शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

वीज तारांच्या खाली वृक्षारोपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:38 IST

पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण केले जाते. शासनासह खाजगी स्तरावर वृक्षारोपणाला मोठे महत्त्व आले आहे. मात्र, हे वृक्षारोपण करताना इतर ...

पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण केले जाते. शासनासह खाजगी स्तरावर वृक्षारोपणाला मोठे महत्त्व आले आहे. मात्र, हे वृक्षारोपण करताना इतर काही गोष्टींचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. खाजगी स्तरावरील वृक्षारोपणात स्वतःचे अधिकार असल्याने स्वतःच्या मालकीत आपण आपल्या अधिकाराचा वापर करून वृक्षारोपण करू शकतो; परंतु शासकीय योजनेतून शासकीय जागेवर वृक्षारोपण करताना काळजी घेणे नितांत गरजेचे असते. मात्र, सामाजिक वनीकरण विभाग लाखनीच्या वतीने किटाडी ते सायगाव फाटा या रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्षारोपणात नेमकी वीज तारांच्या अगदी खाली वृक्षारोपण केलेले आहे. यामुळे पाच वर्षांत वृक्षवाढ अपेक्षित आहे. तेव्हा महावितरणमार्फत त्यांची कटाई केली जाईल किंवा छटाई केली जाईल. कदाचित एखादा नागरिक वीज तारांच्या संपर्कात येऊन धोकासुद्धा अपेक्षित आहे. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा झालेले वृक्षारोपण योग्य आहे काय, असा प्रश्न लाखनी तालुक्यातील मांगली येथील उद्धव मासूरकर यांनी केला आहे.

कोट

वृक्षारोपणाच्या पूर्वी खड्डे खोदणाऱ्या मजुरांना खड्डे चुकीचे असल्याचे सांगितलेले होते. खड्ड्याची खोली व रुंदी अपेक्षित नसून विजेच्या तारांच्या खाली वृक्षारोपण चुकीचे आहे. भविष्याचा विचार वन विभागाने केला नाही. खर्च लावून वृक्षारोपण करणे व मोठी झाल्यावर त्यांची कत्तल करणे हे योग्य आहे काय? यात जनतेच्या पैशाचा दुरुपयोग नाही काय? वन विभागाने वेळीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे होते.

उद्धव मासुरकर, तक्रारदार, मांगली

कोट

संबंधित तक्रारीची दखल घेऊन वृक्षारोपण झालेल्या ठिकाणची चौकशी केली जाईल. नेमके काय प्रकार आहे ते अभ्यासून सुधारणा केली जाईल.

प्रमोद फुले, क्षेत्र सहायक, सामाजिक वनीकरण विभाग, लाखनी