शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:40 IST

महागाईने जनता त्रस्त झाली असून भाजपचे सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट रचत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्दे भंडाऱ्यात पोहचली महापर्दाफाश यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाच वर्षांपूर्वी राज्यावर दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते आता पाच लाख कोटींवर पोहचले आहे. प्रत्येक शासकीय विभागात दीड लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली असून भाजपचे सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट रचत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केले.अमरावती येथून सोमवारी प्रारंभ झालेली महापर्दाफाश यात्रा मंगळवारला दुपारी १ वाजता भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. शहरातील साखरकर सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव जिया पटेल, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, सभापती प्रेम वनवे, शिशीर वंजारी, कैलाश भगत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, शाम पांडे, धनराज साठवणे, डॉ.ब्राम्हणकर, टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, भाजपने फक्त आश्वासनांवर जनतेचा कौल मिळविला, मात्र जनतेला आश्वासनाऐवजी कुठलीच परतफेड केली नाही. दुष्काळ सुरु असताना उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. मात्र आता भर पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यात पुराचे थैमान असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेत व्यस्त होते. भाजप शासनाच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना या असंवेदनशील सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कार्य केले आहे. पेट्रोल व डिझेलच्या माध्यमातून दर महिन्याला तीन हजार ५०० कोटी रुपयांची लुट सामान्य जनतेकडून केली जात आहे. शेतकरी कर्जमाफी ही केवळ फार्स ठरली आहे. गरीबांच्या पैशांची उधळपट्टी सर्रास केली जात असून ज्या योजना राबविल्या जात आहेत त्या काँग्रेस शासन काळातील आहेत. संविधान व लोकशाही व्यवस्था महत्वाची असताना भाजपचे खासदार मात्र शहीदांबद्दल अपमानकारक वक्तव्य करून जनभावना भडकावित आहेत. नोकरभरती बंद असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही देण्यात आली नाही. ३७० कलम हटविण्यावर भाजपची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. वीज व आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसची नीती स्पष्ट असून मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याने याबाबत जो निर्णय घेतला आहे तोच निर्णय काँग्रेसही घेईल असा सुतोवाचही त्यांनी केला.तर प्रचाराची भूमिका महत्वाचीसाकोली विधानसभा क्षेत्रातून आपली उमेदवारी आहे काय? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, काँग्रेसच्या वरिष्ठांना याबाबत मी आपली भूमिका कळविली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातून लढविण्यापेक्षा प्रचार कार्यात सहभागी होणे महत्वाचे आहे. हीच भूमिका महत्वाची असून काँग्रेसला बळकट करणे हेच माझे ध्येय असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले