शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

धानाचा मुद्यावर लोकप्रतिनिधींचे प्रयत्न अपुरे!

By admin | Updated: December 18, 2014 22:48 IST

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली हे धान उत्पादक जिल्हे आहेत. यावर्षी सर्वाधिक नुकसान या जिल्ह्यांमध्ये झालेले असतानाही धानाला भाव मिळवून देण्यात जिल्ह्यातील

भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली हे धान उत्पादक जिल्हे आहेत. यावर्षी सर्वाधिक नुकसान या जिल्ह्यांमध्ये झालेले असतानाही धानाला भाव मिळवून देण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कमी पडले आहेत. दरम्यान यावर्षी नापिकी आणि कर्जामुळे ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.राज्यशासनाने हिवाळी अधिवेशनात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र जिल्हा प्रशासनाने यावर्षी केवळ सात गावात दुष्काळी परिस्थिती दाखविली आहे. ऊर्वरित गावांची आणेवारी जास्त असल्यामुळे त्यांना या पॅकेजचा लाभ मिळणार नाही. मात्र प्रत्यक्षात आपल्या गावाची परिस्थिती तेथील शेतकऱ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे ‘लोकमत’ चमूने शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी प्रशासनाने काढलेल्या आणेवारीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करुन आणेवारी काढण्याची पद्धतच बदलविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असल्यामुळे पावसाळ्यात या जिल्ह्यात सरासरी १,३३०.२० मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी केवळ ९००.५ मि.मी. सरासरी म्हणजे ६८ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे पुरेशा पावसाअभावी अनेक भागात धानाचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही, असे असताना जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या खरिपाची नजरअंदाज पैसेवारी ७४ पैसे घोषित करण्यात आली होती. त्यानंतर सुधारीत पैसेवारी ६४ पैसे काढण्यात आली.शासन नियमानुसार ज्या गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे तीच गावे दुष्काळग्रस्त गणली जातात. शासनाने जाहीर केलेली मदत ही अंतिम पैसेवारीनुसारच मिळणार आहे. मात्र जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ७४ पैसे असताना एक महिन्यानंतर जाहीर होणारी अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावे मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे धान उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.जिल्ह्यातील सातही तालुक्यात विविध सात विषयाला घेऊन प्रश्नावली तयार करण्यात आली. या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील १०० शेतकऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी या प्रश्नांवर पोटतिडकीने उत्तरे दिली. आपल्या भागातील पीक स्थिती समाधानकारक आहे का? या प्रश्नावर ८६ टक्के नाही, तर १४ टक्के होय असे उत्तर मिळाले. खरीप पिकाची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे कां? या प्रश्नावर ७४ टक्के शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे वाभाडे काढले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसूनच आणेवारी काढावी, प्रत्यक्षात पाहणी केली असती तरी ही आकडेवारी देण्याचा प्रश्न पुढे आला नसता. २६ टक्के शेतकऱ्यांनी मात्र सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्केपेक्षा अधिक उत्पादन झाल्याचे सांगितले. ब्रिटीशकालीन आणेवारी पद्धत बदलण्याची गरज आहे का? या प्रश्नावर ९८ टक्के शेतकऱ्यांनी होय, तर दोन टक्के शेतकऱ्यांनी काही अर्थ निघणार नाही, अशी उत्तरे दिली. शासनाने धान उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली का? या प्रश्नावर मात्र ८२ टक्के शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. १८ टक्के शेतकऱ्यांनी शासनाकडूनच मदत मिळत असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींनी आवाज उचलला का?, या प्रश्नावर मात्र ९५ टक्के शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ५ टक्के शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या बाजूने कौल दिला. शेतीची कामे रोजगार हमी योजनेच्या कामातून झाली पाहिजे का? असा प्रश्न केला असता ९४ टक्के शेतकऱ्यांनी वाढत्या महागाईमुळे असे व्हायलाच पाहिजे, तेव्हाच शेतकऱ्यांचा मजुरीवर होणारा खर्च वाचेल, असे सांगितले. ६ टक्के शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शविला आहे. (लोकमत चमू)