शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

शेततळ्याच्या पाण्यावर केली रोवणी

By admin | Updated: May 26, 2016 01:34 IST

मागील वर्षी मान्सूनला उशिरा सुरूवात झाल्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारली. रोवणीची वेळ आली तरी पावसाचा पत्ता नव्हता.

लोकमत जलमित्र अभियान : जलयुक्त शिवारातून जलक्रांतीभंडारा : मागील वर्षी मान्सूनला उशिरा सुरूवात झाल्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारली. रोवणीची वेळ आली तरी पावसाचा पत्ता नव्हता. अशावेळी जलयुक्त शिवारमध्ये केलेल्या आणि पहिल्याच पावसाने भरलेल्या शेततळयातील पाणी कामी आले. तळयातील पाण्याचा उपयोग करून रोवणी तर केलीच पण पाण्यामुळे माझे पीक वाचले व दुबार रोवणीची वेळ माझ्यावर आली नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया सितासावंगी गावातील सोमा गाढवे या शेतकऱ्याने व्यक्त केली. भंडारा जिल्ह्यात आजघडीला पाणीटंचाई दिसून येत नसली, तरी ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. दरवर्षी मुबलक पाऊस होतो. मात्र त्या पाण्याचे योग्य पुनर्भरण होत नाही. ते सर्व पाणी नदी-नाल्यांमधून वाहून जाते. या पाण्याचे जतन व्हावे, यासाठी जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने जलमित्र अभियान सुरू केले आहे. भंडारा हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. तुमसर तालुक्याच्या सीतासावंगी या गावातील शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर शेती करतात. भंडारा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्यामुळे येथील शेतकरी धान हे मुख्य पीक घेतात. मात्र पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना अनेकदा भाताचे पीक घेणेही शक्य होत नाही. या गावातील सोमा गाढवे यांची दोन एकर शेती आहे. कोरडवाहू शेती असल्यामुळे भात व तुर पीक ते घेतात. मात्र एखाद्यावर्षी पाऊस उशिरा आला किंवा कमी झाला तर भाताचे पीक हातचे जात असल्याचे गाढवे यांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजनेमधून गाढवे यांच्या शेतात २५ बाय २० बाय ७ मीटर या आकाराचे शेततळे खोदण्यात आले. पहिल्याच पावसात शेततळे भरले. पावसाला सुरूवात झाल्यामुळे गाढवे यांनी भात नर्सरी तयार केली. मात्र पावसाने महिनाभर दडी मारली. पावसाअभावी अन्य शेतकऱ्यांची नर्सरी करपत असताना गाढवे यांनी शेततळयातील पाण्यावर नर्सरी वाचवली आणि पाण्याचा उपयोग चिखलणीसाठी करून धानाची रोवणी केली. ज्यावेळी धानाला पाण्याची गरज होती आणि पाऊस आला नाही त्यावेळी शेततळयातील पाणी देऊन त्यांना पीक वाचवता आले. शेततळयामुळे एका पाण्याअभावी पीक जाण्याची भीती आता राहिली नाही. शेततळयात उन्हाळ्यापर्यंत पाणी राहिले तर, भाजीपाला लागवड करण्याचा मानस गाढवे यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)