शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

आष्टीत गरदेव यात्रेला उसळणार जनसमुदाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:50 IST

तालुक्यातील आष्टी येथे धुलिवंदनाच्या दिवशी गरदेवाची यात्रा भरते. १५० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी दर तीन वर्षांनी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड जंगलातून दोन दिवसापूर्वीच आणल्या जाते.

ठळक मुद्दे१५० वर्षांची परंपरा : लाकूड आणण्यासाठी १५० बैलजोड्यांची मदत

ऑनलाईन लोकमतगोबरवाही : तालुक्यातील आष्टी येथे धुलिवंदनाच्या दिवशी गरदेवाची यात्रा भरते. १५० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी दर तीन वर्षांनी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड जंगलातून दोन दिवसापूर्वीच आणल्या जाते. यावर्षीदेखील येथील जंगलातून सर्व धार्मिक विधी पूर्ण करुन १५० बैलजोड्यांच्या मदतीने लाकूड ओढत आणण्यात आले. या विधीसाठी भाविकांनी श्रध्देने व उत्साहाने सहभाग घेतला.१५० वर्षापासून धुलिवंदनाच्या दिवशी भरणाऱ्या मेघनाथ (गरदेव) वांगागरी यात्रेकरिता दर तीन वर्षांनी जंगलातून मोठे लाकूड आणल्या जात. दोन लाकूड ज्यांची सावली एकमेकांवर पडते आणि त्यांचे रंग मित्त (काळा-पांढरा) असेल असा विशिष्ट झाडांना नर-मादी आणि शिव पार्वती संबोधून पूजा अर्चना करून विधिवत १५० बैल जोड्यांच्या सहाय्याने लगतच्या हमेशा येथील जंगलातून आष्टीत भरणाºया (वांगागरी) गरदेव यात्रेकरिता दोन विशिष्ट लाकूड आणल्या गेले. आणतांना लाकूड अटकलेली शेकडो नारळ फोडल्यावरच लाकूड सामोर खेचल्या जातो अशी आख्यायिका आहे.१५० वर्षापूर्वी बावनथडी नदीत मोठे पूर आले होते. त्यावेळी पुरात दोन मोठे लाकूड वाहत आष्टीत आले असता गावकऱ्यांनी ते लाकूड कापून अन्न शिजविण्याच्या कामात आणले असता अन्न शिजविण्याचे मातीचे भांडे (हांडी) फुटल्या गेले. अन्न वाया जावू लागला होता. त्यातच दुसºया वर्षी आष्टीवासीयांना मोठ्या दुष्काळाचा सामनाही करावा लागला. अन्न पिकविण्याकरिता पाणी तर सोडाच पिण्याचा पाणीही आष्टीवासीयांना नाही झाले नव्हते.दरम्यान आष्टी येथीलच शिवभक्त पुजारीच्या स्वप्नात मेघनाथ, वरुण राजाने साक्षात्कार दिला व नागरिकांनी केली चूक लक्षात आणून दिली की पुरात वाहत आलेले ते लाकूड नव्हते ते साक्षात शिव पार्वती होत्या. तुम्ही त्यांना कापून जाळल्याने निसर्ग कोपला आहे.त्यामुळे तुम्ही जंगलात अशा लाकडांचा शोध घ्या की ते रंगाने भिन्न असतील अर्थात काळे पांढरे असतील व उगवत्या किंवा मावळत्या सूर्याची किरणे पडल्यावर एक दुसऱ्याची सावली एकमेकांवर पडेल आणि त्यातील एक झाड सरळ व दुसऱ्या झाडाला फाटा फुटला असेल नर मादी झाडे हेच शिव पार्वती आहेत. झाडांना लाकडांचा थर रचून वांगाला गर लावून चहू बाजूने फेकल्यावरच गावावरील कोप दूर होणार असे साक्षात पुजाºयाला साक्षात्कार झाल्याने गावकºयांनी धूळवडच्या दिवशीच असे विशिष्ट लाकूड जंगलातून आणून त्यांची पूजा अर्चना केली. त्याच वर्षी आष्टीकरांनी भरपूर पीक घेतले व समृद्ध झाल्याने गत १५० वर्षापासून दर तीन वर्षांनी विशिष्ट झाड शोधून धुलिवंदनाच्या दिवशी त्यावर वांग्याला गर लावून चारही दिशेने फेकल्या जाते.