शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बीटीबीने साधली सौरऊर्जेतून वीज क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:10 IST

भारनियमनाची अगतिकता ओळखत नैसर्गिक सौर उर्जेचा वापर आता गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देभारनियमनाला पर्याय : पर्यावरणाच्या समतोलासाठी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा / पालांदूर : भारनियमनाची अगतिकता ओळखत नैसर्गिक सौर उर्जेचा वापर आता गरजेचे झाले आहे. भंडारा येथील बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी त्यांच्या भाजीबाजारात सौर ऊर्जेचा वापर केला आहे. नुसताच सौर ऊर्जेचा वापर केला नाही तर, त्यातून निर्मित विजेतून भाजीबाजारात वापर करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जोपासली आहे. या माध्यमातून बारापात्रे यांनी जिल्ह्याला व शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.स्वार्थासाठी प्रत्येक व्यक्ती निसर्गाला आपल्या सोयीने वापरतो. पर्यावरणाचा ºहास घडत निसर्गानेही आपली नियमितता सोडत अनियमितता दाखविली आहे. विजेचा वापर बघता वीज उत्पादन अल्प होत आहे. कोळसा, पाण्याची मुबलकता कमी झाली असून भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात हजारो शेतकरी वर्षभरापासून कृषी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. विजेची जोडणी न झाल्याने पाणी असूनही शेती कोरडवाहूच आहे. शासनही मागेल त्याला वीज देण्यात कमी पडत आहे. विजेचे उत्पादनही कमी होत आहे. मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशावेळी हातावर हात मांडून बसण्यापेक्षा नवा पर्याय शोधत सौर ऊर्जेचा वापर करावा. शासनही या विचाराचा प्रचार व प्रसार करीत आहे. शासनाच्या खांद्याला खांदा लावत सौरऊर्जेतून विजेची गरज भागवावी. यातून निसर्गाशी सलगी राखण्यासाठी मदत होत भारनियमनाचा बडगा सुद्धा शांत होण्यास मदत मिळणार आहे. बीटीबी भाजीबाजारात कार्यान्वित झालेल्या सौरऊर्जेच्या संचातून संपूर्ण मंडीतील विजेची गरज पूर्ण झाली असून यामुळे बारापात्रे यांनी वीज बिलाचा खर्च टाळला आहे. यामुळे एक आदर्श समाजासमोर उभा आहे.शेतकºयांनी आपल्या शेतात, घरात सौर ऊर्जेचा वापर करीत नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग घेत निसर्गाचा समतोल राखण्याकरिता मदत करावी. सौर ऊर्जेमुळे शेताला दिवसाच सिंचन शक्य असल्याने व शासनही अनुदान देत असल्याने कुठलीही अडचण नाही.-बंडू बारापात्रे, अध्यक्ष,बीटीबी असोसिएशन भंडारा.