शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

समाज वास्तवाच्या अवस्थेतूनच कविता उमलत जाते

By admin | Updated: March 8, 2017 00:36 IST

अलीकडच्या काळात कविता जीवनातील किंवा निसर्गातील आनंदानुभूतीतून उमलत वा बहरत नाही.

युवराज गंगाराम यांचे प्रतिपादन : युगसंवादचा कवी आणि कविता काव्यसोहळाभंडारा : अलीकडच्या काळात कविता जीवनातील किंवा निसर्गातील आनंदानुभूतीतून उमलत वा बहरत नाही. अलीकडे भीषण समाज वास्तवाच्या क्रूर अवस्थेतूनच खरी कविता अभिव्यक्त होत जाते. आजची कविता ही सभोवतीच्या भीषण वास्तवाची एक सहज प्रतिक्रिया बनली आहे. अशा आशयाचे काव्यचिंतन कवी युवराज गंगाराम आणि गिरिश सपाटे यांनी भंडारा येथील युगसंवादच्या कवी आणि कविता या काव्यसोहळ्यात व्यक्त केले.युगसंवाद वाड्:मयीन आणि सांस्कृतिक संस्था विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रराज सभागृहात कवी आणि कविता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा दिनानिमत्त आयोजित या उपक्रमात सर्वप्रथम कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द अभ्यासक सुभंत रहाटे हे होते. त्यांच्याहस्ते निमंत्रित कवी युवराज गंगाराम व डॉ. गिरिश सपाटे यांना शाल, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. मुलाखतीतून कवी धुवराज गंगाराम यांनी आपल्या कवितेची निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखवताना म्हटले, प्रांरभी कवी अनिलांच्या सहवासात असूनही माझी कविता रम्यभावकवितेच्या प्रांतात रमली नाही. माझ्या कवितेला खरा स्वर सापडला तो डॉ. आंबेडकरी प्रेरणेने व विद्रोही आशयानेच. प्रकट मुलाखतीत डॉ. गिरिश सपाटे म्हणाले माझी कविता माणसाची अभ्यासक आहे मी जिवनात व ग्रंथातूनही माणसाचे नम शोधत असतो. तसेच माझी कविता प्रा. कृष्णा चौधरीच्या प्रभावातून व संस्कारातून घडत गेली आहे.या दोन्ही कविंच्या मुलाखतीचे संयोजन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. डॉ. गिरिश सपाटे व कवी युवराज गंगाराम यांनी आपल्या निवडक कवितांचे अभिवाचन केले. या कवीवर आस्वादक प्रतिक्रीया डॉ. सांची भगत, प्रा. जगदिश युजरकर याअभ्यासकांनी व्यक्त केल्या. युवराज गंगारामांच्या कवितेत डॉ. आंबेडकरांच्या ब्रोकनमन सिध्दांताचा अविष्कार आढळत असल्याचे मत डॉ. साची भगत यांनी मांडले. प्रा. जगदिश गुजरकर आपले मत व्यक्त करतांना म्हणाले, गिरिश सपाटेंची कविता मातीशी इमान राखणारी कविता असून कवीने कवितेसाठी आपल्या तरल संदेवनेचे व साधनेचे मोल दिले आहे.काव्य सोहळ्याच्या समारोप सुभंत रहाटे यांनी दोन्ही कवीच्या काव्य लेखनाची आणि निर्मिती प्रेरणांची साक्षेची चिकित्सा मांडली. याप्रसंगी कवी गिरिश सपाटे यांच्या काळोख गडद होता चाललाटा या कविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. युगसंवादाचे सक्रिय सदस्य प्रा. डॉ. जगजीवन कोटांगले यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला. निमंत्रित कविंचा परिचय आणि प्रास्ताविक प्राचार्य डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. जयश्री सातोकर यांनी तर आभार प्रदर्शन हर्षल मेश्राम यांनी केले. या संस्मरणीय काव्य सोहळयास प्रसिध्द कवी प्रल्हाद सोनवाने, लखनसिंह कटरे, भगवान सुखदेवे, बापू इलमकर यांच्यासह गोंदिया, आमगाव, रामटेक, नागपूर, अड्याळ येथील अनेक काव्यप्रेमी मंडळीनी आवर्जून उपस्थित होती. (शहर प्रतिनिधी)