शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पारंपरिक शेतीला डावलून दीड एकरात पेरूची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:32 IST

मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : शेतकऱ्यांनी वारंवार होणाऱ्या दुष्काळाला पाहून शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. तालुक्यातील एका शेतकऱ्याने नवीन प्रजातीच्या पेरूची लागवड दीड एकरात करून त्याची जोपासना केली आहे.वारंवार निसर्ग शेतकऱ्याला हुलकावणी देतो व त्यामुळे त्याला नापिकीचा सामना करावा लागते सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

ठळक मुद्देउच्च प्रतिच्या पेरूची मागणी : अनेक शेतकरी वळले फळबाग शेतीकडे

मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : शेतकऱ्यांनी वारंवार होणाऱ्या दुष्काळाला पाहून शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. तालुक्यातील एका शेतकऱ्याने नवीन प्रजातीच्या पेरूची लागवड दीड एकरात करून त्याची जोपासना केली आहे.वारंवार निसर्ग शेतकऱ्याला हुलकावणी देतो व त्यामुळे त्याला नापिकीचा सामना करावा लागते सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे सरकारचे शेती विरोधी धोरण तर दुसरीकडे निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांनी शेतीचा आता मार्ग बदलविला आहे. पारंपरिक शेतीला पाठ दाखवत तालुक्यातील महेश मेश्राम यांनी दीड एकर मध्ये ५५० पेरूची झाडे लावले.औषधीयुक्त नवीन प्रजातीच्या पेरूची लागवड करून त्यांची जोपासना करीत आहे. मेश्राम यांना ही बाब विचारली असता त्यांनी सांगितले काहींनी त्याला पेरूच्या शेतीसाठी मार्गदर्शन केले. महेशने शेतीत २०१४ मध्ये या झाडांची लागवड केल्याचे सांगितले. तीन वर्षाच्या जोपासन्याचा कालावधी झाला आहे. एका झाडाला जवळपास ३० ते ५० पेरू लागलेले आहेत. या पेरूला विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हेही पेरू डायबिटीज, हार्ट अटॅक अशा रुग्णांकरिता उपयुक्त आहे. त्यामुळे या प्रजातीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.हा पेरू अर्धा ते एक किलो वजनाचा असतो आणि स्थानीय बाजारात याला २० ते ३० रूपये प्रति किलो भाव येतो. पण नागपूरला गेलो असता या झाडाला ५० ते ६० होते. तो दिल्लीला विकण्याकरिता पाठवलं तर त्याला शंभर ते दीडशे रूपये प्रति किलो एवढे भाव मिळतात. झाडांची जोपासना कराण्याला मेहनत घ्यावी लागली.पेरू मोठे झाले असून त्याच्या संरक्षणासाठी जाळी लावावी लागली आहे. त्याच्यावर ती विशेष स्वरूपाचे पॉलिथिन लावावी लागते. यामुळे या पेरूची गुणवत्ता वाढते. ही प्रजाती छत्तीसगड येथे प्रसिद्ध आहे आणि या शेतकºयाने ही प्रजातीची पेरू प्रति झाडाला दीडशे रूपये देऊन विकत आणले. ज्या कंपनीकडून विकत घेतले त्यांनी लागवडीपासून याला मार्गदशनही केले आणि सेवा सुद्धा दिली.आजही कंपनीचे कर्मचारी येऊन याची पाहणी करून जातात. त्यामुळे शेतकºयाला घेणे सोपे जाते याबद्दल शेतकऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, आपल्याला सुरवातीला मेहनत करावे लागते. त्यानंतर या फळबागाचा लाभ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार असल्याचे सांगितले.हे झाड सतत सहा महिन्यापर्यंत फळे देतो. यामुळे या फळबागपासून प्रतिवर्ष चार ते पाच लाखांचा लाभ होण्याची शक्यता शेतकऱ्याने वर्तविले आहे. या नाविण्यपूर्ण शेतीची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी शेतीला भेट देऊन पेरू शेतीची माहिती जाणून घेतली. यावेळी एॅग्रो असोसिएशनचे सचिव सुनिल पारधी, पंचायत समितीचे माजी सभापती कमाल शेख यांनीही शेतीला भेट देऊन माहिती घेतली.मात्र आता पेरूची लागवड बघून अनेकांनी पारंपारिक शेतीला सोडून फळबागाची शेती करण्यावर भर दिला आहे.