शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

धान बाहेर जिल्ह्यात भरडाईस देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून धान खरेदीला प्रारंभ झाला. तब्बल ३० लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली. नियोजनाच्या अभावाने तांदळाची उचलच झाली नाही. तांदळाची उचल केली असती तर गोदाम रिकामे झाले असते आणि स्थानिक मिलर्सला भरडाई करणे शक्य झाले असते. सध्या जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. गोदम हाऊसफुल असल्याने उन्हाळी धानाची खरेदी प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्देदहा लाख क्विंटल धान पडून, अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा : तांदळाची वेळेत उचल न झाल्याने गोदाम रिकामे झाले नाही. परिणामी जिल्ह्यातील धानाची भरडाई रखडली. आता पावसाळ्याचे कारण पुढे करीत जिल्ह्यातील धान नागपूर आणि गोंदिया येथील राईस मिलर्सना भरडाईकरिता देण्याचा घाट घातला आहे. त्यासंदर्भात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविले आहे. तांदूळ वेळेवर उचलला गेला असता तर गोदाम रिकामे झाले असते आणि जिल्ह्यातील मिलर्सनीच भरडाई केली असती. मात्र नियोजनाच्या अभावाने सध्या जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान पडून आहेत.भंडारा जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून धान खरेदीला प्रारंभ झाला. तब्बल ३० लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली. नियोजनाच्या अभावाने तांदळाची उचलच झाली नाही. तांदळाची उचल केली असती तर गोदाम रिकामे झाले असते आणि स्थानिक मिलर्सला भरडाई करणे शक्य झाले असते. सध्या जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. गोदम हाऊसफुल असल्याने उन्हाळी धानाची खरेदी प्रभावित झाली आहे.आता पावसाळ्याचे कारण पुढे करीत जिल्ह्यातील धान भरडाईसाठी नागपूर व गोंदिया जिल्ह्याला देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. १ जून रोजी जिल्हा धान भरडाई समितीची बैठक झाली. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठविले. त्या पत्रात पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील आॅफर भरलेल्या मिलर्सला सीएमआर धान भरडाईचे काम देण्याबाबत आपल्या स्तरावरून निर्देश द्यावे असे म्हटले आहे.गोदाम हाऊसफुल्लजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान खरेदी होत असली तरी गोदामांचे नियोजन मात्र दिसत नाही. यावर्षी ३० लाख क्विंटल धान खरेदी झाल्यानंतर गोदाम हाऊसफुल्ल झाले. सुरुवातीपासूनच तांदळाची उचल करणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. अन्न व पुरवठा विभागाने आणि स्थानिक पणन कार्यालयाने दुर्लक्ष केले. परिणामी गोदाम रिकामे झाले नाही आणि भरडाईला धान देता आले नाही. वेळीच तांदूळ उचलला असता तर जिल्ह्यातील मिलर्सला भरडाई करणे शक्य झाले असते. त्यातून येथील कामगारांना रोजगार मिळाला असता. आता बाहेर जिल्ह्यात भरडाईसाठी धान देण्याचा प्रयत्न सुरु असल्याने जिल्ह्यातील १० हजार मजुरांवर उपासमारीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. आता २५ दिवसांच्या कालावधीत धान भरडाई कशी होणार हाही प्रश्न आहे. आधीच लॉकडाऊनने रोजगार हिरावला. आता यामुळे मजूर संकटात येणार आहेत.सहा महिन्याचा कालावधी लोटूनही राज्य शासनाने भरडाईसंदर्भात योग्य नियोजन केले नाही. आता प्रशासनाने भंडारा जिल्ह्यातील धान अन्य दुसºया जिल्ह्यात भरडाई करण्यास देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील हजारो मजुरांच्या हातचे काम हिरावले जाणार आहे. ही भरडाई जिल्ह्यातच व्हावी अशी मागणी आहे.-डॉ.परिणय फुके, आमदारभंडारा जिल्ह्यात १६६ मिलर्स आहेत. त्यांची दरदिवशी ५० हजार क्विंटल भरडाईची क्षमता आहे. जिल्ह्यात खरेदी झालेला ३० लाख क्विंटल धान ६६ दिवसात भरडाई करणे शक्य होते. परंतु आता २०० दिवस पूर्ण झाले तरी १० लाख क्विंटल धान शिल्लक आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षित धोरणाने ही वेळ आली आहे. जिल्ह्यातील धानाची जिल्ह्यातच भरडाई व्हावी अशी आमची भूमिका आहे. बाहेर जिल्ह्यात भरडाईसाठी धान दिल्यास आम्ही आंदोलन करू.-राजू कारेमोरे,आमदार तथा अध्यक्ष जिल्हा राईस मिलर्स असोसिएशन, भंडारा.