शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

बीटीबीने साधली सौरऊर्जेतून वीज क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:10 IST

भारनियमनाची अगतिकता ओळखत नैसर्गिक सौर उर्जेचा वापर आता गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देभारनियमनाला पर्याय : पर्यावरणाच्या समतोलासाठी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा / पालांदूर : भारनियमनाची अगतिकता ओळखत नैसर्गिक सौर उर्जेचा वापर आता गरजेचे झाले आहे. भंडारा येथील बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी त्यांच्या भाजीबाजारात सौर ऊर्जेचा वापर केला आहे. नुसताच सौर ऊर्जेचा वापर केला नाही तर, त्यातून निर्मित विजेतून भाजीबाजारात वापर करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जोपासली आहे. या माध्यमातून बारापात्रे यांनी जिल्ह्याला व शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.स्वार्थासाठी प्रत्येक व्यक्ती निसर्गाला आपल्या सोयीने वापरतो. पर्यावरणाचा ºहास घडत निसर्गानेही आपली नियमितता सोडत अनियमितता दाखविली आहे. विजेचा वापर बघता वीज उत्पादन अल्प होत आहे. कोळसा, पाण्याची मुबलकता कमी झाली असून भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात हजारो शेतकरी वर्षभरापासून कृषी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. विजेची जोडणी न झाल्याने पाणी असूनही शेती कोरडवाहूच आहे. शासनही मागेल त्याला वीज देण्यात कमी पडत आहे. विजेचे उत्पादनही कमी होत आहे. मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशावेळी हातावर हात मांडून बसण्यापेक्षा नवा पर्याय शोधत सौर ऊर्जेचा वापर करावा. शासनही या विचाराचा प्रचार व प्रसार करीत आहे. शासनाच्या खांद्याला खांदा लावत सौरऊर्जेतून विजेची गरज भागवावी. यातून निसर्गाशी सलगी राखण्यासाठी मदत होत भारनियमनाचा बडगा सुद्धा शांत होण्यास मदत मिळणार आहे. बीटीबी भाजीबाजारात कार्यान्वित झालेल्या सौरऊर्जेच्या संचातून संपूर्ण मंडीतील विजेची गरज पूर्ण झाली असून यामुळे बारापात्रे यांनी वीज बिलाचा खर्च टाळला आहे. यामुळे एक आदर्श समाजासमोर उभा आहे.शेतकºयांनी आपल्या शेतात, घरात सौर ऊर्जेचा वापर करीत नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग घेत निसर्गाचा समतोल राखण्याकरिता मदत करावी. सौर ऊर्जेमुळे शेताला दिवसाच सिंचन शक्य असल्याने व शासनही अनुदान देत असल्याने कुठलीही अडचण नाही.-बंडू बारापात्रे, अध्यक्ष,बीटीबी असोसिएशन भंडारा.