शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कमी कालावधीच्या धान वाणांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:29 IST

यावर्षी २० जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही कुठ पडतो तर कुठ पडत नाही.

पावसाची प्रतीक्षा : शामकुंवर यांचे शेतकऱ्यांना आवाहनसाकोली : यावर्षी २० जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही कुठ पडतो तर कुठ पडत नाही. कृषी संशोधन केंद्र, साकोली येथे १ ते १५ जुनपर्यंत सरासरी पाऊस ३२ मिमी असतो पंरतु यावर्षी १ ते १५ जून २०१६ या काळात फक्त ३.४ मिमी पाऊस पडला. हा पाऊस कोरडवाहू क्षेत्रात धान पेरणीसाठी समाधान कारक नाही. त्यामुळे कमी कालावधीच्या धान वाणांना प्राधान्य द्या, असे आवाहन भात पैदासकार डॉ.बी.जी शामकुंवर यांनी केले आहे. १६ ते ३० जूनपर्यंत सरासरी पाऊस १६०.३९ मिमी पडतो, परंतु यावर्षी १६ ते २३ जूनपर्यंत फक्त १७ मिमी पाऊस बरसला आहे. २२ ते ३० जून २०१६पर्यंत १४४.७९ मिमी पाऊस अपेक्षित आहे. ओलिताची सोय (बोअरवेल, विहीर) असलेल्या शेतकऱ्यांनी धान बियाणे पेरणी केली असून काही ठिकाणी सुरु आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय नाही त्यांनी अजूनपर्यंत पेरणी केली नसून पावसाची वाट बघत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी २२ ते २५ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडल्यास पेरणी करावी. यामध्ये कमी कालावधीच्या लवकर निघणाऱ्या ११५-१२० दिवसाच्या धान वाणांना प्राधान्य द्यावा. कृपया मध्यम कालावधी जसे १३०-१३५ दिवस व उशिरा कालावधी १३६-१४५ दिवसाच्या धान वाणाची पेरणी सुरु करु नये. ११५ ते १२० दिवस कालावधीचे धान वाण २२ ते २५ जूनपर्यंत पेरणी केल्यास व या काळात चांगला पाऊस झाला व त्यानंतर रोवणी २० ते २५ दिवसाच्या रोपांची केल्यास हे पिक १३ ते २४ सप्टेंबर दरम्यान फुलोऱ्यात येईल. कुबेरा अवस्था, त्या अगोदर व त्यानंतर १५ दिवस धान पिकाला सर्वात जास्त पाण्याची गरज असते. ५ ते १० सेमी पाण्याची पातळी, ते सहजपणे उपलब्ध होण्याची शक्यता असते व हे पीक २४ आॅक्टोबरपर्यंत कापणीसाठी तयार होऊन समाधानकारक उत्पादन मिळते. ओलीताची सोय नसणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी १२५ ते १४५ दिवसपर्यंत कालावधीच्या धान वाणांची निवड व प्रेरणी करु नये कारण सप्टेंबर नंतर परतीच्या पाउसाला सुरुवात होते. १६ ते ३० सप्टेंबर पर्यंत सरासरी पाऊस ६९.२७ मिमी असतो व त्यानंतर १ ते १५ आॅक्टोंबर पर्यंत २०.८८ मिमी पाऊस पडतो. उशिरा कालावधीचे वाण या कालावधीत फुलोरा अवस्थेत असतात व त्यांना पाण्याचा ताण पडतो. उत्पादनात घट येते. शेतकरी बांधवांनी जमीन तयार असल्यास रोपवाटिका (पऱ्हेखणी) तयार करुन १ मीटर रुंद, १० सेमी उंच व योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करुन ठेवावे, समजा २ ते ४ दिवसात सतत पाऊस पडल्यास व नंतर उघाड दिल्यास गादीवाफ्यावर बियाणांची पेरणी करणे सोपे जाते. शेतकरी चिखलपऱ्हे टाकतात. त्यामध्ये रोपे उपटतानी त्यांची मुळे तुटतात व रोपांना इजा होते व रोवणी झालेली बरीच रोपे मरतात. माहितीसाठी कृषी संशोधन केंद्र साकोली किंवा जवळच्या तालुका मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात संपर्कसाधावा असे आवाहन डॉ. बी.जी शामकुंवर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)