शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:06 IST

यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजनाला सुरूवात करावी, ....

ठळक मुद्देचरण वाघमारे : तुमसर व मोहाडी येथे पाणी टंचाई आढावा बैठक

आॅनलाईन लोकमततुमसर/मोहाडी : यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजनाला सुरूवात करावी, असे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी येथे तुमसर व मोहाडी पंचायत समितीत आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.तुमसरात जि.प.च्या महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, सभापती कविता बनकर, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य बाळकृष्ण गाढवे, मंगला कनपटे, रोशना नारनवरे, राजू ढबाले, अरविंद राऊत, अशोक बन्सोड, शिशुपाल गौपाले, खंडविकास अधिकारी आर.एम. दिघे, सहायक गटविकास अधिकारी एम.एस. मगर, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, उपविभागीय अभियंता बावनकर उपस्थित होते.तुमसर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीचा पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. सरपंच, ग्रामसेवकांनी पाणीपुरवठ्याची माहिती व गरज सांगितली. खंडविकास अधिकाºयांनी जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, ग्रामसेवक, सरपंचांना बैठकीला बोलाविले होते. परंतु अनेक सरपंचांनी बैठकीला दांडी मारली. जि.प. सभापती शुभांगी राहांगडाले वगळता एकही जि.प. सदस्य बैठकीला आले नाही. प्रथमच निवडून आलेले सरपंचाची ही पहिलीच बैठक असल्यामुळे महिला सरपंचाची उपस्थिती लक्षणीय होती. तुमसर तालुक्यात सरपंच अभ्यासवर्ग घेण्यात येईल, असे आ. वाघमारे यांनी सांगितले. संचालन डॉ. भाष्कर चोपकर यांनी केले.मोहाडी येथे आयोजित बैठकीत पंचायत समितीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे, तहसिलदार सुर्यकांत पाटील, खंडविकास अधिकारी मोरे, कार्यकारी अभियंता दिलीप मैदमवार, उपविभागीय अभियंता बावनकर, जिल्हा परिषद सदस्य चंदु पिल्लारे, निलिमा इलमे, रामराव कारेमोरे, पंचायत समितीचे उपसभापती विलास गोबाडे, पं.स. सदस्य उमेश पाटील, भारत टेकाम, जगदीश उके, महादेव पचघरे, विशाखा बांडेबुचे, निशाद कळंबे, निता झंझाड, किरण भैरम उपस्थित होते.मोहाडी तालुक्यातील सरपंचांनी गावातील संभाव्य पाणी टंचाईसाठी करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती देऊन बोरवेल व पाणी पुरवठा योजनेची मागणी केली.धोप गावाच्या टोलीवर पुरेशा पाणी मिळत नसल्याने नवीन पाण्याची टाकी देण्याची मागणी सरपंचानी केली. पारडी येथील सरपंचानी हातपंपावरच नळ योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. वरठी येथे १४ हातपंपाची मागणी करण्यात आली.वासेरा ग्रामपंचायतीमध्ये लहानलहान पाच टोली असल्याने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.सरपंचांनी मांडल्या गावातील समस्यासालई खुर्द येथे एका व्यक्तीने हातपंप तोडून त्याठिकाणी घर बांधले. दलित वस्ती पाणीपुरवठा योजना तीन वर्षापासून बंद स्थितीत असून जलस्वराज्य योजनेत एक लक्ष ९६ हजार रूपयांची दुरूस्ती करण्यात आली तरी ती नळयोजना बंद आहे, असे तेथील माजी सरपंचाने सांगितले.जांभोरा येथील स्मशानभूमीतील हातपंप जमिनीच्या आत जात असल्याचे सरपंचांनी निदर्शनास आणून दिले. डोंगरगांव येथे अनेक वर्षापासून पाणीटंचाई उद्भवत असते व नळयोजनेवर ३ लाख ८३ हजार रूपयांचे विज बिल थकीत असल्याने नळयोजना बंद असल्याचे सरपंचानी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.सूर नदी काठावरील ग्रामपंचायतीनी मार्च, एप्रिलमध्ये होणाऱ्या पाणी टंचाईसाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सूर नदीत सोडावे यासाठी ठराव घेऊन सामूहिक मागणी करावी, असे आवाहन आ.वाघमारे यांनी केले. संभाव्य पाणीटंचाईवर करण्यात येणाºया उपाययोजनेची चुकीच्या माहिती देणाऱ्यां पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना आ.वाघमारे यांनी चांगलेच खडसावले.