शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

प्लास्टिकला बांबू उत्पादन पर्याय होऊ शकतोे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

भंडारा येथे लोकमंगल समूहाच्या वतीने बांबू प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त सुनील देशपांडे येथे आले असता त्यांनी बांबू या विषयावर माहिती दिली. करंगळीच्या आकारापासून ते एक फुट व्यास असलेले बांबू देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. सहा फुट ते १०० फूट उंचीेचे बांबू पहावयास मिळतात. भारतात भौगोलीक विविधता असल्याने क्षेत्र निहाय बांबूच्या जाती बदलतात.

ठळक मुद्देसुनील देशपांडे यांची माहिती : जिल्ह्यात बांबूवर आधारित लघु उद्योगासाठी मोठी संधी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बांबू हा कल्पवृक्ष आहे. त्याचे विविध उपयोग प्राचीन काळापासून केले जाते. परंतु अलिकडे प्लास्टिकचा वापर वाढला आणि बांबूच्या वस्तूकडे दुर्लक्ष होऊ लागले. मात्र पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिक उत्पादनाला बांबूचे उत्पादन पर्याय होऊ शकते. गृहनिर्माणापासून ते विविध उपयोगी वस्तू या बांबूपासून तयार केल्या जातात. स्थानिक लोकांमध्ये कौशल्य विकसीत करण्याची गरज असून भंडारा जिल्ह्यात बांबूवर आधारित लघू उद्योगाला मोठी संधी आहे, असे मेळघाटच्या संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भंडारा येथे लोकमंगल समूहाच्या वतीने बांबू प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त सुनील देशपांडे येथे आले असता त्यांनी बांबू या विषयावर माहिती दिली. करंगळीच्या आकारापासून ते एक फुट व्यास असलेले बांबू देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. सहा फुट ते १०० फूट उंचीेचे बांबू पहावयास मिळतात. भारतात भौगोलीक विविधता असल्याने क्षेत्र निहाय बांबूच्या जाती बदलतात. देशात तब्बल १३६ जातींचे बांबू असून एकट्या अरुणाचल प्रदेश मध्ये ५२ जातीचे बांबू पहायला मिळतात. बांबूच बन एकवेळ लावले तर त्यापासून १२० वर्ष उत्पादन मिळते असे सुनील देशपांडे यांनी सांगितले.जन्मापासून ते मृत्यूपर्यंत बांबूची साथ असते. पूर्वी बाळाचा जन्म झाल्यानंतर नाळ कापण्यासाठी बांबूचा चाकू वापरला जायचा. तर अंतयात्रेतील तिरडीही बांबूचीच असते. पूर्वीच्या काळात अनेक गृहोपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जायच्या. बांबूचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व होते. परंतु अलिकडे प्लास्टिकचा वापर वाढला आणि बांबू अडगळीत पडला. कल्पवृक्ष असलेल्या या बांबूपासून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून केला जात आहे. आतापर्यंत मेळघाटसह विविध भागातील दहा हजार लोकांना बांबू उत्पादनासाठी प्रशिक्षित करण्यात आले. २० केंद्र देशात उभारण्यात आले आहेत. बांबूपासून अलंकार, शिल्प आणि गृहनिर्माण अशी तिहेरी उत्पादन घेतली जात आहेत. आम्ही तयार केलेल्या बांबूच्या राखीला देशभर मोठी मागणी आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात बांबूमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. रोजगारासोबतच पर्यावरणाचा ºहासही टाळता येतो असे त्यांनी सांगितले.भंडारा येथे दोन दिवसीय बांबू प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीवर विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. लोकमंगल समूहाचे अध्यक्ष अनिल मेंढे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा साकारली असून भंडारा जिल्ह्यात बांबूपासून उत्पादने तयार करण्याचा प्रकल्प लवकरच साकारला जाणार आहे.ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी धडपडअमरावती जिल्ह्यातील मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक अध्यक्ष सुनील देशपांडे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी धडपडत आहेत. समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेले देशपांडे यांची विणू काळे यांच्यासोबत भेट झाली आणि बांबूशी त्यांचा घनिष्ट संबंध आला. चित्रकुट ग्रामोदय विश्वविद्यालयात ते बांबू विभागाचे विभागप्रमुख होते. १६ जून १९९५ पासून ते मेळघाटमध्ये राहावयास गेले. डॉ.रवींद्र कोल्हे यांच्या सहकार्याने संपूर्ण बांबू केंद्राची त्यांनी स्थापना केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी