शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पळून गेलेल्या २५४ अल्पवयीन मुलींना पोलिसांनी दाखविली घरची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:36 IST

भंडारा : सोशल मीडियाचा प्रभाव आणि क्षणिक मोहात प्रेमपाशात अडकून घरुन पळून गेलेल्या मुलींसाठी पोलीस देवदूत ठरले. गत साडेतीन ...

भंडारा : सोशल मीडियाचा प्रभाव आणि क्षणिक मोहात प्रेमपाशात अडकून घरुन पळून गेलेल्या मुलींसाठी पोलीस देवदूत ठरले. गत साडेतीन वर्षात जिल्ह्यातील २५६ अल्पवयीन मुली घर सोडून पळून गेल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांचा माग काढून घरचा रस्ता दाखविला. यावर्षी पळून गेलेल्या दोन मुलींचा शोध पोलीस घेत आहेत.

भंडारा जिल्ह्यात अलीकडे अल्पवयीन मुलींचे प्रेम प्रकरणातून पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. गत काही वर्षातील उदाहरणे बघितली तर क्षणिक मोहात पडून तरुणी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याचे दिसून येते. मात्र आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. २५६ तरुणींपैकी दोन अपवाद वगळता सर्व तरुणींना सुखरूप आपल्या आई-वडिलांच्या हवाली केले आहे.

उदाहरण १

ग्रामीण भागातून मुलगी शहरात शिकायला आली की तिला शहरी वातावरणाची भुरळ पडते. अशातच ती कोणताही विचार न करता कुणाच्या तरी प्रेमात पडते. भंडारा तालुक्यातील एका गावातील तरुणी अशीच एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि शिक्षण सोडून पळून गेली. परंतु आपण अल्पवयीन असल्याने लग्न होऊ शकत नाही हे तिच्या लक्षात आले आणि पोलिसांच्या मदतीने घरी आली.

उदाहरण २

भंडारा शहरातील एका तरुणीचे फेसबुकच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या तरुणाशी प्रेम झाले. ती कुणालाही न सांगता थेट महागावात पोहचली. इकडे आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली. मोबाईल लोकेशनवरून तिचा शोध घेतला. मुलीला आणि तिच्या प्रियकराला भंडाऱ्यात आणले. मुलीला आई-वडिलांच्या हवाली करण्यात आले तर मुलावर गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले.

मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र !

आपली मुलगी अथवा मुलगा नेमका कुठे जातो, त्याचे मित्र कोण आहेत, मोबाईलमधून कुणाशी चॅटिंग करतो याची वारंवार पालकांनी तपासणी करणे गरजेचे झाले आहे.

पालकांनी मुलांना स्वातंत्र्य देताना त्यांच्यावर नियंत्रणही ठेवणे गरजेचे झाले आहे. बाहेरगावी मुलगी शिकत असेल तर तिच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परंतु सर्वच मुली अशा नसतात त्यामुळे पालकांनी मुलांशी मैत्री करावी.

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

२०१८ - ८४

२०१९ - ८०

२०२० - ६१

२०२१ - ३१