शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला पुन्हा मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:01 IST

हवामान खात्याचा अंदाज या वर्षी तंतोतंत खरा ठरला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच भंडारा, लाखनी, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी व लाखांदूर येथेही पावसाने हजेरी लावली. या पावसाने धान खरेदी केंद्रांवर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेला धान ओला झाला आहे. दुसरीकडे भाजीपाला पिकांची लागवड केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे.

ठळक मुद्देसर्वदूर पावसाची हजेरी : कापलेला धान झाला ओलाचिंब, भाजीपाला पीकही संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दोन दिवसाच्या अंतराने पुन्हा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सोमवार रात्री ते मंगळवारी सकाळपाळीत पावसाने सर्वदूर हजेरी लावली. यात उन्हाळी धानपिकासह भाजीपाला पीक संकटात सापडले आहे. परिणामी बळीराजाचे टेंशन अजून वाढले आहे.हवामान खात्याचा अंदाज या वर्षी तंतोतंत खरा ठरला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच भंडारा, लाखनी, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी व लाखांदूर येथेही पावसाने हजेरी लावली. या पावसाने धान खरेदी केंद्रांवर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेला धान ओला झाला आहे. दुसरीकडे भाजीपाला पिकांची लागवड केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. कठाण पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.पालांदूर जवळील वाकल येथे वीज खांबावर वीज कोसळल्याने इन्सूलेटर व तार तुटले. यामुळे तीन तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. पालांदूर परिसरातील गावे अंधारात होती. तसेच धानाची मळणी व कापणी केल्यासह धान खरेदी केंद्रावर आणलेला धान या पाण्यामुळे ओला झाला. मेंगापूर धान खरेदी केंद्रावर हे दृष्य बळीराजाला चिंतेत घालणारे होते.लाखांदूर तालुक्यात उन्हाळी धानपिकासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली होती. जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली. धान कापणीला व मळणीला वेग आला असतानाच रोहिणी नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतातील उभे धानपिक जमीनदोस्त झाले. धानपिकावर पाणी गेल्याने धानाची पोत खराब होऊन खुल्या बाजारात धानाचे भाव गडगडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरडवाहू शेतकऱ्यांना या पावसाचा हंगामपूर्व व मशागतीसाठी पिकाला फायदा होणार असला तरी उन्हाळी धान उत्पादकांसाठी मारक ठरला आहे.ग्रामीण क्षेत्रातही दमदार हजेरीसोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना चिंतेत घातले आहे. लाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात विजांच्या कडकडाटसह पाऊस बरसला. पवनीत सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसल्या. मोहाडी सह ग्रामीण क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली. लाखनी शहरासह ग्रामीण भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. मंगळवारी बाजारपेठ बंद असल्याने शहरात मात्र तितका परिणाम जाणवला नाही. करडी परिसरात पाऊस बरसला असून याचा रोहयो कामावर परिणाम जाणवला. शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून तलावात पाणी साचले आहे. आसगाव परिसरातही मुसळधार पाऊस बरसला.

टॅग्स :Rainपाऊस