शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

रोहीणी नक्षत्रापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. मृग नक्षत्रातही जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. अशातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून सक्रिय झाला. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरीही लावली.

ठळक मुद्देपेरणीला येणार वेग : घोरपड येथे वीज कोसळून शेतकरी ठार, तासभर पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भात मान्सून सक्रिर्य झाल्यानंतर सोमवारी दुपारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर पडलेल्या या पावसाने शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. भंडारा शहरातही जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी शिरले होते. तर मोहाडी तालुक्यातील घोरपड येथे वीज कोसळून एक शेतकरी ठार झाला.रोहीणी नक्षत्रापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. मृग नक्षत्रातही जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. अशातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून सक्रिय झाला. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरीही लावली. मात्र सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर सारखा पाऊस कोसळत होता.भंडारा शहरात तासभर झालेल्या या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले. रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याचे दृष्य दिसत होते. या पावसाने जनजीवन प्रभावित झाले होते. शहरात कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही. मोहाडी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. आंधळगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार घोरपड येथील शेतकरी दिलीप नागोराव पुडके वीज कोसळून ठार झाले. ते आपल्या शेतात पºहाटी लावण्याचे काम करीत होते.पवनी येथे दुपारी २.४५ वाजतापासून वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोंढा परिसरात ३.५० वाजतापासून पावसाचा सरी सुरु झाल्या. लाखनी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून पालांदूर परिसरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली.तुमसर शहरासह तालुक्यातील पवनारा, खापा, मोहाडी तालुक्यातील जांब लोहारा, करडी पालोरा, लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, लाखनी यासह साकोली शहरासह एकोडी येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.पऱ्हे भरणीला येणार वेगधान पिकासाठी सुरुवातीला पर्ह्यासाठी नर्सरी टाकावी लागते. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नर्सरी तयार केली आहे. मात्र दमदार पाऊस झाल्याशिवाय पऱ्हे टाकू नये असे कृषी विभागाने सुचविले होते. मात्र ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी पºहे भरणीला सुरुवात केली होती. मात्र आता दमदार पाऊस झाल्याने पºहे भरणीला वेग येणार आहे.दोन दिवसात झालेल्या पऱ्हेटाकणीला सोमवारच्या पावसाने फायदा होणार आहे. पऱ्हे टाकणे निश्चितच साधणार आहे. अनेक शेतकरी आता जोमाने कामाला लागणार आहे. जिल्ह्यातील एक ९४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड होणार आहे. या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असून शेतकरी धान बियाण्यांची चाचपणी करीत आहे. कोरोना संकटामुळे शेतकरी धास्तावला असून कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवित आहे.

टॅग्स :Rainपाऊस