शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पोलीस भरती प्रक्रिया तरुणांवर अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:22 IST

राज्याच्या गृहविभागाने पोलीस महाभरती प्रक्रिया राबविली आहे. महाभरतीच्या नावावर भंडारा जिल्ह्यात केवळ ३८ पदे भरण्यात येत आहे.

ठळक मुद्देआज तरुणांचा मोर्चा : रद्द करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : राज्याच्या गृहविभागाने पोलीस महाभरती प्रक्रिया राबविली आहे. महाभरतीच्या नावावर भंडारा जिल्ह्यात केवळ ३८ पदे भरण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो तरुणांवर हा अन्याय असून ही पोलीस भरती प्रक्रिया रद्द करावे अशी मागणी तरुणांनी केली आहे. याबाबत आज सोमवारला जिल्ह्यातील शेकडो तरुण या अन्यायाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात चार हजार पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवित असल्याचे जाहीर केले. मात्र या भरती प्रक्रियेत अनेक तरुणांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र भंडारा जिल्ह्यात केवळ ३८ जागा पोलीस शिपाई प्रक्रियेतून भरण्यात येणार आहे. एकीकडे जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी फौज रोजगारासाठी धावपळ करताना दिसून येत आहे. अशात देशसेवा करण्याची खुणगाठ बांधून भल्या पहाटे कसरत करणाºया युवकांचाही आकडा शेकडोंच्या घरात आहे.त्यामुळे जिल्ह्यात या पोलीस भरती प्रक्रियेत शेकडोंना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना गृहविभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पदभरतीच्या संख्यमुळे तरुण, तरुणींमध्ये नैराश्य पसरले आहे. हजारोंच्या संख्येने तरुण नोकरीच्या शोधात भटकत असताना शासनाकडून नोकरीबंदी करण्यात आली आहे. त्यातही पोलीस भरती प्रक्रियेत अनेकांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तीही संधी गमावल्याची नामुष्की तरुणांवर ओढावली आहे. त्यामुळे राज्याच्या गृहविभागाच्या वतीने राबविण्यात येणारी पोलीस शिपाई पदभरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार पोलीस प्रशिक्षण घेणाºया युवकांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देणाºयांमध्ये विजय गजभिये, सूरज भुसारी, शेखर नेवारे, अजय तिघरे, अजय मेश्राम, दिगांबर निखाडे, सचिन खेडीकर, आनका खंडाईत, गणेश कावळे, मयूर घाटबांधे, केतन खेडीकर, चंदू शिवणकर, मेघराज इखार, कैलाश कठाणे, अविनाश मारबते, प्रणय खंडाईत, ज्ञानदीप शेंडे, अनिल मदनकर, अक्षय बारस्कर, दीनदयाल गिºहेपुंजे, प्रशांत सेलोकर, विशाल काटेखाये, निकेश कुंभलकर, गौरव टेकाम, सचिन करताळे, विष्णू डोकरे, अमृत कांबळे, शुभम वैरागडे आदींनी केली आहे.