शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पोलीस व जनतेतील दुरावा कमी व्हावा!

By admin | Updated: February 15, 2017 00:26 IST

गुन्हेगारीच्या प्रमाणात पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे मोठी घट होत आहे. मात्र अन्याय झालेल्या व्यक्ती त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार करण्यास धजावतात.

रश्मी नांदेडकर : गणेशपूर येथे फिरत्या पोलीस ठाण्याचे उद्घाटनभंडारा : गुन्हेगारीच्या प्रमाणात पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे मोठी घट होत आहे. मात्र अन्याय झालेल्या व्यक्ती त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार करण्यास धजावतात. पोलिसांनी जनतेतील दुरावा कमी व्हावा यासाठी फिरत्या पोलीस ठाण्यांची संकल्पना राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर यांनी व्यक्त केले. गणेशपुर येथे फिरत्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. गणेशपूर ग्रामपंचायतच्या आवारात फिरत्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नोंदडकर यांच्यासह सरपंच वनिता भुरे, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, पं.स. सदस्य वर्षा साकुरे, तंमुस अध्यक्ष सॅमुवेल गजभिये, पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, ग्रा. पं. सदस्य, पोलीस पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी नांदेडकर यांनी जनतेने कुणालाही न घाबरता त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार पोलिसात दयावी असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक यशवंत चव्हाण यांनी केले. यात त्यांनी तक्रारी असल्यास थेट पोलीस स्टेशनमध्ये नोंदवाव्या किंवा फिरत्या पथकाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आलेल्या या अभिनव सुविधेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.सरपंच वनिता भुरे यांनी गाव तिथे पोलीस स्टेशन योजना ग्रामस्थांसाठी फायद्याचे असून प्रत्येकांनी याचा लाभ घ्यावा व गावातील अवैध धंद्यावर आळा बसविण्यास सहकार्य करावे असे प्रतिपादन केले. संचालन तंमुस अध्यक्ष गजभिये यांनी केले तर आभार कौशल यांनी केले. कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य धनराज मेहर, मनिष गणविर, किर्ती गणविर, दामिनी सळमते, सुभद्रा हेडाऊ, माधुरी देशकर, संध्या बोदेले, मधुमाला बावनउके, सुधा चवरे, पुष्पलता कारेमोरे, कृष्णा गोखले, शेखर खराबे, देवा कारेमोरे, सुभाष बोरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)