शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

अवकाळी पावसाचे पुन्हा संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत आहे. दिवाळीत झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेला धान उद्ध्वस्त झाला. या संकटातून सावरत नाही तोच गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकºयांच्या चिंतेत वाढ केली. हवामान खात्याने गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा दिला.

ठळक मुद्दे२४ तासात २० मिमी पाऊस : आधारभूत केंद्रावर उघड्यावरील धान ओला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळीत परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून रविवारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला. गत २४ तासात २०.२ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली. आधारभूत केंद्रावर उघड्यावरील धान ओलाचिंब झाला असून भाजीपाला पिकासह धानालाही मोठा फटका बसत आहे.गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत आहे. दिवाळीत झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेला धान उद्ध्वस्त झाला. या संकटातून सावरत नाही तोच गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली. हवामान खात्याने गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा दिला.रविवारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला. २४ तासात २०.२ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यात ३३.७ मिमी कोसळला. यात शहापूर मंडळात ३.२ मिमी, भंडारा १५ मिमी, धारगाव २ मिमी, बेला ९.३ मिमी, पहेला १.२ मिमी, खमारी ३ मिमी पावसाची नोंद झाली. मोहाडी तालुक्यातील मोहाडी मंडळात ११.६, वरठी ८.६, कांद्री १.२, आंधळगाव १.४ मिमी, कान्हळगाव १.८ मिमी असा एकूण २४.६ मिमी पाऊस कोसळला. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडळात ५ मिमी, तुमसर ३.१ मिमी, सिहोरा ६.२ मिमी, मिटेवानी २.१ मिमी, गर्रा १४ मिमी असा एकूण ३०.४ मिमी पाऊस कोसळला. साकोली तालुक्यातील साकोली मंडळात ४ मिमी, एकोडी ९.८ मिमी, सानगडी ५ मिमी अशी एकूण १८.८ मिमी पावसाची नोंद झाली.लाखांदूर तालुक्याच्या लाखांदूर मंडळात ४.२ मिमी, बारव्हा ३.६ मिमी, मासळ १६.२ मिमी अशी एकूण २४ मिमी आणि लाखनी तालुक्याच्या पोहरा मंडळात १.६ मिमी, लाखनी ५.२ मिमी, पालांदूर १ मिमी, पिंपळगाव २.२. मिमी अशी एकूण १० मिमी पावसाची नोंद झाली. आधारभूत केंद्रावर शेतकºयांची धान विक्रीसाठी प्रचंड गर्दी आहे. मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने अनेक शेतकºयाचा धान उघड्यावर आहे. रविवारी झालेल्या पावसाने शेतकºयांचा धान ओला झाला. यामुळे हा धान घरी नेवून वाळू घालण्याशिवाय शेतकºयांना पर्याय नाही. यासोबतच या पावसाने भाजीपाला व चुरणा झालेल्या धानाचेही नुकसान झाले.आंधळगाव परिसरात धानाचे पुंजणे मातीमोलआंधळगाव : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात रविवारी सायंकाळी ४ वाजता वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे धानाचे पुंजणे ओलेचिंब झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. चना, गहू, लाखोरी व तुरीच्या पिकाचीही मोठे नुकसान झाले आहे. फळ आणि भाजीपाला बागांचेही नुकसान झाले आहे.पवनी तालुका निरंकजिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळल्याची नोंद आपत्ती नियंत्रण विभागाने केली आहे. सहा तालुक्यात पाऊस कोसळला असून पवनी तालुका मात्र निरंक आहे. सहा पैकी एकाही मंडळात पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.वातावरणात गारवा४गत तीन दिवसांपासून ढकाळ वातावरण आणि रविवारी झालेल्या पावसाने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला. दिवसभर हुडहुडी भरणारी थंडी कायम होती. तापमान खालावल्याने थंडीत वाढ झाली. ग्रामीण भागात शेकोटी पेटल्याचे दृश्य दिसत होते.

टॅग्स :Rainपाऊस