शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

आष्टीत गरदेव यात्रेला उसळणार जनसमुदाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:50 IST

तालुक्यातील आष्टी येथे धुलिवंदनाच्या दिवशी गरदेवाची यात्रा भरते. १५० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी दर तीन वर्षांनी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड जंगलातून दोन दिवसापूर्वीच आणल्या जाते.

ठळक मुद्दे१५० वर्षांची परंपरा : लाकूड आणण्यासाठी १५० बैलजोड्यांची मदत

ऑनलाईन लोकमतगोबरवाही : तालुक्यातील आष्टी येथे धुलिवंदनाच्या दिवशी गरदेवाची यात्रा भरते. १५० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी दर तीन वर्षांनी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड जंगलातून दोन दिवसापूर्वीच आणल्या जाते. यावर्षीदेखील येथील जंगलातून सर्व धार्मिक विधी पूर्ण करुन १५० बैलजोड्यांच्या मदतीने लाकूड ओढत आणण्यात आले. या विधीसाठी भाविकांनी श्रध्देने व उत्साहाने सहभाग घेतला.१५० वर्षापासून धुलिवंदनाच्या दिवशी भरणाऱ्या मेघनाथ (गरदेव) वांगागरी यात्रेकरिता दर तीन वर्षांनी जंगलातून मोठे लाकूड आणल्या जात. दोन लाकूड ज्यांची सावली एकमेकांवर पडते आणि त्यांचे रंग मित्त (काळा-पांढरा) असेल असा विशिष्ट झाडांना नर-मादी आणि शिव पार्वती संबोधून पूजा अर्चना करून विधिवत १५० बैल जोड्यांच्या सहाय्याने लगतच्या हमेशा येथील जंगलातून आष्टीत भरणाºया (वांगागरी) गरदेव यात्रेकरिता दोन विशिष्ट लाकूड आणल्या गेले. आणतांना लाकूड अटकलेली शेकडो नारळ फोडल्यावरच लाकूड सामोर खेचल्या जातो अशी आख्यायिका आहे.१५० वर्षापूर्वी बावनथडी नदीत मोठे पूर आले होते. त्यावेळी पुरात दोन मोठे लाकूड वाहत आष्टीत आले असता गावकऱ्यांनी ते लाकूड कापून अन्न शिजविण्याच्या कामात आणले असता अन्न शिजविण्याचे मातीचे भांडे (हांडी) फुटल्या गेले. अन्न वाया जावू लागला होता. त्यातच दुसºया वर्षी आष्टीवासीयांना मोठ्या दुष्काळाचा सामनाही करावा लागला. अन्न पिकविण्याकरिता पाणी तर सोडाच पिण्याचा पाणीही आष्टीवासीयांना नाही झाले नव्हते.दरम्यान आष्टी येथीलच शिवभक्त पुजारीच्या स्वप्नात मेघनाथ, वरुण राजाने साक्षात्कार दिला व नागरिकांनी केली चूक लक्षात आणून दिली की पुरात वाहत आलेले ते लाकूड नव्हते ते साक्षात शिव पार्वती होत्या. तुम्ही त्यांना कापून जाळल्याने निसर्ग कोपला आहे.त्यामुळे तुम्ही जंगलात अशा लाकडांचा शोध घ्या की ते रंगाने भिन्न असतील अर्थात काळे पांढरे असतील व उगवत्या किंवा मावळत्या सूर्याची किरणे पडल्यावर एक दुसऱ्याची सावली एकमेकांवर पडेल आणि त्यातील एक झाड सरळ व दुसऱ्या झाडाला फाटा फुटला असेल नर मादी झाडे हेच शिव पार्वती आहेत. झाडांना लाकडांचा थर रचून वांगाला गर लावून चहू बाजूने फेकल्यावरच गावावरील कोप दूर होणार असे साक्षात पुजाºयाला साक्षात्कार झाल्याने गावकºयांनी धूळवडच्या दिवशीच असे विशिष्ट लाकूड जंगलातून आणून त्यांची पूजा अर्चना केली. त्याच वर्षी आष्टीकरांनी भरपूर पीक घेतले व समृद्ध झाल्याने गत १५० वर्षापासून दर तीन वर्षांनी विशिष्ट झाड शोधून धुलिवंदनाच्या दिवशी त्यावर वांग्याला गर लावून चारही दिशेने फेकल्या जाते.