शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

पोलीस भरती प्रक्रिया तरुणांवर अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:22 IST

राज्याच्या गृहविभागाने पोलीस महाभरती प्रक्रिया राबविली आहे. महाभरतीच्या नावावर भंडारा जिल्ह्यात केवळ ३८ पदे भरण्यात येत आहे.

ठळक मुद्देआज तरुणांचा मोर्चा : रद्द करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : राज्याच्या गृहविभागाने पोलीस महाभरती प्रक्रिया राबविली आहे. महाभरतीच्या नावावर भंडारा जिल्ह्यात केवळ ३८ पदे भरण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो तरुणांवर हा अन्याय असून ही पोलीस भरती प्रक्रिया रद्द करावे अशी मागणी तरुणांनी केली आहे. याबाबत आज सोमवारला जिल्ह्यातील शेकडो तरुण या अन्यायाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात चार हजार पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवित असल्याचे जाहीर केले. मात्र या भरती प्रक्रियेत अनेक तरुणांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र भंडारा जिल्ह्यात केवळ ३८ जागा पोलीस शिपाई प्रक्रियेतून भरण्यात येणार आहे. एकीकडे जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी फौज रोजगारासाठी धावपळ करताना दिसून येत आहे. अशात देशसेवा करण्याची खुणगाठ बांधून भल्या पहाटे कसरत करणाºया युवकांचाही आकडा शेकडोंच्या घरात आहे.त्यामुळे जिल्ह्यात या पोलीस भरती प्रक्रियेत शेकडोंना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना गृहविभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पदभरतीच्या संख्यमुळे तरुण, तरुणींमध्ये नैराश्य पसरले आहे. हजारोंच्या संख्येने तरुण नोकरीच्या शोधात भटकत असताना शासनाकडून नोकरीबंदी करण्यात आली आहे. त्यातही पोलीस भरती प्रक्रियेत अनेकांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तीही संधी गमावल्याची नामुष्की तरुणांवर ओढावली आहे. त्यामुळे राज्याच्या गृहविभागाच्या वतीने राबविण्यात येणारी पोलीस शिपाई पदभरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार पोलीस प्रशिक्षण घेणाºया युवकांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देणाºयांमध्ये विजय गजभिये, सूरज भुसारी, शेखर नेवारे, अजय तिघरे, अजय मेश्राम, दिगांबर निखाडे, सचिन खेडीकर, आनका खंडाईत, गणेश कावळे, मयूर घाटबांधे, केतन खेडीकर, चंदू शिवणकर, मेघराज इखार, कैलाश कठाणे, अविनाश मारबते, प्रणय खंडाईत, ज्ञानदीप शेंडे, अनिल मदनकर, अक्षय बारस्कर, दीनदयाल गिºहेपुंजे, प्रशांत सेलोकर, विशाल काटेखाये, निकेश कुंभलकर, गौरव टेकाम, सचिन करताळे, विष्णू डोकरे, अमृत कांबळे, शुभम वैरागडे आदींनी केली आहे.