लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळीत परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून रविवारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला. गत २४ तासात २०.२ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली. आधारभूत केंद्रावर उघड्यावरील धान ओलाचिंब झाला असून भाजीपाला पिकासह धानालाही मोठा फटका बसत आहे.गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत आहे. दिवाळीत झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेला धान उद्ध्वस्त झाला. या संकटातून सावरत नाही तोच गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली. हवामान खात्याने गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा दिला.रविवारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला. २४ तासात २०.२ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यात ३३.७ मिमी कोसळला. यात शहापूर मंडळात ३.२ मिमी, भंडारा १५ मिमी, धारगाव २ मिमी, बेला ९.३ मिमी, पहेला १.२ मिमी, खमारी ३ मिमी पावसाची नोंद झाली. मोहाडी तालुक्यातील मोहाडी मंडळात ११.६, वरठी ८.६, कांद्री १.२, आंधळगाव १.४ मिमी, कान्हळगाव १.८ मिमी असा एकूण २४.६ मिमी पाऊस कोसळला. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडळात ५ मिमी, तुमसर ३.१ मिमी, सिहोरा ६.२ मिमी, मिटेवानी २.१ मिमी, गर्रा १४ मिमी असा एकूण ३०.४ मिमी पाऊस कोसळला. साकोली तालुक्यातील साकोली मंडळात ४ मिमी, एकोडी ९.८ मिमी, सानगडी ५ मिमी अशी एकूण १८.८ मिमी पावसाची नोंद झाली.लाखांदूर तालुक्याच्या लाखांदूर मंडळात ४.२ मिमी, बारव्हा ३.६ मिमी, मासळ १६.२ मिमी अशी एकूण २४ मिमी आणि लाखनी तालुक्याच्या पोहरा मंडळात १.६ मिमी, लाखनी ५.२ मिमी, पालांदूर १ मिमी, पिंपळगाव २.२. मिमी अशी एकूण १० मिमी पावसाची नोंद झाली. आधारभूत केंद्रावर शेतकºयांची धान विक्रीसाठी प्रचंड गर्दी आहे. मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने अनेक शेतकºयाचा धान उघड्यावर आहे. रविवारी झालेल्या पावसाने शेतकºयांचा धान ओला झाला. यामुळे हा धान घरी नेवून वाळू घालण्याशिवाय शेतकºयांना पर्याय नाही. यासोबतच या पावसाने भाजीपाला व चुरणा झालेल्या धानाचेही नुकसान झाले.आंधळगाव परिसरात धानाचे पुंजणे मातीमोलआंधळगाव : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात रविवारी सायंकाळी ४ वाजता वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे धानाचे पुंजणे ओलेचिंब झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. चना, गहू, लाखोरी व तुरीच्या पिकाचीही मोठे नुकसान झाले आहे. फळ आणि भाजीपाला बागांचेही नुकसान झाले आहे.पवनी तालुका निरंकजिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळल्याची नोंद आपत्ती नियंत्रण विभागाने केली आहे. सहा तालुक्यात पाऊस कोसळला असून पवनी तालुका मात्र निरंक आहे. सहा पैकी एकाही मंडळात पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.वातावरणात गारवा४गत तीन दिवसांपासून ढकाळ वातावरण आणि रविवारी झालेल्या पावसाने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला. दिवसभर हुडहुडी भरणारी थंडी कायम होती. तापमान खालावल्याने थंडीत वाढ झाली. ग्रामीण भागात शेकोटी पेटल्याचे दृश्य दिसत होते.
अवकाळी पावसाचे पुन्हा संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST
गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत आहे. दिवाळीत झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेला धान उद्ध्वस्त झाला. या संकटातून सावरत नाही तोच गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकºयांच्या चिंतेत वाढ केली. हवामान खात्याने गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा दिला.
अवकाळी पावसाचे पुन्हा संकट
ठळक मुद्दे२४ तासात २० मिमी पाऊस : आधारभूत केंद्रावर उघड्यावरील धान ओला