शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:06 IST

यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजनाला सुरूवात करावी, ....

ठळक मुद्देचरण वाघमारे : तुमसर व मोहाडी येथे पाणी टंचाई आढावा बैठक

आॅनलाईन लोकमततुमसर/मोहाडी : यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजनाला सुरूवात करावी, असे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी येथे तुमसर व मोहाडी पंचायत समितीत आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.तुमसरात जि.प.च्या महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, सभापती कविता बनकर, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य बाळकृष्ण गाढवे, मंगला कनपटे, रोशना नारनवरे, राजू ढबाले, अरविंद राऊत, अशोक बन्सोड, शिशुपाल गौपाले, खंडविकास अधिकारी आर.एम. दिघे, सहायक गटविकास अधिकारी एम.एस. मगर, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, उपविभागीय अभियंता बावनकर उपस्थित होते.तुमसर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीचा पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. सरपंच, ग्रामसेवकांनी पाणीपुरवठ्याची माहिती व गरज सांगितली. खंडविकास अधिकाºयांनी जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, ग्रामसेवक, सरपंचांना बैठकीला बोलाविले होते. परंतु अनेक सरपंचांनी बैठकीला दांडी मारली. जि.प. सभापती शुभांगी राहांगडाले वगळता एकही जि.प. सदस्य बैठकीला आले नाही. प्रथमच निवडून आलेले सरपंचाची ही पहिलीच बैठक असल्यामुळे महिला सरपंचाची उपस्थिती लक्षणीय होती. तुमसर तालुक्यात सरपंच अभ्यासवर्ग घेण्यात येईल, असे आ. वाघमारे यांनी सांगितले. संचालन डॉ. भाष्कर चोपकर यांनी केले.मोहाडी येथे आयोजित बैठकीत पंचायत समितीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे, तहसिलदार सुर्यकांत पाटील, खंडविकास अधिकारी मोरे, कार्यकारी अभियंता दिलीप मैदमवार, उपविभागीय अभियंता बावनकर, जिल्हा परिषद सदस्य चंदु पिल्लारे, निलिमा इलमे, रामराव कारेमोरे, पंचायत समितीचे उपसभापती विलास गोबाडे, पं.स. सदस्य उमेश पाटील, भारत टेकाम, जगदीश उके, महादेव पचघरे, विशाखा बांडेबुचे, निशाद कळंबे, निता झंझाड, किरण भैरम उपस्थित होते.मोहाडी तालुक्यातील सरपंचांनी गावातील संभाव्य पाणी टंचाईसाठी करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती देऊन बोरवेल व पाणी पुरवठा योजनेची मागणी केली.धोप गावाच्या टोलीवर पुरेशा पाणी मिळत नसल्याने नवीन पाण्याची टाकी देण्याची मागणी सरपंचानी केली. पारडी येथील सरपंचानी हातपंपावरच नळ योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. वरठी येथे १४ हातपंपाची मागणी करण्यात आली.वासेरा ग्रामपंचायतीमध्ये लहानलहान पाच टोली असल्याने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.सरपंचांनी मांडल्या गावातील समस्यासालई खुर्द येथे एका व्यक्तीने हातपंप तोडून त्याठिकाणी घर बांधले. दलित वस्ती पाणीपुरवठा योजना तीन वर्षापासून बंद स्थितीत असून जलस्वराज्य योजनेत एक लक्ष ९६ हजार रूपयांची दुरूस्ती करण्यात आली तरी ती नळयोजना बंद आहे, असे तेथील माजी सरपंचाने सांगितले.जांभोरा येथील स्मशानभूमीतील हातपंप जमिनीच्या आत जात असल्याचे सरपंचांनी निदर्शनास आणून दिले. डोंगरगांव येथे अनेक वर्षापासून पाणीटंचाई उद्भवत असते व नळयोजनेवर ३ लाख ८३ हजार रूपयांचे विज बिल थकीत असल्याने नळयोजना बंद असल्याचे सरपंचानी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.सूर नदी काठावरील ग्रामपंचायतीनी मार्च, एप्रिलमध्ये होणाऱ्या पाणी टंचाईसाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सूर नदीत सोडावे यासाठी ठराव घेऊन सामूहिक मागणी करावी, असे आवाहन आ.वाघमारे यांनी केले. संभाव्य पाणीटंचाईवर करण्यात येणाºया उपाययोजनेची चुकीच्या माहिती देणाऱ्यां पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना आ.वाघमारे यांनी चांगलेच खडसावले.