शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

विद्युतअभावी धानपीक धोक्यात

By admin | Updated: September 15, 2015 00:40 IST

आधीच निसर्गाची अवकृपा व त्यात वीज वितरण कंपनीचे संकट यामुळे तालुक्यातील शेतकरी तुर्तास तरी संकटात सापडला आहे.

मंत्र्यांच्या आदेशाचे पालन नाही : समस्यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे दुर्लक्षचसाकोली : आधीच निसर्गाची अवकृपा व त्यात वीज वितरण कंपनीचे संकट यामुळे तालुक्यातील शेतकरी तुर्तास तरी संकटात सापडला आहे. मागील पंधरा दिवसापासून जांभळी सडक शेतशिवारातील केबल खराब झाल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे शेतीला पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे धानपीक करपत आहे. याची तक्रार कंपनीला देण्यात आली असली तरी उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत. ‘उर्जामंत्री आले अन गेले’ मात्र विजेच्या समस्या कायमच आहेत. त्यामुळे उर्जा मंत्र्यांची आढावा बैठक कशासाठी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.जांभळी सडक येथील नगिना राईस मिल जवळील मधुकर ठवरे यांचे शेतात असलेल्या ट्रॉन्सफार्मर पासून वायर खराब झाल्यामुळे शेतकरी शेतीला पाणीपुरवठा करु शकत नाही. त्यामुळे पीक नष्ट होत आहेत. त्यामुळे नवीन वायर तात्काळ लावून विद्युत पुरवठा सुरु करावा अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. शेतीसाठी समाधानकारक पाणी अजूनही मिळालेले नाही. या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव, नदी, नाले, बोळ्या पूर्णपणे भरले नाही. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत जलसाठा पुरणार नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.या अडचणीतूनही शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा करपा व खोडकिडा या रोगाने परिसरात हैदोस घातला. त्यामुळे शेतकरी पुरता खचला असून यावर्षीही उत्पन्न मिळेल याची हमखास हमी नाही. त्यामुळे शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना इतर सोयीसुविधा मिळाव्या यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्याची अंमलबजावणी होत असताना वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन का? जांभळी येथील ही समस्या तत्काळ मार्गी लागली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करू.- होमराज कापगते,जिल्हा परिषद सदस्य, कुंभली