शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विद्युतअभावी धानपीक धोक्यात

By admin | Updated: September 15, 2015 00:40 IST

आधीच निसर्गाची अवकृपा व त्यात वीज वितरण कंपनीचे संकट यामुळे तालुक्यातील शेतकरी तुर्तास तरी संकटात सापडला आहे.

मंत्र्यांच्या आदेशाचे पालन नाही : समस्यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे दुर्लक्षचसाकोली : आधीच निसर्गाची अवकृपा व त्यात वीज वितरण कंपनीचे संकट यामुळे तालुक्यातील शेतकरी तुर्तास तरी संकटात सापडला आहे. मागील पंधरा दिवसापासून जांभळी सडक शेतशिवारातील केबल खराब झाल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे शेतीला पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे धानपीक करपत आहे. याची तक्रार कंपनीला देण्यात आली असली तरी उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत. ‘उर्जामंत्री आले अन गेले’ मात्र विजेच्या समस्या कायमच आहेत. त्यामुळे उर्जा मंत्र्यांची आढावा बैठक कशासाठी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.जांभळी सडक येथील नगिना राईस मिल जवळील मधुकर ठवरे यांचे शेतात असलेल्या ट्रॉन्सफार्मर पासून वायर खराब झाल्यामुळे शेतकरी शेतीला पाणीपुरवठा करु शकत नाही. त्यामुळे पीक नष्ट होत आहेत. त्यामुळे नवीन वायर तात्काळ लावून विद्युत पुरवठा सुरु करावा अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. शेतीसाठी समाधानकारक पाणी अजूनही मिळालेले नाही. या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव, नदी, नाले, बोळ्या पूर्णपणे भरले नाही. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत जलसाठा पुरणार नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.या अडचणीतूनही शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा करपा व खोडकिडा या रोगाने परिसरात हैदोस घातला. त्यामुळे शेतकरी पुरता खचला असून यावर्षीही उत्पन्न मिळेल याची हमखास हमी नाही. त्यामुळे शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना इतर सोयीसुविधा मिळाव्या यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्याची अंमलबजावणी होत असताना वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन का? जांभळी येथील ही समस्या तत्काळ मार्गी लागली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करू.- होमराज कापगते,जिल्हा परिषद सदस्य, कुंभली