शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST

धान उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. शेतकरी बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करतो. उत्पन्न घेण्यास अडचणी ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. शेतकरी बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करतो. उत्पन्न घेण्यास अडचणी येत असतात. केवळ आठ तास वीजपुरवठा केल्याने शेती पिकविण्यास अडचणी येतात. विंधन विहिरीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. धान पिकाला लावलेली मजुरी, खत, बियाणे व इतर खर्चाचा विचार करता शेतकऱ्याला पुरेसे उत्पन्न मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. मुलामुलींचे शिक्षण व लग्नही करू शकत नाही. अशावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना घडताना दिसून येत असल्याचे रणवीर भगत यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. लाखनी तालुक्यातील गडेगाव, गोंडसावरी, सावरी, मुरमाडी (सावरी), लाखनी, लाखोरी, सालेभाटा, केसलवाडा (पवार), मोरगाव, पिंपळगाव (सडक) ह्या तलाठी सजातील ३२ गावांना ७ हजार ५५३ हेक्टर आर शेती क्षेत्र नवीन नहराद्वारे सिंचन करता येणार आहे. साकोली तालुक्यातील ८ हजार ३२० हेक्टर आर शेती क्षेत्रातील १७ गावांना नवीन नहराचा लाभ होऊ शकतो, असे निवेदनात भगत यांनी स्पष्ट केले आहे. तलावात नहराचे पाणी सोडल्यास शेतीला पाणीपुरवठा करता येईल. लाखनी व साकोली तालुक्यातील किन्ही, गडेगाव, रेंगेपार (कोठा), खुर्सिपार, लाखोरी, निलागोंदी, सालेभाटा, चिखलाबोडी, एकोडी, बाम्पेवाडा, उसगाव, चांदोरी, पिंडकेपार, घानोड येथील मोठ्या जलाशयात गोसेखुर्द नहराचे व उपसा सिंचनाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळेल.