शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

धान बाहेर जिल्ह्यात भरडाईस देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून धान खरेदीला प्रारंभ झाला. तब्बल ३० लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली. नियोजनाच्या अभावाने तांदळाची उचलच झाली नाही. तांदळाची उचल केली असती तर गोदाम रिकामे झाले असते आणि स्थानिक मिलर्सला भरडाई करणे शक्य झाले असते. सध्या जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. गोदम हाऊसफुल असल्याने उन्हाळी धानाची खरेदी प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्देदहा लाख क्विंटल धान पडून, अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा : तांदळाची वेळेत उचल न झाल्याने गोदाम रिकामे झाले नाही. परिणामी जिल्ह्यातील धानाची भरडाई रखडली. आता पावसाळ्याचे कारण पुढे करीत जिल्ह्यातील धान नागपूर आणि गोंदिया येथील राईस मिलर्सना भरडाईकरिता देण्याचा घाट घातला आहे. त्यासंदर्भात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविले आहे. तांदूळ वेळेवर उचलला गेला असता तर गोदाम रिकामे झाले असते आणि जिल्ह्यातील मिलर्सनीच भरडाई केली असती. मात्र नियोजनाच्या अभावाने सध्या जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान पडून आहेत.भंडारा जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून धान खरेदीला प्रारंभ झाला. तब्बल ३० लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली. नियोजनाच्या अभावाने तांदळाची उचलच झाली नाही. तांदळाची उचल केली असती तर गोदाम रिकामे झाले असते आणि स्थानिक मिलर्सला भरडाई करणे शक्य झाले असते. सध्या जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. गोदम हाऊसफुल असल्याने उन्हाळी धानाची खरेदी प्रभावित झाली आहे.आता पावसाळ्याचे कारण पुढे करीत जिल्ह्यातील धान भरडाईसाठी नागपूर व गोंदिया जिल्ह्याला देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. १ जून रोजी जिल्हा धान भरडाई समितीची बैठक झाली. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठविले. त्या पत्रात पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील आॅफर भरलेल्या मिलर्सला सीएमआर धान भरडाईचे काम देण्याबाबत आपल्या स्तरावरून निर्देश द्यावे असे म्हटले आहे.गोदाम हाऊसफुल्लजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान खरेदी होत असली तरी गोदामांचे नियोजन मात्र दिसत नाही. यावर्षी ३० लाख क्विंटल धान खरेदी झाल्यानंतर गोदाम हाऊसफुल्ल झाले. सुरुवातीपासूनच तांदळाची उचल करणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. अन्न व पुरवठा विभागाने आणि स्थानिक पणन कार्यालयाने दुर्लक्ष केले. परिणामी गोदाम रिकामे झाले नाही आणि भरडाईला धान देता आले नाही. वेळीच तांदूळ उचलला असता तर जिल्ह्यातील मिलर्सला भरडाई करणे शक्य झाले असते. त्यातून येथील कामगारांना रोजगार मिळाला असता. आता बाहेर जिल्ह्यात भरडाईसाठी धान देण्याचा प्रयत्न सुरु असल्याने जिल्ह्यातील १० हजार मजुरांवर उपासमारीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. आता २५ दिवसांच्या कालावधीत धान भरडाई कशी होणार हाही प्रश्न आहे. आधीच लॉकडाऊनने रोजगार हिरावला. आता यामुळे मजूर संकटात येणार आहेत.सहा महिन्याचा कालावधी लोटूनही राज्य शासनाने भरडाईसंदर्भात योग्य नियोजन केले नाही. आता प्रशासनाने भंडारा जिल्ह्यातील धान अन्य दुसºया जिल्ह्यात भरडाई करण्यास देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील हजारो मजुरांच्या हातचे काम हिरावले जाणार आहे. ही भरडाई जिल्ह्यातच व्हावी अशी मागणी आहे.-डॉ.परिणय फुके, आमदारभंडारा जिल्ह्यात १६६ मिलर्स आहेत. त्यांची दरदिवशी ५० हजार क्विंटल भरडाईची क्षमता आहे. जिल्ह्यात खरेदी झालेला ३० लाख क्विंटल धान ६६ दिवसात भरडाई करणे शक्य होते. परंतु आता २०० दिवस पूर्ण झाले तरी १० लाख क्विंटल धान शिल्लक आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षित धोरणाने ही वेळ आली आहे. जिल्ह्यातील धानाची जिल्ह्यातच भरडाई व्हावी अशी आमची भूमिका आहे. बाहेर जिल्ह्यात भरडाईसाठी धान दिल्यास आम्ही आंदोलन करू.-राजू कारेमोरे,आमदार तथा अध्यक्ष जिल्हा राईस मिलर्स असोसिएशन, भंडारा.