शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

रोहीणी नक्षत्रापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. मृग नक्षत्रातही जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. अशातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून सक्रिय झाला. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरीही लावली.

ठळक मुद्देपेरणीला येणार वेग : घोरपड येथे वीज कोसळून शेतकरी ठार, तासभर पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भात मान्सून सक्रिर्य झाल्यानंतर सोमवारी दुपारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर पडलेल्या या पावसाने शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. भंडारा शहरातही जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी शिरले होते. तर मोहाडी तालुक्यातील घोरपड येथे वीज कोसळून एक शेतकरी ठार झाला.रोहीणी नक्षत्रापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. मृग नक्षत्रातही जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. अशातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून सक्रिय झाला. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरीही लावली. मात्र सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर सारखा पाऊस कोसळत होता.भंडारा शहरात तासभर झालेल्या या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले. रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याचे दृष्य दिसत होते. या पावसाने जनजीवन प्रभावित झाले होते. शहरात कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही. मोहाडी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. आंधळगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार घोरपड येथील शेतकरी दिलीप नागोराव पुडके वीज कोसळून ठार झाले. ते आपल्या शेतात पºहाटी लावण्याचे काम करीत होते.पवनी येथे दुपारी २.४५ वाजतापासून वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोंढा परिसरात ३.५० वाजतापासून पावसाचा सरी सुरु झाल्या. लाखनी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून पालांदूर परिसरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली.तुमसर शहरासह तालुक्यातील पवनारा, खापा, मोहाडी तालुक्यातील जांब लोहारा, करडी पालोरा, लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, लाखनी यासह साकोली शहरासह एकोडी येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.पऱ्हे भरणीला येणार वेगधान पिकासाठी सुरुवातीला पर्ह्यासाठी नर्सरी टाकावी लागते. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नर्सरी तयार केली आहे. मात्र दमदार पाऊस झाल्याशिवाय पऱ्हे टाकू नये असे कृषी विभागाने सुचविले होते. मात्र ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी पºहे भरणीला सुरुवात केली होती. मात्र आता दमदार पाऊस झाल्याने पºहे भरणीला वेग येणार आहे.दोन दिवसात झालेल्या पऱ्हेटाकणीला सोमवारच्या पावसाने फायदा होणार आहे. पऱ्हे टाकणे निश्चितच साधणार आहे. अनेक शेतकरी आता जोमाने कामाला लागणार आहे. जिल्ह्यातील एक ९४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड होणार आहे. या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असून शेतकरी धान बियाण्यांची चाचपणी करीत आहे. कोरोना संकटामुळे शेतकरी धास्तावला असून कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवित आहे.

टॅग्स :Rainपाऊस