शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी युद्धस्तरावर तयारी

By admin | Updated: May 19, 2017 00:55 IST

ऐन उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे उद्धभावलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्राम पंचायत सरपंच संजय मिरासे यांनी

तूर्तास दिलासा अशक्य : प्रकरण वरठी येथील, सनफ्लॅग कंपनी धावली मदतीला लोकमत न्यूज नेटवर्क वरठी : ऐन उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे उद्धभावलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्राम पंचायत सरपंच संजय मिरासे यांनी युद्धस्तरावर काम हाती घेतले आहे. इंटेकवेल मध्ये साचलेली गाळ स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू असून ग्रामपंचयाचे कर्मचारी दिवस रात्र कामात व्यस्त आहे. जमिनीत ४० फूट खोल असलेल्या विहिरीत उतरून कर्मचारी गाळ उपसत असून स्वत: सरपंच यावर लक्ष ठेवून आहेत. गाळ स्वच्छ झाल्यास पाण्याचा स्तर माहीत होवून गावातील पाणीपुरवठा पूर्वरत काही प्रमाणात सुरू होऊ शकतो काय यांची पडताळणी सुरू आहे, पण पाणी टंचाईवर मात करणे तूर्तास अशक्य असल्याचे चिन्ह दिसत आहेत. दमदार पावसाची सुरुवात होईपर्यंत वरठी वाशियाना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार हे जवळपास निशचित आहे. १५ वर्षात एकदाही न उदभवलेली परिस्थिती यावेळी पाणी टंचाईच्या रुपात ग्राम पंचायत समोर ठाकली आहे. उन्हाळ्याचे दिवस व वाढते तापमान यामुळे पाण्याची मागणी आणि उपयोग वाढते. चार दिवसांपासून वरठी येथे नळाला पाणी नाही. याबाबद सततचे फोन वाजत असून नुसता एकाच प्रश्नाचा भडिमार असे अनेक समस्यांना ग्राम पंचायतीला समोर जावे लागत आहे. नदी पात्रातील पाणी आटने ही नैसर्गिक बाब आहे. यामुळे किती प्रयत्न केले तरी पाऊस बरसल्याशिवाय किंवा नदी पात्रात धरणाचे पाणी सोडल्याशिवाय पाणी येणे शक्य नाही. धरणात पाणी नसल्यामुळे पाणी मिळणे कठीण आहे. सलाम त्यांच्या धाडसाला ग्राम पंचायतीचे कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या बद्दल भावना नेहमी नकारात्मक असतात. पण दोन दिवसांपासून इंटेकवेलवर सुरू असलेले युद्धस्तरावर काम पाहून त्यांना सलाम ठोकण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. ४० फूट खोल इंटेकवेलमध्ये उतरून गाळ उपसणे सुरू आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे होणारी उष्णता किंवा इतर त्रास याबाबद खंत व्यक्त न करता ताकदीने कर्मचारी कामावर भिडले आहेत. यात विशेष म्हणजे नुसते पाणी पुरवठा योजनेवर काम करणारे मानस नसून संपूर्ण कर्मचारी ज्यात बाबू, चपराशी, यांचा समावेश आहे. ग्राम पंचायत कर्मचारी मुकुंदा गावंडे, जितू हरडे, अरविंद वासनिक ,बाळू बोन्द्रे, वसंत बागडे, वासुदेव मते, रणजित लांजेवार, रोशन गायधने, महेंद्र बन्सोड व स्वत: सरपंच संजय मिरासे गाळ काढण्याच्या कामात व्यस्त दिसले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य रवी बोरकर, थारनोद डाकरे, रवी लांजेवार व माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य दिलाप उके उपस्थित होते. पावसाळ्यात टँकर भरून पाणी पुरवणारी सनफ्लॅग कंपनी पुन: एकदा वरठी ग्राम पंचायत च्या मदतीला धावून आली. इंटेकवेल मध्ये जमा होणारी गाळ काढण्यासाठी ग्राम पंचायत मध्ये यंत्र नाही. विकत घेण्यासाठी किंमत अडीच लाखाच्या घरात. अश्या परिस्तिथी ग्राम पंचायत ला गाळ उपसण्याचे यंत्र सनफ्लॅग कंपनीने उपलद्ध करून दिले आहे. त्या यंत्राच्या माध्यमातून गाळ उपसण्याचे कार्य सुरू असून अजून दोन दिवस लागणार आहेत.