लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे रुयाड (सिंदपुरी) येथील महासमाधी भूमी महास्तुपाची आंतरराष्ट्रीय स्तराची वास्तू उभारता आली. पञ्ञा मेत्ता संघाचे कार्य आज अनेक राज्यात सुरु आहे. तीन वेळा दु:ख सहन केल्यानंतर चवथ्यांदा सुख मिळते. बौद्ध विहार अध्यात्मिक कार्याकरिता निर्माण केले जातात. आज जनतेनी आध्यात्मीक कार्याकडे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न माणके यांनी केले.महासमाधू भूमी महास्तूप रुयाड येथे महासमाधीभूमी महास्तुपाचा १३ वा वर्धापन दिन पञ्ञा मेत्ता बालसदनाचा २९ वा व वाचनालयाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त ३३ व्या धम्ममहोत्सवाचे आयोजनात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या भिक्खू जीवनाला ५० वर्षे झाल्याप्रसंगी सत्कारही करण्यात आला.धम्म महोत्सवाचे उद्घाटन जपानच्या पञ्ञा मेत्ता कमेटीचे अध्यक्ष भदंत खोशो तानी यांच्या हस्ते करण्यात आले.अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद महास्थवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न माणके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर, तेंदाई संघ जपानचे माजी अध्यक्ष भदंत योको निशिओका, तिबेटी बुद्ध विहार गोठणगावचे भदंत लेबझान तेंपा, शांती बुद्ध विहार वर्धाचे भदंत मिकीओ असाई, जपानचे भदंत खोदो कोंदो, भिक्खूनी म्योजिच्छू नागाकुबो, भदंत सत्यशील, भदंत नागदिपांकर, भदंत डॉ.धम्मदीप, भदंत महापंत, भदंत विनयरकिखता, भदंत बुद्धघोष, भदंत मेत्तानंद, भदंत डॉ.ज्ञानदीप, भदंत नागसेन, भदंत बोधानंद, भिक्खूनी विशाखा, भिक्खूनी शिलाचारा, खेमा कात्यायणी, मिलिंद फुलझेले, सरपंच माधुरी पचारे, भागयश्री येलमुले उपस्थित होते.नीलज फाट्यावर बौद्ध भिक्खुंचे स्वागत करून धम्मरॅलीचे पवनी शहरात आगमन होताच शहरवासीयांनी स्वागत केले.याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ही महासमाधी भूमी याच्या विकासाकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.अनेक सामाजिक संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. पञ्ञा मेत्ता शाळा व बालसदनाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन भीम व बुद्ध गीतांवर अप्रतिम नृत्य सादर केले. याला उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात दाद दिली. प्रास्ताविक धम्मानंद मेश्राम, संचालन अॅड.महेंद्र गोस्वामी व आभार प्रदर्शन अॅड.गौतम उके यांनी केले.
जनतेने आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST
पञ्ञा मेत्ता संघाचे कार्य आज अनेक राज्यात सुरु आहे. तीन वेळा दु:ख सहन केल्यानंतर चवथ्यांदा सुख मिळते. बौद्ध विहार अध्यात्मिक कार्याकरिता निर्माण केले जातात. आज जनतेनी आध्यात्मीक कार्याकडे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न माणके यांनी केले.
जनतेने आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची गरज
ठळक मुद्देसंघरत्न माणके : रुयाड महासमाधीभूूमी धम्म महोत्सवात उसळला जनसागर