शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पिक विमा योजना ठरली फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:56 IST

प्रधानमंत्री पिक विमा योजना सक्तीची केल्याने शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. भंडारा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आणि दुष्काळाचा ज्या शेतकऱ्यांना फटका बसला, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही.

ठळक मुद्देपटोले यांचा आरोप : वंचित शेतक-यांना मोबदला द्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री पिक विमा योजना सक्तीची केल्याने शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. भंडारा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आणि दुष्काळाचा ज्या शेतकऱ्यांना फटका बसला, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे काढून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि शेतकऱ्यांनी लुट होऊ देणार नाही, असा ईशारा माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला.यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्ह्यात ५६,०६२ शेतकऱ्यांनी ५४,९५३ हेक्टर क्षेत्रातला पिक विमा काढला होता. त्यापोटी चार कोटी २८ लाख ४३ हजार रूपयांची रक्कम पिक विमा कंपनीकडे भरली. यावर्षी दुष्काळ जाहिर होऊनही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. एकीकडे सक्तीने पैसे वसुल करायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना लाभ द्यायचा नाही, असे शासनाचे फसवे धोरण असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.यावर्षी राज्य शासनाने तुर डाळीला ५,६०० रूपये समर्थन मुल्य जाहिर केले आहे. परंतु आधारभुत केंद्र सुरू न केल्यामुळे या शेतकऱ्यांना २८०० ते ३००० रूपये इतक्या कमी भावाने डाळ विकावी लागत आहे. तत्कालीन युपीए सरकारने सरसकट कर्जमाफी केल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले होते. पंरतु भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही राज्य शासन अधिभार आकारुन जनतेची पिळवणूक करीत आहेत. राष्ट्रीय व राज्य मार्गावरील दारुची दुकाने बंद झाल्याचे कारण सांगुन महसुलात येणारी तुट भरुन काढण्यासाठी पेट्रोलवर अधिभार तर दुष्काळ जाहिर केल्याचे कारण सांगुन अधिभार आकारला होता.आता दारूची दुकाने सुरू होऊनही पेट्रोलवरील अधिभार कमी करण्यात आला नसल्याचा आरोप पटोले यांनी केला. एकीकडे शासन आरक्षणाला हात लावणार नाही असे सांगते आणि दुसरीकडे नोकरी भरती करत नाही. त्यामुळे आरक्षणच राहिले कुठे? असा सवाल करून बेरोजगारांना काम मिळू न देणारे हे सरकार असल्याचा आरोपीही नाना पटोले यांनी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले