या गेले होते. परंतु १५ दिवसांचा कालावधी लोटला असतांनाही सदर जागेवर दुकान लावण्याची परवानगी दिली. त्यामुळे फुटपाथ व्यापारी बेरोजगार झाले असून त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. बाजार परिसरातील जागा ही महसूल विभागाची आहे. त्या जागेवर गत ४० ते ५० वर्षापासून फुटपाथ व्यापाऱ्यांचे दुकाने ते दुकान तोडण्याचा अधिकारच मुळात नसतांना तो ताडल्या गेली. तत्कालीन नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी अतिक्रमण काढले होते. मात्र त्यांनी फुटपाथ व्यापाऱ्यांची निटव्यवस्था केली होती. त्याच धर्तीवर आम्हालाही जागा अलॉट करुन दयावी किंवा नविन जागेची व्यवस्था करुन दयावी या मागणीकरिता फुटपाथ व्यापारी त्यांच्या परिवारासह नगर पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फुटपाथ व्यापारी संघटनेचे निवेदनातून दिला आहे.यात सुधाकर वैरागडे, दशरथ देशमुख शिवनंदन खोखले, रामकृष्ण खोब्रागडे, विमला समरित, विष्णू समरित, पुष्पा समरित, नर्मदा बांगळकर, सुनंदा तलमले, मधुकर कुंजेकर, गंगा भोयर, देवराव वंजारी, दिलीप समरित, माधुरी साठवणे, गंगाधर गुर्वे, संजय बनकर, तिसार शेख, विक्रम लांजेवार, सुशिला किरपाने आदींची नावे वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनात समाविष्ट आहेत.