शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

राजकीय समीकरण, घडामोडी बदलणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार लक्ष्य करणारे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील वजनदार नेते नाना पटोले यांनी शुक्रवारला दुपारी लोकसभा अध्यक्षांकडे खासदारपदाचा राजीनामा सोपविला.

नंदू परसावार।आॅनलाईन लोकमतभंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार लक्ष्य करणारे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील वजनदार नेते नाना पटोले यांनी शुक्रवारला दुपारी लोकसभा अध्यक्षांकडे खासदारपदाचा राजीनामा सोपविला. त्यांच्या राजीनाम्यामुळे भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.५४ वर्षीय नाना पटोले यांचा आजवरचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा सदस्य व्हाया लोकसभा सदस्य असा कधी काँग्रेस तर कधी भाजप असा राहिलेला आहे. आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील, स्वतंत्र आघाडी सुरू करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.काँग्रेसचे आमदार असताना डिसेंबर २००४ मध्ये पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर नागपूर हिवाळी अधिवेशनात राजीनामा दिला होता. त्यानंतर २००९ मध्ये भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वात भाजपात प्रवेश करून ते साकोली क्षेत्रातून निवडून आले. त्यावेळी भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचे राजकीय वर्चस्व होते. त्यावेळी दोन्ही जिल्ह्यात भाजपचे ते एकमेव आमदार होते.सामाजिकदृष्ट्या संमिश्र असलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कुणबी, पोवार, अनुसूचित जाती, तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्याचा अचूक लाभ घेत २०१० मध्ये दोन्ही जिल्हा परिषदेतील सत्ता भाजपकडे खेचून आणली होती. त्यानंतर भाजपने प्रफुल पटेल यांच्याविरूद्ध त्यांना उमेदवारी दिली. त्यात ते निवडूनही आले. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणूक ते स्वत: लढतील का? याविषयी साशंकता आहे. विधान परिषद निवडणूक जशी जिंकली तशीच आगामी लोकसभा निवडणूक जिंकणार असे मधल्या काळात त्यांनी सूचक वक्तव्य केले होते. आता पोटनिवडणुकीत लोकसभेचा उमेदवार कोण असेल याविषयी आताच भाष्य करणे चुकीचे ठरेल. शेतकऱ्यांच्या मुद्यावर आग्रही असलेले नाना पटोले हे २००८ मध्ये काँग्रेस सत्तेत असताना आमदार पदाचा आणि आता भाजप सत्तेत असताना याच मुद्यावरून खासदार पदाचा राजीनामा देणारे बहुधा ते पहिले लोकप्रतिनिधी असावेत.