शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
3
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
6
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
7
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
8
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
9
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
10
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
11
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
12
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
13
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
14
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
15
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
16
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
17
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
18
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
19
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
20
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

पावसाचे अवकाळी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

गत तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात असलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर असलेले धान ओले होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. वर्षभर अवकाळी पावसाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील शेतकरी भागवत काळे म्हणाले, सततच्या पावसाने आमचे प्रचंड नुकसान होत आहे.

ठळक मुद्देवातावरणात प्रचंड गारठा : हरभरा, लाखोरी, तूर पिकांसह पालेभाज्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सरत्या वर्षाच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत असून तीन दिवसांपासून बरसणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. हरभरा, लाखोरी, तूर या पिकांसह पालेभाज्यांचे नुकसान झाले असून आधारभूत केंद्रावरील धान ओलाचिंब होत आहे. गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या सततच्या पावसाने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला असून गत २४ तासात १०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.भंडारा शहरासह तुमसर, पवनी, लाखनी, साकोली, मोहाडी, लाखांदूर तालुक्यात गुरुवारी सकाळी मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. वीजांचा कडकडाटही होत होता. दुपारी ३ वाजेपर्यंत सारखा पाऊस कोसळत होता. तुमसर तालुक्यात सर्वदूर पाऊस कोसळला. मोहाडी शहरासह तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. जांब लोहारा परिसरात जोरदार पाऊस कोसळला. लाखनी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. पालांदूर परिसरात सकाळी १० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरासह शहापूर, जवाहरनगर येथे जोरदार पाऊस कोसळला. वरठी परिसरात सकाळपासूनच पाऊस कोसळत होता.वरठी येथे सकाळी ९ वाजता पावसाला प्रारंभ झाला. थंडीचा पारा घसरल्याने कामाची गती मंदावली. वरठी येथील आठवडी बाजारालाही या पावसाचा फटका बसला. करडी परिसरात तीन तास मुसळधार पाऊस कोसळला. पालोरा येथील धान खरेदी केंद्राला तळ्याचे स्वरुप आले होते. खरबी परिसरात पावसाने हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. विष्णुदास हटवार, दसाराम वाघमारे, राकेश गायधने, बाबुजी गायधने, धनराज गायधने, दुर्योधन गायधने, श्रीकृष्ण गायधने, मोरेश्वर गायधने, लोमेश्वर वाघमारे यांच्या शेतातील हरभरा पीक पाण्याखाली आले.या पावसाने रबी पीकांचे मोठे नुकसान होत असून वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने ठिकठिकाणी भरदिवसा शेकोट्या पेटविल्याचे दृष्य दिसत होते.गत तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात असलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर असलेले धान ओले होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. वर्षभर अवकाळी पावसाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील शेतकरी भागवत काळे म्हणाले, सततच्या पावसाने आमचे प्रचंड नुकसान होत आहे. धान ओला होत असून हरभरा, लाखोरी, तूर आदी पीकांचे नुकसान होत आहे. धान विक्रीसाठी न्यावा तर तेथे मोठी प्रतीक्षा करावी लागते. निसर्गाच्या या लहरीपणापुढे आम्ही हतबल झाल्याचे त्यांनी सांगितले.लाखांदूर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे दिसून आले. आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची शेकडो पोती उघड्यावर आहेत. या धानाच्या संरक्षणासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याने धान ओले होत आहेत. यासोबतच तालुक्यात हरभरा, वाटाणा, लाखोरी, उडीद, मुग, जवस आदी पिकांचेही अवकाळी पावसाने नुकसान होत आहे. तूर व भाजीपाला पिकाचेही प्रचंड नासाडी होत आहे. वातावरणात प्रचंड गारठा वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दृष्य दिसत आहे.जिल्ह्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आहे.तुमसर तालुक्यात गारांचा वर्षावतुमसर तालुक्यातील रेंगेपार परिसरात गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बोराच्या आकारांचा गारांचा वर्षाव झाला. पांजरा, तामसवाडी यासह सिहोरा परिसरातील काही गावात दुपारी गारांचा वर्षाव झाला. अवकाळी पाऊस आणि गारांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सिहोरा परिसरातील भाजीपाला पिकाला या गारांचा मोठा फटका बसला.२४ तासात १०.६ मिमी पाऊसभंडारा जिल्ह्यात गत २४ तासात १०.६ मिमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे १ जानेवारी रोजी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ६१.३ मिमी पाऊस कोसळला होता. गत २४ तासात शहापूर परिसरात १० मिमी, भंडारा ५ मिमी, धारगाव २ मिमी, बेला ३ मिमी., तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडळात ७.३ मिमी, तुमसर ८.३ मिमी, सिहोरा १७.२ मिमी, मिटेवानी ६.२ मिमी, गर्रा १५ मिमी पावसाची नोंद झाली.धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळजिल्ह्यातील बहुतांश सर्वच आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकºयांचा धान उघड्यावर आहे. अवकाळी पाऊस बरसत असल्याने धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होतांना दिसत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात असलेला धान झाकणे शक्य होत नाही. ताडपत्री टाकल्यानंतरही धान ओला होत आहे. काही ठिकाणी तर सततच्या पावसाने पोत्यातीलच धान अंकुरल्याचे दिसत आहे. ओला झालेल्या धानाची आधारभूत केंद्रावर खरेदी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना धान वाळविण्याशिवाय पर्याय नाही.

टॅग्स :Rainपाऊस